शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

रब्बीत शेतकरी पाण्यासाठी अनुत्सूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:02 IST

लाटीपाडा धरण : १५ शेतकऱ्यांनी भरले पाणी अर्ज; हंगाम काहीअंशी लांबला

पिंपळनेर : रब्बी हंगाम यंदा एक महिना उशिरा होऊनही लाटीपाडा धरणातून शेतकरी पाणी मागत नसल्याचे दिसून येत आहे. पाटबंधारे विभागाने पाणी अर्ज भरणे सुरू केले असून देखील हे अर्ज भरण्यासाठी शेतकरी उत्सुक नसून आतापर्यंत १५ शेतकऱ्यांनी पाणी अर्ज भरून पाण्याची मागणी केली आहे.गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी लाटीपाडा धरणातून पाटाद्वारे शेतकºयांना तसेच डाव्या व उजव्या कालव्यावरील शेती करणाºया शेतकºयांना लाटीपाडा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. यंदा एक महिना उशिर होऊनही रब्बी हंगामासाठी अद्याप शेतकºयांनी सुरुवात केलेली नाही. तसेच पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी अद्याप शेतकºयांनी केलेली नाही. रब्बी हंगामाची सुरुवात ही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून होत असल्याने शेतकरी मशागती करण्यास तसेच पिकांची पेरणी करण्यास सुरवात करीत असतात. तसेच डाव्या व उजव्या कालव्यावर अंदाजे एक हजार हेक्टर पेक्षाही जास्त क्षेत्र हे लाटीपाडा धरणावर अवलंबून असते.पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी रब्बी हंगामासाठी धरणात असलेल्या शिल्लक पाण्याचे नियोजन रब्बीसाठी करण्यात येत असते. यंदाच्या वर्षी पिंपळनेर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने सर्वच प्रकल्प हे पाण्याने भरलेले आहेत. तसेच विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. असे असून देखील रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणावर अवलंबून असलेल्या उजव्या व डाव्या कालव्या अंतर्गत येणारे शेतकरी हे पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच फळबागायतदार व माखळे या शिवारात शेतकºयांनी पेरणीची कामे सुरू केलेली नाहीत.डिसेंबर अर्धा संपला तरी पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी शेतकºयांनी केली नाही.गेल्या काही दिवसांपासून बंधारे विभागात पाणी मागणे अर्ज भरणे सुरू केले असून देखील याला शेतकºयांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. लाटीपाडा धरण, जामखेली, विरखेल व शेलबरी एमआयटॅन्क आदी धरणांवर अवलंबून असणाºया शेतकºयांनी पाण्याची मागणी केली नाही. तसेच पाणी मागणी अर्ज भरणे सुरू असून अर्ज कोणी भरण्यासाठी धजावत नसल्याचे बोलले जात आहे. सर्व प्रकल्प हे पाण्याने पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत.रब्बी हंगाम काहीअंशी लांबला आहे. तसेच डिसेंबर महिना सुरू होऊनही यंदा थंडीचे प्रमाण हे कमी आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे शेतकºयांच्या चिंता या वाढलेल्या आहेत.दरम्यान पाटबंधारे विभागातर्फे पाणी सोडण्यात येणाºया पाटचाºयांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगले आहे. तसेच गाळ साचलेला आहे. जेसीबीच्या साह्याने हा गाळ काढण्यात यावा, तन देखील काढण्यात यावे अशी मागणी या परिसरातील शेतकºयांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे