शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

धुळे जिल्ह्यातील अमरावती धरणातून अखेरसोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 12:01 IST

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने पाणी सोडण्याचा घेतला निर्णय

ठळक मुद्देधरण भरल्याशिवाय पाणी सोडू न देण्याचा ग्रामस्थांनी इशारा दिला होताधरणाच्या जलसाठ्यात वाढ होत असल्याने सोडले पाणी

आॅनलाइन लोकमतमालपूर (जि.धुळे) : अमरावती मध्यम प्रकल्पाच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्याने, धरणातील जलसाठ्यात वाढ होणार असल्याने, या प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून मंगळवारी पाणी सोडण्यात आले.अमरावती धरण शंभर टक्के भरल्याशिवाय एक थेंब देखील पाणी सोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत मालपूर (ता. शिंदखेडा) येथील शेतकऱ्यांनी सोमवारी अमरावती धरणाच्या गेटजवळ ठिय्या आंदोलन करीत पाणी सोडण्यास विरोध केला होता. दरम्यान अमरावती प्रकल्पातील जलसाठ्यात जलदगतीने वाढ होत असल्याने, पाटबंधारे विभागाचे प्रभारी अभियंता प्रशांत खैरनार, उपअभियंता जी.एम. शेख यांनी मंगळवारी सकाळी प्रकल्पावर येऊन पहाणी केली. सकाळी ९ वाजेपर्यंत या प्रकल्पात २२५.१५ मीटर जलसाठा होता. शासन निर्णयानुसार तो साठा १० सप्टेंबरपर्यंत २२४.४५ एवढाच ठेवावा लागणार आहे. शिवाय धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्याने आणखी जलसाठ्यात वाढ होणार असल्याचे गांभीर्य ओळखून या प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून १५ से.मी.ने दरवाजे वर करून पाणी सोडण्यात आले.यावेळी लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे, विखरणचे सरपंच महेंद्र पवार, उपसरपंच उमेश पाटील, मालपूरचे ग्रा.प. सदस्य अरूण धनगर, बापू शिंदे, संतोष कोळी, तुकाराम माळी, भूषण रावल, पोलीस पाटील बापू बागूल, जगदीश खंडेराय, सुरेश पाटील, मगन चौधरी, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे