शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात ना DJ ना बॅण्ड, भक्तीगित अन् पांडुरंगाच्या भजनात रंगला विवाह सोहळा

By सचिन देव | Updated: December 15, 2023 19:20 IST

नवरदेवाने स्वत: मृदुंग वाजवून म्हटली पाडुरंग आणि संत मुक्ताईबाईची भजने

चाळीसगाव : हिंदू संस्कृतीमध्ये विवाह सोहळा म्हणजे सोळा संस्कारांपैकी एक सोहळा. बहुतेक जण आपले लग्न नाचणे, कुदणे अन् फटाक्यांची आतषबाजी अशा प्रकारे धुमधडाक्यात करित असतो. मात्र, चाळीसगावातील एका उच्च शिक्षित तरूणााने या पारंपारिक पद्धतीने धुमधडाक्यात होणाऱ्या लग्न सोहळ्याला फाटा देत, भक्तीगित अन् पाडुंरंगाचे भजनाचा कार्यक्रम ठेवून आपले लग्न लावले. विशेष म्हणजे या नवरदेवाने स्वत: पाडुरंगावरील भजन म्हणुन संसार करण्यासोबत परमार्थही करण्याचा संदेश पाहुण्या मंडळींना दिला. या अनोख्या लग्न विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील पवार वाडीतील रहिवासी चेतन मोहन पवार यांचा तरूणाचा विवाह शुक्रवारी १५ डिसेंबर रोजी अकोला येथील तरूणीशी चाळीसगावात पार पडला. चेतन पवार हे उच्चशिक्षित असून, एका बॅंकेत नोकरीला आहेत. विशेष म्हणजे चेतन यांना लहानपणापासून भक्तीमार्गाची आवड असून, गावात आणि परिसरात होणाऱ्या कीर्तन सोहळ्यात ते मृदुंग वादन करत असतात. भक्तीमार्गाची आवड असल्याने चेतन यांनी आपल्या लग्नात डी. जे. लावला नाही, तसेच कुठला बॅन्डही लावला नाही. सकाळपासून लग्नाच्या ठिकाणी त्यांनी हरिपाठ व भजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे लग्नाला आलेल्या पाहुण्यानांही हा प्रकार पाहुन आश्चर्य वाटले.

नवरदेवाने स्वत : मृदुंग वाजवून म्हटली, पाडुरंग आणि संत मुक्ताईबाईची भजने :

चेतन पवार यांनी आपल्या लग्नात मित्र-परिवाराच्या आग्रहास्तव लग्नात ढोल-ताशाही लावला होता. मात्र, यावेळी त्यांनी स्वत: लग्न मंडपांत मृदुंग वाजवून `पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागतं, मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पाडुरंग विठ्ठला अशा प्रकारचे पाडुरंग आणि संत मुक्ताईबाईवरील भजने म्हटली. यामुळे लग्न मंडपात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. लग्न सोहळ्यात जणू कीर्तन सोहळ्याचा अनुभव पाहुणे मंडळींनी घेतला. विशेष म्हणजे नवरदेवाचे विविध गावातील कीर्तनकार व भजनी मंडळींनीदेेखील विविध संतानी लिहलेले अभंग सादर केले.

महाराष्ट्राला संताची आणि वारकरी परंपरेची परंपरा लाभली आहे. त्यामुळे लहान पासून भक्तीभावाचे संस्कार आई-वडिलांकडुन मिळाल्याने स्वत :चे लग्न पाडुंरंग-विठ्ठलाच्या नामस्मरणात झाले पाहिजे अशी ईच्छा होती. यातुन संसारासोबत प्रत्येकाने परमार्थ करावा, हे आवाहन करण्यात आले.-चेतन पवार, नवरदेव, चाळीसगाव.

टॅग्स :Dhuleधुळेmarriageलग्न