शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

कोरोना संसर्ग व डेंग्यू निर्मुलनासाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 10:04 PM

चंद्रकांत सोनार कोरोनासारख्या महामारीपासून प्रत्येक धुळेकर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आतापर्यत गेल्या सहा महिन्यात महानगरातील ९ कोटी ९० हजार ...

चंद्रकांत सोनारकोरोनासारख्या महामारीपासून प्रत्येक धुळेकर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आतापर्यत गेल्या सहा महिन्यात महानगरातील ९ कोटी ९० हजार घरांचे निरजंतूकीकरण करण्यात आले आहे. तर शहरातील अकरा खाजगी व सरकारी विभागाचे देखील निरजंतूकीरण झाले आहे. सध्या हिवाळ्यात डेंग्यू व कोरोना संसर्ग अशा दोन आजाराना सामोरे जावे लागू शकते. सध्यातरी एकही नागरिकाला डेंग्यूची लागण झालेली नसली तरी आरोग्य विभागाकडून प्रभागनिहाय फवारणीचे काम सुरू आहे. अशी माहिती मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा शहर मलेरिया पर्यवेक्षक लक्ष्मण पाटील यांनी लोकमत शी बोलतांना दिली.प्रश्न : महानगरातील किती घरांचे सॅनेटराझर करण्यात आलेउत्तर: शहरात कोरोना बाधित आढळून आल्यानंतर सॅनेटराझर करण्याच्या सुचना होत्या. त्यानुसार पहिल्या टप्यात शहरातील ९० हजार तर दुसऱ्या टप्यात अकरा वेळा असे ९० कोटी ९० हजार घरांचे सॅनेटराझर आतापर्यत झालेले आहे. तसेच आरोग्य विभागाला बाधित कुटूंबाची माहिती देऊन बाधित परिसरात तपासणीसाठी सल्ला दिला जात होतो.प्रश्न : महानगरातील किती सरकारी विभाग व खाजगी दवाखाने सील केलेतउत्तर: मार्चनंतर आतापर्यत १३ हजार ६९८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. या कालावधीत मनपाचे पाच, टपाल विभागाचे एक, बीएसएनएल एक, एमएसइबी एक तसेच जिल्हा परिषद एक असे सहा विभागात कोरोना बाधित कर्मचारी आढळून आले होते. त्या ठिकाणी सॅनेटराझर करून २४ तासासाठी सील केले करण्यात आले होते. तर २५ खाजगी रूग्णालयांचा विभाग होते.प्रश्न : डेंग्यू व कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काय उपाय योजना केल्या जात आहे.उत्तर: हिवाळ्यात कोरोना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य दक्षता बाळगली जात आहे. सध्या पाच कर्मचारी कोरोना बाधितांवर अत्यविधी करण्यासाठी तर सॅनेटराझर करण्यासाठी २० असे कर्मचारी आहेत. १५ प्रभागात ॲबटिंग व फवारणी केले आहेत. शिवाय एकही व्यक्तीमध्ये डेंग्यूची रूग्ण आढळून आले आहे.भिती बाळगू नका, मात्र खबरदारी घ्यासहा महिन्यापासून आपण कोरोना काळात जगत आहोत. येणार्या काळातही जगावे लागणार आहे. त्यामुळे कोरोनाची भिती बाळगू नका, मात्र लागण होणार नाही. याची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी नियमित शासनाने दिलेल्या नियम व अटींचे तंतोतत पालन केल्यास आपण कोरोनाला हरवू शकतो.अनेकांचे मदतीचे हात पुढे येवू लागलेत.पाच ते सहा महिन्यापुर्वी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची भिती होती. त्यामुळे कुटूंबातील एखादा सदस्य जरी मयत झाला तरी अंत्यसंस्कार करण्यासाठी नकार दिला जात होता. मात्र हळू-हळू नागरिकांमध्ये कोरोना विषयी भिती कमी झाल्याने अंत्यंसंस्कार करण्यासाठी नागरिकांसह विविध सामाजिक संस्स्था पुढे येवू लागल्या आहेत. मात्र खबरदारी देखील घेण्याची गरज लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.