शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

शेतकरी, शेतमजुरांना लखपती बनविणार समृध्दी बजेट मी समृध्द, तर गाव समृध्द : खर्च वजा जाता १ लाख उत्पन्नासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST

धुळे : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘मी समृध्द, तर गाव समृध्द’ ही योजना हाती घेतली ...

धुळे : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत ‘मी समृध्द, तर गाव समृध्द’ ही योजना हाती घेतली आहे. शेतकरी, शेतमजुरांना लखपती बनविण्यासाठी गावनिहाय समृध्दी बजेट तयार केला जाणार आहे. ग्रामीण भागातील कुटुंबांना सर्व खर्च वजा जाता वर्षाकाठी १ लाख रुपये निव्वळ नफा मिळावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

‘मी समृध्द तर गाव समृध्द’ योजनेअंतर्गत प्रत्येक गावाचा अभ्यास करून २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी गावनिहाय समृध्दी बजेट तयार करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. बजेट तयार करण्यासाठी ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक, अधिकारी, कर्मचारी, यंत्रणांना लवकरच प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी योजनेचा प्रारंभ होणे अपेक्षित आहे. त्यानंतर गावफेरी, शिवारफेरी काढून योजनेची जनजागृती करीत सर्व घटकांना यात सहभागी करून घेतले जाईल, अशी माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी ‘लोकमत’ला दिली.

आतापर्यंत रोहयोमधून फक्त रोजगाराकडे किंवा मजुरीकडे लक्ष दिले गेले; परंतु आता लेबर बजेटला समृध्द बजेट करण्याचे धोरण शासनाने आखले आहे. राहेयोमधून कोणती कामे घ्यावीत, याचा निर्णय ग्रामपंचायत घेत असे. पंरतु आता शेतकरी, शेतमजूर, गावकऱ्यांशी चर्चा करून तसेच गावांचा सर्व्हे करून लेबर बजेट तयार होईल. या बजेटला पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर मंजुरी मिळाल्यानंतर कामे सुरू होतील.

प्रती एकर १ लाख उत्पन्नासाठी प्रयत्न

शेतकरी कुटुंबाला लखपती करण्यासाठी पीक पध्दतीत बदल करणे, शेतीकडे केवळ उदरनिर्वाहाचे साधन म्हणून न पाहता व्यवसाय म्हणून पाहण्यासाठी मानसिकता तयार केली जाणार आहे. त्यासाठी विकेल ते पिकेल, ही संकल्पना राबविली जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण तसेच राेहयोच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जातील.

शेतमजुरांची मालमत्ता तयार करण्यासाठी प्रयत्न

ग्रामीण भागातील मजूर रोजगारासाठी महानगरांकडे स्थलांतरित होतात. त्यामुळे त्यांना केवळ मजुरी मिळते, पण मालमत्ता तयार होत नाही. पंरतु त्यांना गावपातळीवरच रोहयोच्या सर्व २६२ कामांची माहिती देऊन रोजगार किमान १०० दिवस काम उपलब्ध करण्यात येईल. त्यामुळे त्यांच्याकडे मालमत्तादेखील निर्माण होईल. या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

गावाचा माथा ते पायथा विकास

‘कुटुंब समृध्द, तर गाव समृध्द’ अशी शासनाची संकल्पना आहे. कुटुंब समृध्द करण्यासाठी गावात रोहयोतून विकासाची कामे घेऊन गावाचा माथा ते पायथा विकास करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. शिक्षण, पोषण, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्ते, शेतमाल साठविण्यासाठी गोदाम, मृदा व जलसंधारणाची कामे, सिचंन पध्दती, बाजारपेठे, सेंद्रीय शेती आदी कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.