शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

‘कोथंबिरी’चे दर भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 22:35 IST

पावसाळा असूनही भाज्यांचे दर वाढलेलेच । सर्वसामान्यांच्या खिशाला बसतेय झळ

धुळे : पावसाचे दिवस सुरु असूनही सर्वसामन्यांसाठी जीवनावश्यक असणाऱ्या भाज्यांच्या दरात घट होत नसून दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे चित्र शहरातील बाजारपेठेत पहावयास मिळत आहे़ इतर भाज्यांप्रमाणेच कोथंबिरचे दर तर गगनाला भिडले असल्यामुळे सामान्य लोकांकडून कोथंबिरीची खरेदी होताना दिसत नाही़ बटाटे, टमाट्यांसह अन्य भाज्यांचे दर तसे वाढलेले आहे़लॉकडाऊनचा काळ आणि आताचा अनलॉकचा काळ लक्षात घेता भाज्यांच्या दरात घट होईल असे चित्र पहावयास मिळेल, अशी अपेक्षा असताना मात्र ती पोल ठरली आहे़ लॉकडाऊनच्या काळात भाजीपाला विक्रीसाठी वेळेचे बंधन ठेवण्यात आलेले होते़ दुपारी ४ वाजेनंंतर भाजी विक्री बंद होत होती़ त्यामुळे सुरुवातीच्या काळात भाजांचे दर तसे वाढलेलेच होते़ एरव्ही १० रुपये पावशेर मिळणारी भाजी आताच्या या काळात २० रुपयांपर्यंत जावून पोहचली आहे़ त्यात कोबी, गिलके, दोडके, गवार, कांद्याची पात यांचा समावेश आहे़ तर वांगे ३० रुपये पावशेर या दराने विक्री होत आहे़कोथिंबीर ठरतेय वरचढकोथिंबीरचे उत्पादन स्थानिक ठिकाणी होत असल्याने धुळे तालुक्यातून कोथिंबीरचे मोठ्या प्रमाणात आवक होते़ मागणी वाढत असल्याने १५० ते २०० रुपये किलो दराने त्याची विक्री होत आहे़ त्यामुळे सध्या बाजारात कोथिंबीरच्या खरेदीत घट झाल्याचे दिसून येत आहे़ कोथंबिरचे दर हे सर्वाधिक वाढलेले आहे़अद्रकाची मागणी वाढलीकोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये़़, यासाठी नागरिकांकडून रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विविध उपाय- योजना केले जात आहे़ दैनंदिनी वापरात काढ्यासाठी तसेच चहात अद्रकचा वापर वाढल्यामुळे अद्रकची मागणी वाढली आहे़ ३० रुपयाला ५० ग्रॅम अद्रक मिळत आहे़वटाणे बाजारात दाखलशहरातील पाच कंदील परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांकडे दोन दिवसांपासून वाटाणा दाखल झाला आहे. पुणे येथून सध्या वाटाण्याची आवक होत आहे. वाटण्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत वाटाणे ८० ते १०० रुपयांप्रमाणे त्यांची विक्री होत आहे. भाव कमी होऊ शकतात अशी अपेक्षा विक्रेत्यांना आहे़ दरम्यान, भाज्यांचे दर हे दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे घर कसे चालवावे? हा मोठा प्रश्न गृहिणींसमोर निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे़मागील आठवड्यात ८० ते ९० रुपये प्रति किलो प्रमाणे टोमॅटोची विक्री होती, आता हेच दर १०० रुपयांपर्यंत पोहचले आहे़ तसेच शिमला मिरचीचे भाव दुप्पट झाले आहेत. काही आठवड्यापूर्वी ४० रुपये प्रति किलो असलेल्या शिमला मिरचीचा दर ८० रुपयांवर गेला आहे. गवारच्या शेंगांच्या भावातही वाढ झाली आहे. ८० रुपयांना एक किलो या दराप्रमाणे त्यांची विक्री होत आहे. तसेच चवळीच्या शेंगा देखील भाव खात असून ६० रुपये किलो प्रमाणे त्यांची विक्री होत आहे. मिरची सध्या ४० रुपये किलो प्रमाणे विकली जाते आहे. मागील काही आठवड्यांपासून मिरचीचे भाव स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. वालच्या शेंगांची ६० रुपये प्रतिकिलो या दराप्रमाणे विक्री होत आहे तर भेंडी ४० रुपये किलोप्रमाणे विकली जात आहे. तसेच फुलकोबीची ४० रुपये प्रतिकिलो याप्रमाणे विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़

टॅग्स :Dhuleधुळे