शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
4
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
5
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
6
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
7
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
8
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
9
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
10
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
12
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
13
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
14
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
15
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
16
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
17
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
18
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
19
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
20
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

सरपंचपदाचे आरक्षणाकडे लक्ष लागून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:32 IST

मुदत संपलेल्या तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली़ यांपैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित २८ ग्रामपंचायतींसाठी १५ ला ...

मुदत संपलेल्या तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली़ यांपैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित २८ ग्रामपंचायतींसाठी १५ ला मतदान घेऊन १८ ला निकाल जाहीर करण्यात आला़ अनेक ठिकाणी संपूर्ण पॅनल विजयी झाले आहे; तर बहुतांश ठिकाणी सत्तेचे चित्र स्पष्ट झाले आहे़ तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता बसणार आहे़

महाआघाडी सरकारने सरपंचपदाची थेट निवड रद्द केल्याने ग्रामपंचायत सदस्यांना पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे़ त्यामुळे या निवडणुकीत युवकही उत्साहाने सहभागी झाले होते़ अनेक ठिकाणी युवकांनी प्रस्थापितांना धक्का दिला आहे़

आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष सरपंचपदांच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे़ सरपंचपदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण हे तालुकास्तरावर, तर महिला आरक्षण जिल्हास्तरावर काढण्यात येणार आहे़ आरक्षण सोडतीनंतर सरपंचपद निवडीसाठी घडामोडींना वेग येणार आहे़ जिल्हा प्रशासनाने २७ रोजी तहसील स्तरावर, तर २९ जानेवारी रोजी जिल्हास्तरावर महिला आरक्षण सोडत काढण्याचे नियोजन केल्याची माहिती आहे़ मात्र जिल्हा प्रशासनाने आरक्षण सोडतीच्या अधिकृत तारखेची घोषणा केलेली नाही़ जिल्हाभरातील ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांचे लक्ष आता सरपंचपदांच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे़

सदस्य निघाले वारीवर

मतमोजणीच्या दिवशीच बहुतांश गावातील नवनिर्वाचित सदस्य व सदस्यांचे पतिराज गावात न थांबविता पॅनल प्रमुख त्यांना फिरायला घेऊन गेले. जोपर्यंत सरपंच आरक्षणाची तारीख निश्चित होत नाही, तोपर्यंत ते सदस्य बाहेरगावी थांबण्याची शक्यता आहे़

मतदानाचे पर्याय

सरपंचपदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तर अशा वेळी हजर सदस्यांचे मतदान घेण्याचा नियम आहे़ त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित सदस्यांचे आवाजी, हात वर करून किंवा गोपनीय चिठ्ठी पद्धतीने मतदान घेतात़ मतमोजणी झाल्यानंतर जास्त मते मिळविणारा उमेदवार सरपंच म्हणून विजयी घोषित केला जातो, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली़

सत्तेचे समीकरण

जुळविणे सुरू

ग्रामपंचायत निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे समर्थित व अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत़ यांपैकी कोणाची सरपंच, उपसरपंचपदी वर्णी लावायची याचे समीकरण तयार करण्याचे काम निवडणुका झालेल्या गावांमध्ये सध्या सुरू आहे़ हे समीकरण जुळविताना कुणी नाराज तर होणार नाही ना, याचीही काळजी घ्यावी लागत असल्याने प्रमुखांचीही चांगलीच दमछाक होत आहे़

कोण होणार गावचा कारभारी?

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करून आपल्या गावाचा कारभार चालविण्यासाठी सदस्यांची निवड केली़; पण आता गावाचा सरपंच कोण होणार याकडे नजरा लागल्या आहेत़ निवडून आलेल्या सदस्यांपैकी एकाची सरपंचपदी वर्णी लागणार आहे, त्यामुळे याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे़