शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

Marathi Sahitya Sammelan: साहित्य संमेलन भरविणे हे काही सरकारचे काम नाही! न्या. नरेंद्र चपळगावकर यांचं मत

By आनंद इंगोले | Updated: February 4, 2023 07:47 IST

Marathi Sahitya Sammelan: साहित्य संमेलने आयोजित करणे ही सरकारची जबाबदारी नाही. स्वायत्त संस्थांच्या माध्यमातूनच संमेलनाचे आयोजन व्हावे, असे प्रतिपादन ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी करून सरकारची पाठही थोपटली अन् दणकाही दिला.

- आनंद इंगोलेराष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी (वर्धा) : बेळगावसारख्या सीमावर्ती भागामध्ये मायमराठीला समृद्ध करण्यासाठी शासनाने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे; परंतु साहित्य संमेलने आयोजित करणे ही सरकारची जबाबदारी नाही. स्वायत्त संस्थांच्या माध्यमातूनच संमेलनाचे आयोजन व्हावे, असे प्रतिपादन ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी करून सरकारची पाठही थोपटली अन् दणकाही दिला.

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तत्पूर्वी, शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. ध्वजारोहण आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

शब्द नसते तर जीवन अंधकारमय असते : विश्वनाथप्रसाद तिवारीरामायण, महाभारताने पूर्ण देशाला एका सूत्रात बांधले. भाषा हा जीवनातील महत्त्वाचा आविष्कार आहे. मनुष्याला रूप परमेश्वराने दिले; पण नाव माणसाने दिले आहे. या माणसाला पशूपासून अलग करण्याचं काम  भाषा करीत असते. या भाषेला शब्दांमुळे समृद्धता येते. जर शब्द नसते तर आपले जीवनच अंधकारमय झाले असते, असे मत हिंदी साहित्यिक विश्वनाथप्रसाद तिवारी यांनी व्यक्त केले. 

तीर्थस्थळी येऊन स्वागत करण्याचं भाग्य लाभलं : उषा तांबेवर्धा हे स्वातंत्र्यसैनिकांचे  तीर्थस्थळ असून या ठिकाणी आयोजित साहित्य संमेलनाच्या भूमीलाही ‘महात्मा गांधी साहित्यनगरी’ व ‘आचार्य विनोबा भावे सभा मंडप’ असे नामकरण करण्यात आले. या तीर्थस्थळावर येऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करण्याचा मान मिळाला, हे भाग्यच आहे, असे मत अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी व्यक्त केले. 

ज्योती विझू  विझू जाई...साहित्य संमेलनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते रोपट्याला पाणी देऊन व दीपप्रज्वलन करून झाले. पंखा सुरू असल्याने दीप काही पेटेना! अखेर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही हात लावले आणि स्वागताध्यक्षांनी दीपप्रज्वलित केले. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी दोन्ही हात लावले आणि मुख्यमंत्र्यांनी दीप पेटविले. यावेळी ‘ज्योती विझू विझू जाई...’ असे शब्द बाहेर पडले. 

तळमळीतून होते साहित्याची निर्मिती : मुख्यमंत्री शिंदेवर्धा : सामाजिक तळमळीतून साहित्याची निर्मिती होते. साहित्यातून समाजाला जगण्याचे बळ मिळते.  त्यामुळे अशा साहित्य संमेलनाची आवश्यकता असून, येथील आयोजन हे सुदृढ सांस्कृतिक लोकशाहीचे विराट रूप आहे, असेही प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सेवाग्राम येथील चरखागृहात बापू आणि विनोबा यांचे शिल्प उभारण्यात आले आहे. तेथे ‘लाइट ॲण्ड फाउंटेन शो’करिता निधी उपलब्ध करून देत लवकरच निर्मिती करणार, अशी घोषणाही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान निदर्शकांची घोषणाबाजीमुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच ‘पन्नास खोके, एकदम ओके... आणि विदर्भातील ५० हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण’, असा सवाल करत काहींनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संमेलनस्थळी एकच गोंधळ उडाला. घोषणाबाजी करणाऱ्यांना आवरण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. अचानक उडालेला गोंधळ बघून मंचावरील मान्यवर मंडळीदेखील अवाक् झाली. यावेळी विदर्भवाद्यांनीदेखील यात उडी घेऊन सभामंडप दणाणून सोडला. 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनMaharashtraमहाराष्ट्र