शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

धुळे तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींना ४६ लाख भरण्यासाठी पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 16:25 IST

अक्कलपाडा प्रकल्प पाणी आरक्षण : थकीत रक्कम तातडीने भरण्याचे पाटबंधारे विभागाने दिले आदेश

ठळक मुद्देपांझरा नदी किनारी असलेल्या गावांमध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.पांझरा नदी काठावरील ग्रामस्थांनी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.मात्र, पाटबंधारे विभागाने एकूण थकबाकी पैकी ५० टक्के थकीत रक्कम जमा करण्याची अट घातल्यामुळे आता ज्या गावांसाठी आरक्षित पाणी आहे. त्या गावाच्या ग्रामपंचायतींनी ही रक्कम भरणे गरजेचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या पाणी आरक्षणाची एकूण थकबाकी ९७ लाख ९१ हजार इतकी झाली आहे. पैकी ५० टक्के रक्कम अर्थात ४५ लाख ९६ हजार रुपये तातडीने भरावे,  असे आदेश पाटबंधारे विभागाने जिल्हा परिषदेला दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून ज्या ३३ गावांसाठी पाणी आरक्षित आहे. अशा गावातील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे बिगर सिंचन पाणीपट्टी वसुलीसाठी पत्र दिले जाणार आहे.अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून ३३ गावांसाठी पाणी आरक्षित आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीकडून बिगर सिंचन पाणीपट्टी वसूल करून ही रक्कम पाटबंधारे विभागाला दिली जाते. त्यानुसार संबंधित ३३ गावांना अक्कलपाडा धरणातून पाणी हे सोडले जाते. परंतु, गेल्यावर्षी व यंदा अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी अद्याप जमा केलेली नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी, तब्बल ९७ लाख ९१ हजार इतकी थकबाकी थकली आहे.थकबाकी भरल्याशिवाय आवर्तन सोडणार नाही नुकतेच धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. टी. सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांना पत्र दिले आहे. एकूण थकबाकी पैकी ५० टक्के रक्कम तातडीने जमा करण्याचे पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार ४५ लाख ९६ हजार पाटबंधारे विभागाकडे जमा करावे लागणार आहे. ही रक्कम जमा होत नाही; तोपर्यंत अक्कलपाडा धरणातून आवर्तन सोडणार नाही, असा इशारा पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आला आहे.  गेल्यावर्षी दहा लाख भरले सन २०१६-२०१७ अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पांझरा नदीकाठावरील धुळे, शिंदखेडा, अमळनेर (जि. जळगाव) तालुक्यातील गावांना २०० दलघफु पाणी आरक्षित केले होते. प्रत्यक्ष अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून सन २०१६-२०१७ या वर्षात दोन आवर्तनासाठी ४६२ दलघफू इतके पाणी सोडण्यात आले. तसेच पाणी आरक्षणाची पाणीपट्टी ही ४१ लाख ४५ हजार इतकी झाली होती. मात्र, ३१ मार्च २०१७ पर्यंत १० लाखाची थकबाकी जमा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु, २०१७-२०१८ या कालावधिसाठी जिल्हाधिकाºयांनी ४६२ दलघफू पाणी आरक्षित केले असून पहिल्या आवर्तनास २७६ दलघफू इतके पाणी सोडण्यात आले. या पाण्याची आकारणी २४ लाख ७६ हजार इतकी आहे. तसेच गेल्या वर्षाची ३१ लाख ७० हजार व चालू आकारणी ६६ लाख २१ हजार अशी एकूण ९७ लाख ९१ हजार इतकी पाणीपट्टी थकीत झाली आहे. 

या गावांसाठी आहे पाणी आरक्षितनवे भदाणे, जुने भदाणे, नेर, अकलाड, मोराणे प्र नेर, खेडे, वार, कुंडाणे वार, मोराणे प्र. ल., वलवाडी, देऊर खुर्द, देऊर बुद्रूक, नकाणे, कुसुंबा, मेहेरगाव, कावठी, बिलाडी, भोकर, निमडाळे, निमखेडे, शिरधाणे प्र. डां, जापी, न्याहळोद, मोहाडी प्र. डां, विश्वनाथ, सुकवड, कौठळ, हेंकळवाडी, तामसवाडी, कापडणे, कुंडाणे (वरखेडे), लोणखेडी, नांद्रे  

टॅग्स :zpजिल्हा परिषदDhuleधुळे