शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

धुळे तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींना ४६ लाख भरण्यासाठी पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 16:25 IST

अक्कलपाडा प्रकल्प पाणी आरक्षण : थकीत रक्कम तातडीने भरण्याचे पाटबंधारे विभागाने दिले आदेश

ठळक मुद्देपांझरा नदी किनारी असलेल्या गावांमध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.पांझरा नदी काठावरील ग्रामस्थांनी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.मात्र, पाटबंधारे विभागाने एकूण थकबाकी पैकी ५० टक्के थकीत रक्कम जमा करण्याची अट घातल्यामुळे आता ज्या गावांसाठी आरक्षित पाणी आहे. त्या गावाच्या ग्रामपंचायतींनी ही रक्कम भरणे गरजेचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या पाणी आरक्षणाची एकूण थकबाकी ९७ लाख ९१ हजार इतकी झाली आहे. पैकी ५० टक्के रक्कम अर्थात ४५ लाख ९६ हजार रुपये तातडीने भरावे,  असे आदेश पाटबंधारे विभागाने जिल्हा परिषदेला दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून ज्या ३३ गावांसाठी पाणी आरक्षित आहे. अशा गावातील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे बिगर सिंचन पाणीपट्टी वसुलीसाठी पत्र दिले जाणार आहे.अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून ३३ गावांसाठी पाणी आरक्षित आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीकडून बिगर सिंचन पाणीपट्टी वसूल करून ही रक्कम पाटबंधारे विभागाला दिली जाते. त्यानुसार संबंधित ३३ गावांना अक्कलपाडा धरणातून पाणी हे सोडले जाते. परंतु, गेल्यावर्षी व यंदा अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी अद्याप जमा केलेली नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी, तब्बल ९७ लाख ९१ हजार इतकी थकबाकी थकली आहे.थकबाकी भरल्याशिवाय आवर्तन सोडणार नाही नुकतेच धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. टी. सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांना पत्र दिले आहे. एकूण थकबाकी पैकी ५० टक्के रक्कम तातडीने जमा करण्याचे पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार ४५ लाख ९६ हजार पाटबंधारे विभागाकडे जमा करावे लागणार आहे. ही रक्कम जमा होत नाही; तोपर्यंत अक्कलपाडा धरणातून आवर्तन सोडणार नाही, असा इशारा पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आला आहे.  गेल्यावर्षी दहा लाख भरले सन २०१६-२०१७ अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पांझरा नदीकाठावरील धुळे, शिंदखेडा, अमळनेर (जि. जळगाव) तालुक्यातील गावांना २०० दलघफु पाणी आरक्षित केले होते. प्रत्यक्ष अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सन २०१६-२०१७ या वर्षात दोन आवर्तनासाठी ४६२ दलघफू इतके पाणी सोडण्यात आले. तसेच पाणी आरक्षणाची पाणीपट्टी ही ४१ लाख ४५ हजार इतकी झाली होती. मात्र, ३१ मार्च २०१७ पर्यंत १० लाखाची थकबाकी जमा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु, २०१७-२०१८ या कालावधिसाठी जिल्हाधिकाºयांनी ४६२ दलघफू पाणी आरक्षित केले असून पहिल्या आवर्तनास २७६ दलघफू इतके पाणी सोडण्यात आले. या पाण्याची आकारणी २४ लाख ७६ हजार इतकी आहे. तसेच गेल्या वर्षाची ३१ लाख ७० हजार व चालू आकारणी ६६ लाख २१ हजार अशी एकूण ९७ लाख ९१ हजार इतकी पाणीपट्टी थकीत झाली आहे. 

या गावांसाठी आहे पाणी आरक्षितनवे भदाणे, जुने भदाणे, नेर, अकलाड, मोराणे प्र नेर, खेडे, वार, कुंडाणे वार, मोराणे प्र. ल., वलवाडी, देऊर खुर्द, देऊर बुद्रूक, नकाणे, कुसुंबा, मेहेरगाव, कावठी, बिलाडी, भोकर, निमडाळे, निमखेडे, शिरधाणे प्र. डां, जापी, न्याहळोद, मोहाडी प्र. डां, विश्वनाथ, सुकवड, कौठळ, हेंकळवाडी, तामसवाडी, कापडणे, कुंडाणे (वरखेडे), लोणखेडी, नांद्रे  

टॅग्स :zpजिल्हा परिषदDhuleधुळे