शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

शिरपुरात व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर जनता कर्फ्यूला बसला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 22:08 IST

पालिकेत मुख्याधिकारी अमोल बागुल यांची भेट

शिरपूर : शहरात १७ ते २१ दरम्यान पाच दिवसांचा सर्वपक्षीय जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला होता. परंतू शहरातील व्यापाऱ्यांनी त्याला विरोध करीत आपले व्यवहार सुरु ठेवणार असल्याची भूमिका घेतली. तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांना निवेदन दिले. तेव्हा मुख्याधिकाºयांनी हा निर्णय सर्वपक्षीय आहे. त्यात आमचा सहभाग नाही. त्यामुळे व्यापारी प्रतिष्ठान खुल्या ठेवणाºयाविरोधात कुठली कारवाई करण्यात येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर व्यापाºयांनी जनता कर्फ्यू रद्द झाला असल्याचे जाहीर करुन आपली व्यवहार सुरु ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी १७ ते २१ जून असे ५ दिवसांचा जनता कर्फ्यु लागू करण्याचे जाहिर केले होते. तसेच संदेश सोमवारी रात्रीपासून सोशल मिडियावर सर्वच ग्रुपवर पसरले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच याच्याविरोधात व्यापाºयांचा विरोध सुरु होता. सर्वच व्यापारी यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यासाठी दुपारी शिष्टमंडळासह गेले. पालिकेत मुख्याधिकारी अमोल बागुल यांची भेट घेऊन व्यापाºयांनी त्यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, अर्थचक्र सावरण्यासाठी लॉकडाऊन उठविण्याचा निर्णय घेतला आहे़ ८० दिवसाच्या लॉकडाऊननंंतर शहरात कुठेतरी उभा राहीला आहे. लोक आता खरेदीसाठी बाहेर येऊ लागलेत़ संपूर्ण भारतात सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहे. मात्र ते वगळता शहरात सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत या मर्यादित कालावधीतच बाजारपेठ व दुकाने सुरु असतात. सलग दुसºयांंदा जनता कर्फ्यू या गोंडस नावाखाली व्यवहार व बाजारपेठ बेकायदेशीरपणे बंद करणे म्हणजे सर्वसामान्य गरजुंच्या पोटावर पाय देणे आहे. यापूर्वी शहराची बाजारपेठ बंद असल्यामुळे शासनाचे, शेतकरी बांधवाचे शेती पुरक, कामगार व व्यापाºयांचे जवळपास २ हजार कोटीची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे़ जनता कर्फ्यूच्या निर्णयाला व्यापाºयांसह शहरातील सर्व घटकांतून असलेल्या विरोधाचे प्रमाण लक्षात घेता तो बहुतेक जनतेला नामंजूर असल्याचे दिसून येते. सोशल मिडियावर निनावी आव्हान करून बंद करण्याची घोषणा करणे संतापजनक आहे. त्यामुळे या लादलेल्या बंदला व्यापारांचा विरोध आहे. व्यापाºयांनी शिरपूर बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाकडून ज्या-ज्या लिखित सुचना आहे. त्याचे काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यास आम्ही बांधील आहोत असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मराठा व्यापारी संघटना, किराणा व्यापारी असोसिएशन, सिडस् अ‍ॅण्ड पेस्टीसाईड असोसिएशन, गांधी मार्केट, शिवाजी मार्केट, धाना बाजार, सिंधी मार्केट, नेहरू रोड परिसरातील व्यापाºयांच्या स्वाक्षºया आहेत़पालिकेचे आश्वासनहा जनता कर्फ्यू सर्वपक्षीय आहे. हा पालिका प्रशासनाचा निर्णय नाही. त्यामुळे या जनता कर्फ्यूमध्ये कोणाला सहभागी व्हायचे ते त्याने ठरवावे. आम्ही कोणावरही कारवाई करणार असे आश्वासन मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी दिले. त्यानंतर व्यापाºयांनी आपले व्यवसाय सुरु ठेवण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे