शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

धुळे जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात आरटीईचे मोफत प्रवेश पूर्ण झालेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 11:35 IST

शाळांच्या संख्येत दरवर्षी वाढ, पालकांचीही अनास्था

ठळक मुद्देजिल्ह्यात २०१३ पासून आरटीई मोफत प्रवेशास सुरवात गेल्या पाचवर्षात शाळांच्या संख्येत वाढ झालीप्रवेश पूर्ण झालेलेच नाहीत

आॅनलाइन लोकमतधुळे : आर्थिकदृट्या दुर्बल तसेच वंचीत घटकातील बालकांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून आरटीई अंतर्गत  बालकांना विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के    प्रवेश देण्याची तरतूद  करण्यात आली.  धुळे जिल्ह्यात २०१३ पासून   ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.  शाळा व विद्यार्थी प्रवेशाच्या संख्येत दरवर्षी वाढ करण्यात आलेली आहे.  परंतु गेल्या पाच वर्षात एकाहीवर्षी  १०० टक्के प्रवेश झालेले नाहीत.धुळे जिल्ह्यात आरटीई मोफत प्रवेशाची सुरवात २०१३ पासून झाली.   २०१३-१४  या वर्षासाठी जिल्ह्यातील ३०  शाळांमध्ये १ हजार ६८ विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीत मोफत प्रवेश देण्यात येणार होता. मात्र पहिल्या वर्षी फक्त २६७ विद्यार्थ्यांनीच मोफत प्रवेशाचा लाभ घेतला. यापैकी ८०१ विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतला नाही. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात ४१ शाळांमध्ये १ हजार ६४० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश घेता येणार होता. प्रत्यक्षात फक्त ४१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यावर्षी तब्बल १२३० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. २०१५-१६ या वर्षात समाधानकारक स्थिती होती. यावर्षी ६८ शाळांमध्ये ७०० विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाची संधी दिली होती. त्यापैकी ६९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.म्हणजे यावर्षी फक्त सहा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. २०१६-१७ या वर्षात शाळांची संख्या थोडी घटली. यावर्षी ६० शाळांमध्ये ९९५ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाची संधी होती. त्यापैकी ४९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यावर्षीही ४९६ विद्यार्थी प्रवेशापासून दूरच राहिले. २०१७-१८ यावर्षात ८१ शाळांमध्ये ११३४ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली होती. मात्र त्यापैकी फक्त ८२१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला. तर ३१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाच नाही.याचाच अर्थ गेल्या पाच वर्षात शंभरटक्के विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतलेला नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.प्रवेश पूर्ण न होण्याची अनेक कारणेदरवर्षी अनेक पालक आपल्या पाल्यासाठी मोफत प्रवेशासाठी अर्ज करीत असतात. मात्र पाल्याची निवड झाली तरी ते प्रवेश घेण्यासाठी शाळेपर्यंत जातच नाही. काहीजण कागदपत्रांची आवश्यक ती पूर्तता करीत  नाही. काहीजण वैय्यक्तीक कारणास्तव पाल्याचा प्रवेश घेत नाही अशा नानाविध कारणामुळे दरवर्षी जागा रिक्त राहतात. या रिक्त जागा नंतर भरल्या जात नाही. त्यामुळे कमी प्रवेशितांची संख्या जास्त दिसते, असेही सांगण्यात आले.शाळशंची रक्कम बॅक खात्यात जमाआरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची फी शासनच शाळांना अदा करीत असते. त्याअनुषंगाने २०१३ ते २०१६ या कालावधीतील तब्बल ३ कोटी ५२ लाख ९६ हजार ७८८ रूपयांची रक्कम सीएमडी प्रणालीद्वारे त्या-त्या शाळेच्या बॅँक खात्यावर १०० टक्के जमा करण्यात आलेली आहे. याासाठी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी शासनाशी केलेल्या पाठपुराव्यामुळेच ही संपूर्ण रक्कम जमा होऊ शकलेली आहे.२०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील १ कोटी ६ लाख ७४ हजार ६६५ रूपयांचे अनुदान अद्याप प्राप्त झालेले नाही. त्याचे बजेट शासनाकडे पाठविण्यात आलेले आहे.