शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

भरधाव दुचाकी घसरून एकाचा मृत्यू, शिरपूर तालुक्यातील तरडी गावाजवळील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: February 8, 2024 16:36 IST

मच्छिंद्र मोहन शिरसाठ (वय ४९) असे मयत व्यक्तीचे नाव आहे

देवेंद्र पाठक, धुळे: भरधाव वेगाने असलेल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने उपचार घेताना मृत्यू झाला. ही घटना शिरपूर तालुक्यातील तरडी गावाच्या शिवारात सोमवारी पहाटे झाली होती. बुधवारी थाळनेर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली. मच्छिंद्र मोहन शिरसाठ (वय ४९, रा. भावेर, ता. शिरपूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

भरधाव वेगाने असलेल्या दुचाकीचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरली. अपघाताची ही घटना शिरपूर तालुक्यातील तरडी गावाच्या शिवारातील पाटचारीजवळ साेमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. दुचाकीवरील चालक मच्छिंद्र मोहन शिरसाठ हे भावेर गावाकडून तरडी गावाकडे येत असताना दुचाकीसह दूरवर फेकले गेले. यात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. फेकल्या गेल्याने मच्छिंद्र यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली. बराच वेळ ते अपघातस्थळी विव्हळत पडून होते. रस्त्त्यावरून वावरणाऱ्यांच्या लक्षात हीबाब येताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.दुचाकीची नंबर प्लेट तुटल्यामुळे सुरुवातीला त्यांची ओळख पटली नाही. पण मोटार सायकलीच्या चेसिस नंबरवरुन ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी बुधवारी थाळनेर पोलिस ठाण्यात गौतम मोहन शिरसाठ यांनी दिलेल्या माहितीवरून मोटारसायकल चालक मयत मच्छिंद्र मोहन शिरसाठ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक दीपक पावरा घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूAccidentअपघात