शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिरपुरात व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर जनता कर्फ्यूला बसला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 22:08 IST

पालिकेत मुख्याधिकारी अमोल बागुल यांची भेट

शिरपूर : शहरात १७ ते २१ दरम्यान पाच दिवसांचा सर्वपक्षीय जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला होता. परंतू शहरातील व्यापाऱ्यांनी त्याला विरोध करीत आपले व्यवहार सुरु ठेवणार असल्याची भूमिका घेतली. तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांना निवेदन दिले. तेव्हा मुख्याधिकाºयांनी हा निर्णय सर्वपक्षीय आहे. त्यात आमचा सहभाग नाही. त्यामुळे व्यापारी प्रतिष्ठान खुल्या ठेवणाºयाविरोधात कुठली कारवाई करण्यात येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर व्यापाºयांनी जनता कर्फ्यू रद्द झाला असल्याचे जाहीर करुन आपली व्यवहार सुरु ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी १७ ते २१ जून असे ५ दिवसांचा जनता कर्फ्यु लागू करण्याचे जाहिर केले होते. तसेच संदेश सोमवारी रात्रीपासून सोशल मिडियावर सर्वच ग्रुपवर पसरले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच याच्याविरोधात व्यापाºयांचा विरोध सुरु होता. सर्वच व्यापारी यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यासाठी दुपारी शिष्टमंडळासह गेले. पालिकेत मुख्याधिकारी अमोल बागुल यांची भेट घेऊन व्यापाºयांनी त्यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, अर्थचक्र सावरण्यासाठी लॉकडाऊन उठविण्याचा निर्णय घेतला आहे़ ८० दिवसाच्या लॉकडाऊननंंतर शहरात कुठेतरी उभा राहीला आहे. लोक आता खरेदीसाठी बाहेर येऊ लागलेत़ संपूर्ण भारतात सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहे. मात्र ते वगळता शहरात सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत या मर्यादित कालावधीतच बाजारपेठ व दुकाने सुरु असतात. सलग दुसºयांंदा जनता कर्फ्यू या गोंडस नावाखाली व्यवहार व बाजारपेठ बेकायदेशीरपणे बंद करणे म्हणजे सर्वसामान्य गरजुंच्या पोटावर पाय देणे आहे. यापूर्वी शहराची बाजारपेठ बंद असल्यामुळे शासनाचे, शेतकरी बांधवाचे शेती पुरक, कामगार व व्यापाºयांचे जवळपास २ हजार कोटीची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे़ जनता कर्फ्यूच्या निर्णयाला व्यापाºयांसह शहरातील सर्व घटकांतून असलेल्या विरोधाचे प्रमाण लक्षात घेता तो बहुतेक जनतेला नामंजूर असल्याचे दिसून येते. सोशल मिडियावर निनावी आव्हान करून बंद करण्याची घोषणा करणे संतापजनक आहे. त्यामुळे या लादलेल्या बंदला व्यापारांचा विरोध आहे. व्यापाºयांनी शिरपूर बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाकडून ज्या-ज्या लिखित सुचना आहे. त्याचे काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यास आम्ही बांधील आहोत असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मराठा व्यापारी संघटना, किराणा व्यापारी असोसिएशन, सिडस् अ‍ॅण्ड पेस्टीसाईड असोसिएशन, गांधी मार्केट, शिवाजी मार्केट, धाना बाजार, सिंधी मार्केट, नेहरू रोड परिसरातील व्यापाºयांच्या स्वाक्षºया आहेत़पालिकेचे आश्वासनहा जनता कर्फ्यू सर्वपक्षीय आहे. हा पालिका प्रशासनाचा निर्णय नाही. त्यामुळे या जनता कर्फ्यूमध्ये कोणाला सहभागी व्हायचे ते त्याने ठरवावे. आम्ही कोणावरही कारवाई करणार असे आश्वासन मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी दिले. त्यानंतर व्यापाºयांनी आपले व्यवसाय सुरु ठेवण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे