शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

महाराष्ट्राला लुटलेले वैभव प्राप्त करून देऊ, धुळ्यातील सभेत उद्वव ठाकरे यांचे आश्वासन

By अतुल जोशी | Updated: May 7, 2024 21:09 IST

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. मात्र याच पंतप्रधानांच्या काळात देशातील महिला सुरक्षित नाही. मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर त्या राज्यात पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी साधी भेटही दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला."

धुळे   :  गेल्या दहा वर्षात गुजरातच्या दोघांनी महाराष्ट्राला  लुटले आहे. मात्र इंडिया आघाडीचे  सरकार केंद्रात  सत्तेत आल्यावर लुटलेले वैभव पुन्हा महाराष्ट्रात आणले जाईल असे आश्वासन उद्ववसेनेचे प्रमुख उद्वव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत  दिले.  

मंगळवारी दुपारी जेलरोडवर सभा झाली. आपल्या अवघ्या १२ मिनिटाच्या भाषणात  ते म्हणाले, . गेल्यावेळी आमच्या माध्यमातून महाराष्ट्रातून जास्त खासदार दिले होते. त्यामुळे मोदी पंतप्रधान झाले. मात्र यावेळी महाराष्ट्रातून त्यांना दिल्लीत पोहचू देणार नाही. देशाची राज्यघटना बदलविण्यासाठीच ४०० पारची घोषणा केली जात आहे. मात्र घटनेचे आपल्याला संरक्षण करावेच लागेल असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. मात्र याच पंतप्रधानांच्या काळात देशातील महिला सुरक्षित नाही. मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर त्या राज्यात पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी साधी भेटही दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDhuleधुळेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४