शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

सरपंचपदाचे आरक्षणाकडे लक्ष लागून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:32 IST

मुदत संपलेल्या तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली़ यांपैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित २८ ग्रामपंचायतींसाठी १५ ला ...

मुदत संपलेल्या तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली़ यांपैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित २८ ग्रामपंचायतींसाठी १५ ला मतदान घेऊन १८ ला निकाल जाहीर करण्यात आला़ अनेक ठिकाणी संपूर्ण पॅनल विजयी झाले आहे; तर बहुतांश ठिकाणी सत्तेचे चित्र स्पष्ट झाले आहे़ तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता बसणार आहे़

महाआघाडी सरकारने सरपंचपदाची थेट निवड रद्द केल्याने ग्रामपंचायत सदस्यांना पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे़ त्यामुळे या निवडणुकीत युवकही उत्साहाने सहभागी झाले होते़ अनेक ठिकाणी युवकांनी प्रस्थापितांना धक्का दिला आहे़

आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष सरपंचपदांच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे़ सरपंचपदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण हे तालुकास्तरावर, तर महिला आरक्षण जिल्हास्तरावर काढण्यात येणार आहे़ आरक्षण सोडतीनंतर सरपंचपद निवडीसाठी घडामोडींना वेग येणार आहे़ जिल्हा प्रशासनाने २७ रोजी तहसील स्तरावर, तर २९ जानेवारी रोजी जिल्हास्तरावर महिला आरक्षण सोडत काढण्याचे नियोजन केल्याची माहिती आहे़ मात्र जिल्हा प्रशासनाने आरक्षण सोडतीच्या अधिकृत तारखेची घोषणा केलेली नाही़ जिल्हाभरातील ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांचे लक्ष आता सरपंचपदांच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे़

सदस्य निघाले वारीवर

मतमोजणीच्या दिवशीच बहुतांश गावातील नवनिर्वाचित सदस्य व सदस्यांचे पतिराज गावात न थांबविता पॅनल प्रमुख त्यांना फिरायला घेऊन गेले. जोपर्यंत सरपंच आरक्षणाची तारीख निश्चित होत नाही, तोपर्यंत ते सदस्य बाहेरगावी थांबण्याची शक्यता आहे़

मतदानाचे पर्याय

सरपंचपदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तर अशा वेळी हजर सदस्यांचे मतदान घेण्याचा नियम आहे़ त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित सदस्यांचे आवाजी, हात वर करून किंवा गोपनीय चिठ्ठी पद्धतीने मतदान घेतात़ मतमोजणी झाल्यानंतर जास्त मते मिळविणारा उमेदवार सरपंच म्हणून विजयी घोषित केला जातो, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली़

सत्तेचे समीकरण

जुळविणे सुरू

ग्रामपंचायत निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे समर्थित व अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत़ यांपैकी कोणाची सरपंच, उपसरपंचपदी वर्णी लावायची याचे समीकरण तयार करण्याचे काम निवडणुका झालेल्या गावांमध्ये सध्या सुरू आहे़ हे समीकरण जुळविताना कुणी नाराज तर होणार नाही ना, याचीही काळजी घ्यावी लागत असल्याने प्रमुखांचीही चांगलीच दमछाक होत आहे़

कोण होणार गावचा कारभारी?

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करून आपल्या गावाचा कारभार चालविण्यासाठी सदस्यांची निवड केली़; पण आता गावाचा सरपंच कोण होणार याकडे नजरा लागल्या आहेत़ निवडून आलेल्या सदस्यांपैकी एकाची सरपंचपदी वर्णी लागणार आहे, त्यामुळे याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे़