शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

शिरपुरात स्वच्छता मोहिमेस सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:35 IST

शिरपूर : डेंग्यूसह अन्य आजारांच्या संदर्भात घरोघरी जाऊन तपासणी

शिरपूर : माजीमंत्री अमरिशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने गेल्या ३५ वर्षांपासून शहरात सातत्याने विकासाची कामे झाली आहेत. सर्वांच्या सोयीकरीता अत्याधुनिक हॉस्पिटल लवकरच सुरु करत आहोत. विकासकामांसाठी शासनाच्या निधीची आवश्यक असते, त्यादृष्टीने प्रयत्नशील आहोत. यापुढे कोणतीही समस्या राहणार नाही असे प्रयत्न राहणार असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी मार्गदर्शन करतांना केले़लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष पटेल यांच्या संकल्पनेतून प्रभाग नं. २ मधील संत सेना नगर, करवंद रोडजवळ आर.सी. पटेल फार्मसी कॉलेजच्या पाठीमागे माजी नगरसेवक नाटुसिंग गिरासे यांच्या घराजवळ विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेविका रंजनाबाई सोनवणे, मुख्याधिकारी अमोल बागुल, माजी नगरसेवक नाटूसिंग गिरासे, मनोहर पाटील, भटू माळी, अमोल पाटील, राजेश सोनवणे, उल्हास अग्रवाल, भाऊसाहेब सोनवणे, जयवंत माळी, जगदीश बारी, बाळू पाटील, जय गणेश सोनार, प्रकाश वाघ, भरत बारी, अनिल सोनार, चंदू पाटील, ब्रिजेश थोरात, ज्ञानेश्वर बोरगावकर, आनंद बारी, प्रकाश पाटील, जगन्नाथ माळी, दिनेश बोरसे, प्रवीण बोरसे, राकेश सैंदाणे, राजेंद्र जाधव, अमोल ठाकरे, कमलाकर वाघ, सिद्धेश बोरगावकर, पंकज सैंदाणे, योगेश वाघ, नथ्थू पाटील, सुनील जैन, नगरपालिकेचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, महिला, पुरुष, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपनगराध्यक्ष भूूपेशभाई पटेल म्हणाले, शहरात सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून सर्वांनी हातभार लावावा. शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यमय राहण्यासाठी नगरपालिकेला सर्वांनी सहकार्य करावे. यापुढे आवश्यक तेवढा पाणी पुरवठा नियमित होणारच आहे. पाणीपट्टी योग्य राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत़ विशेष स्वच्छता मोहिमेत संपूर्ण शहराची मोठया प्रमाणात साफसफाई करण्यास सुरुवात झाली आहे. डेंग्यू व इतर आजारांच्या बाबतीत घराघरात जावून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी स्वच्छतेबाबत व आरोग्याबाबत जागृत राहून नगरपालिकेला योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले़ मुख्याधिकारी अमोल बागुल म्हणाले, स्वच्छता बाबत सर्व पूर्तता नगरपालिकेकडून सुरु आहे. डेंग्यू बाबत सर्वांनी काळजी घ्यावी. घरात सुद्धा त्याची उत्पत्ती होते, घरातील सर्वांची जबाबदारी आहे काळजी घेण्याची. घरात फ्रीजमध्ये अळ्या व टेरेसवर स्वच्छता पाहावे. पावसाचे पाणी टेरेसवर कुठे तरी साचलेले असते. आठवड्यातून एकदा सर्वांनी कोरडा दिवस पाळायचा आहे. नगरपालिका आपले काम करेल, पण प्रत्येक नागरिकाने देखील हातभार लावावा असेही ते म्हणालेत़ सूत्रसंचालन योगेंद्र गिरासे यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे