शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

रब्बीत शेतकरी पाण्यासाठी अनुत्सूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:02 IST

लाटीपाडा धरण : १५ शेतकऱ्यांनी भरले पाणी अर्ज; हंगाम काहीअंशी लांबला

पिंपळनेर : रब्बी हंगाम यंदा एक महिना उशिरा होऊनही लाटीपाडा धरणातून शेतकरी पाणी मागत नसल्याचे दिसून येत आहे. पाटबंधारे विभागाने पाणी अर्ज भरणे सुरू केले असून देखील हे अर्ज भरण्यासाठी शेतकरी उत्सुक नसून आतापर्यंत १५ शेतकऱ्यांनी पाणी अर्ज भरून पाण्याची मागणी केली आहे.गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी लाटीपाडा धरणातून पाटाद्वारे शेतकºयांना तसेच डाव्या व उजव्या कालव्यावरील शेती करणाºया शेतकºयांना लाटीपाडा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. यंदा एक महिना उशिर होऊनही रब्बी हंगामासाठी अद्याप शेतकºयांनी सुरुवात केलेली नाही. तसेच पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी अद्याप शेतकºयांनी केलेली नाही. रब्बी हंगामाची सुरुवात ही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून होत असल्याने शेतकरी मशागती करण्यास तसेच पिकांची पेरणी करण्यास सुरवात करीत असतात. तसेच डाव्या व उजव्या कालव्यावर अंदाजे एक हजार हेक्टर पेक्षाही जास्त क्षेत्र हे लाटीपाडा धरणावर अवलंबून असते.पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी रब्बी हंगामासाठी धरणात असलेल्या शिल्लक पाण्याचे नियोजन रब्बीसाठी करण्यात येत असते. यंदाच्या वर्षी पिंपळनेर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने सर्वच प्रकल्प हे पाण्याने भरलेले आहेत. तसेच विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. असे असून देखील रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणावर अवलंबून असलेल्या उजव्या व डाव्या कालव्या अंतर्गत येणारे शेतकरी हे पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच फळबागायतदार व माखळे या शिवारात शेतकºयांनी पेरणीची कामे सुरू केलेली नाहीत.डिसेंबर अर्धा संपला तरी पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी शेतकºयांनी केली नाही.गेल्या काही दिवसांपासून बंधारे विभागात पाणी मागणे अर्ज भरणे सुरू केले असून देखील याला शेतकºयांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. लाटीपाडा धरण, जामखेली, विरखेल व शेलबरी एमआयटॅन्क आदी धरणांवर अवलंबून असणाºया शेतकºयांनी पाण्याची मागणी केली नाही. तसेच पाणी मागणी अर्ज भरणे सुरू असून अर्ज कोणी भरण्यासाठी धजावत नसल्याचे बोलले जात आहे. सर्व प्रकल्प हे पाण्याने पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत.रब्बी हंगाम काहीअंशी लांबला आहे. तसेच डिसेंबर महिना सुरू होऊनही यंदा थंडीचे प्रमाण हे कमी आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे शेतकºयांच्या चिंता या वाढलेल्या आहेत.दरम्यान पाटबंधारे विभागातर्फे पाणी सोडण्यात येणाºया पाटचाºयांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगले आहे. तसेच गाळ साचलेला आहे. जेसीबीच्या साह्याने हा गाळ काढण्यात यावा, तन देखील काढण्यात यावे अशी मागणी या परिसरातील शेतकºयांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे