शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

आमची लढाई गोटेंशी नाहीच, त्यांची उगाच आदळआपट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 21:57 IST

सुभाष भामरे : गुंड कोण हे आता जनतेनेच ठरवावे

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आम्ही लोकसंग्राम पक्षाला गृहीत धरत नाही़ त्यामुळे आमची लढाई काँग्रेस-राष्ट्रवादीशी असून आमदार उगाच आदळआपट करीत असल्याची टीका केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी केली़ शहरात शुक्रवारी लोकसंग्रामच्या गुंडांनी जो धुमाकूळ घातला तो जनतेने पाहिला़ पारोळयाचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या गाडीचा क्रमांक एमएच १९ होता म्हणून फोडण्यात आली़ शिवाय त्यांना साधी तक्रारही देता आली नाही, हे दुर्देव आहे़ काही कारण नसतांना गाडी फोडल्याने आमदारांनी कार्यकर्त्यांना सुनावायला हवे होते तर त्यांनी पोलीस ठाण्यात धुडगूस घातला़ अखेर पोलीसांना माघार घ्यावी लागली, ही लोकशाही की दडपशाही? असे डॉ़ भामरे म्हणाले़ त्याचप्रमाणे भाजप प्रांतिक कार्यालयातून १७ जणांची टिम धुळयात जनजागृतीसाठी आली होती, त्यांनाही लोकसंग्रामचे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोंडून देत हुज्जत घातली़ प्रभाग एकमध्ये भाजप कार्यकर्ते रात्री घरी जात असतांना लोकसंग्रामच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली़ गुंडगिरी करून जनतेत दहशत निर्माण करण्याचे काम लोकसंग्रामकडून सुरू असून शहरात गुंडगिरी चालू देणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी आधीच दिला आहे, असे डॉ़ भामरे म्हणाले़ शहरातील गुंडगिरी थोपविण्यासाठी गृहखाते सक्षम आहे़ भाजपकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याच्या आरोपात तथ्य नाही़ मतदानानंतर हा मुद्दा गांभीर्याने घेणार आहोत़  भाजप प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतो, म्हणून आमचे नेते प्रचाराला येतात़ तुमच्याकडे नेतेच नाही, तर तुम्ही आणणार कुठून? असा प्रश्न संरक्षण राज्यमंत्री डॉ़ भामरे यांनी उपस्थित केला़ शिवाय शहरात गुंड कोण, हे आता जनतेनेच ठरवावे, असेही ते म्हणाले़ 

टॅग्स :Dhuleधुळे