शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

तोट्यातील पॅसेंजर रेल्वे होणार एक्स्प्रेस; जिल्ह्यातून जाणाऱ्या गाड्यांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:38 IST

धुळे : कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद असलेली धुळे-चाळीसगाव पॅसेंजर अद्याप सुरू झालेली नाही, तर सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर काही पॅसेंजर सुरू ...

धुळे : कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद असलेली धुळे-चाळीसगाव पॅसेंजर अद्याप सुरू झालेली नाही, तर सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर काही पॅसेंजर सुरू झालेल्या आहेत. त्यातच आता या पॅसेंजर गाड्यांचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्याचे केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून धुळे-चाळीसगाव पॅसेंजर अद्याप सुरू झालेली नाही, तर सुरत-भुसावळ मार्गावर दोन पॅसेंजर सुरू असून, एक पॅसेंजर अद्यापही सुरू झालेली नाही. गोरगरीब प्रवाशांना प्रवासासाठी पॅसेंजरच सोयीची ठरत असते. मात्र आता हीच पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित झाली तर ती गाडी लहान स्थानकावर थांबणार नाही. तसेच पॅसेंजरची एक्स्प्रेस झाली की भाडेही वाढणार. दरम्यान, जिल्ह्यातून धावणाऱ्या पॅसेंजर गाड्यांबाबत अद्याप निर्णय नसला तरी या गाड्यांबाबत काय होणार, असा प्रश्न आता प्रवाशांना पडू लागला आहे.

जिल्ह्यातून जाणाऱ्या पॅसेंजर

गाडी क्रमांकनाव सध्या सुरू की बंद

५१११२ धुळे-चाळीसगावबंद

५९०७५ सुरत-भुसावळसुरू

५९०७७ सुरत-भुसावळसुरू

तोट्याची कारणे काय?

सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर अनेक लहान स्थानके आहेत, या पॅसेंजरने फुकट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे. या मार्गावर मोठी स्थानके सोडली तर लहान स्थानकांवर कोणीही फलाट तिकीट काढत नाही.

काही स्थानके अशी आहेत की, त्या स्थानकावरून केवळ-एक-दोन प्रवासी चढतात आणि उतरतात. त्यामुळे पॅसेंजरला केवळ थांबा असतो. रात्रीच्यावेळी धावणाऱ्या पॅसेंजरसाठी लहान स्थानकावर प्रवासीही उपलब्ध नसतात. एक्स्प्रेस सुरू झाल्यास, त्यातून रेल्वेला दुप्पट भाडे मिळू शकेल असा विचार आहे.

सर्वसामान्यांना एक्स्प्रेस

कशी परवडणार?

ग्रामीण भागात प्रवास करण्यासाठी पॅसेंजर गाडीच सोयीची असते. मात्र हीच पॅसेंजर जर एक्स्प्रेस झाली तर प्रवास कसा करायचा असा प्रश्न आहे. शिवाय ती एक्स्प्रेस लहान स्थानकावर थांबणार नाही.

रणजित पाटील, प्रवासी

केंद्र शासनाने पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला असेल तर तो चुकीचा आहे. हा सर्वसामान्य प्रवाशांवर अन्याय आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागेल.

बी.आर. चौधरी, प्रवासी