शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
2
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
3
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
4
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
5
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
6
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
7
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
8
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
9
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
10
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
11
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
12
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
13
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
14
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
15
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
16
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
17
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
18
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
19
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
20
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीत शेतकरी पाण्यासाठी अनुत्सूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:02 IST

लाटीपाडा धरण : १५ शेतकऱ्यांनी भरले पाणी अर्ज; हंगाम काहीअंशी लांबला

पिंपळनेर : रब्बी हंगाम यंदा एक महिना उशिरा होऊनही लाटीपाडा धरणातून शेतकरी पाणी मागत नसल्याचे दिसून येत आहे. पाटबंधारे विभागाने पाणी अर्ज भरणे सुरू केले असून देखील हे अर्ज भरण्यासाठी शेतकरी उत्सुक नसून आतापर्यंत १५ शेतकऱ्यांनी पाणी अर्ज भरून पाण्याची मागणी केली आहे.गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी लाटीपाडा धरणातून पाटाद्वारे शेतकºयांना तसेच डाव्या व उजव्या कालव्यावरील शेती करणाºया शेतकºयांना लाटीपाडा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. यंदा एक महिना उशिर होऊनही रब्बी हंगामासाठी अद्याप शेतकºयांनी सुरुवात केलेली नाही. तसेच पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी अद्याप शेतकºयांनी केलेली नाही. रब्बी हंगामाची सुरुवात ही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून होत असल्याने शेतकरी मशागती करण्यास तसेच पिकांची पेरणी करण्यास सुरवात करीत असतात. तसेच डाव्या व उजव्या कालव्यावर अंदाजे एक हजार हेक्टर पेक्षाही जास्त क्षेत्र हे लाटीपाडा धरणावर अवलंबून असते.पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी रब्बी हंगामासाठी धरणात असलेल्या शिल्लक पाण्याचे नियोजन रब्बीसाठी करण्यात येत असते. यंदाच्या वर्षी पिंपळनेर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने सर्वच प्रकल्प हे पाण्याने भरलेले आहेत. तसेच विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. असे असून देखील रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणावर अवलंबून असलेल्या उजव्या व डाव्या कालव्या अंतर्गत येणारे शेतकरी हे पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच फळबागायतदार व माखळे या शिवारात शेतकºयांनी पेरणीची कामे सुरू केलेली नाहीत.डिसेंबर अर्धा संपला तरी पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी शेतकºयांनी केली नाही.गेल्या काही दिवसांपासून बंधारे विभागात पाणी मागणे अर्ज भरणे सुरू केले असून देखील याला शेतकºयांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. लाटीपाडा धरण, जामखेली, विरखेल व शेलबरी एमआयटॅन्क आदी धरणांवर अवलंबून असणाºया शेतकºयांनी पाण्याची मागणी केली नाही. तसेच पाणी मागणी अर्ज भरणे सुरू असून अर्ज कोणी भरण्यासाठी धजावत नसल्याचे बोलले जात आहे. सर्व प्रकल्प हे पाण्याने पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत.रब्बी हंगाम काहीअंशी लांबला आहे. तसेच डिसेंबर महिना सुरू होऊनही यंदा थंडीचे प्रमाण हे कमी आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे शेतकºयांच्या चिंता या वाढलेल्या आहेत.दरम्यान पाटबंधारे विभागातर्फे पाणी सोडण्यात येणाºया पाटचाºयांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगले आहे. तसेच गाळ साचलेला आहे. जेसीबीच्या साह्याने हा गाळ काढण्यात यावा, तन देखील काढण्यात यावे अशी मागणी या परिसरातील शेतकºयांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे