शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

मार्केटिंग फेडरेशनमध्ये हेराफेरी, शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 22:38 IST

शेतकऱ्यांची तक्रार : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नावनोंदणी सुरळीत

धुळे : येथील जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात हमीभावाने शेतीमाल खरेदीसाठी नावनोंदणीत हेराफेरी होत असल्याचा आणि शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांची मागच्या दाराने नावनोंदणी केली जात असल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेत तक्रारी केल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नावनोंदणीची प्रक्रिया सुरळीत झाली. धुळे शहरात विधी महाविद्यालयाजवळ असलेल्या धुळे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात हमीभावाने धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची नावनोंदणी सुरु झाली आहे. यासाठी धुळे तालुक्यातील बोरकुंड, हडसुणे, कुसुंबा, दोंदवाड, विंचूर, वडगाव, विसरणे यांसह अनेक गावातील शेतकरी मका, ज्वारी आदी धान्य विक्रीसाठी गेल्या आठवड्यापासून कार्यालयात खेटा घालत होते. परंतु ऑनलाईन नोंदणी असल्याने आणि सर्वर चालत नसल्याने सोमवारी नावनोंदणी करण्यात येईल, असे संबंधित कार्यालयाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासूनच नावनोंदणीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. परंतु शेतकऱ्यांची नोंदणी सुरु होण्याआधीच ७० ते ८० जणांची नोंदणी झाल्याचे या शेतकऱ्यांना समजले. शुक्रवारपासून चकरा मारणारे शेतकरी सकाळपासून रांगेत उभे असताना त्यांच्यापुढे अचानक इतके नंबर लागले कसे, असा प्रश्न उपस्थित केला. परंतु फेडरेशनच्या कार्यालयातील कर्मचारी दाद देत नसल्याने शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. आपली तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना तोंडी सांगितली. त्यानुसार जिल्हाधिकारी संजय यादव यांनी फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी सोनवणे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून घेतले आणि नव्याने शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची आदेश दिले. त्यानुसार नावनोंदणीची प्रक्रिया सुरळीत सुरु झाली असून, शेतकऱ्यांची नावनोंदणी करुन त्यांना टोकन देण्यात येत आहे.याबाबत वडगावचे शेतकरी रघुनाथ पाटील यांनी सांगितले की, हमीभावाने शेतीमाल खरेदीसाठी वशिलेबाजी चालते. पुढाऱ्यांनी सुचविलेली नावे आधी घेतली जातात. तसेच काही व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांचे सातबारा उतारे असतात. हे व्यापारी फेडरेशनच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करुन आधीच नंबर लावून घेतात. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हमीभावापासून वंचित राहू शकतात. याबाबत विचारणा केली असता तुम्ही कुठेही तक्रार केली तरी काही होणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.जिल्हाधिकारी कार्यालयात माधवराव चैत्राम पाटील, युवराज नामदेव पाटील, योगेश्वर युवराज पाटील, शांतीलाल आनंदा चाैधरी, सीताराम बापू पाटील, संदीप रामराव पाटील, पुंजू मुकुंदा पाटील, रंगराव गोरख देसले यांच्यासह २० ते ३० शेतकरी उपस्थित होते. त्यांचा प्रश्न सुटल्याने दिलासा मिळाला.

टॅग्स :Dhuleधुळे