शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

माध्यमिक शिक्षण विभागाची लक्करे पुन्हा वेशीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:42 IST

शिक्षण विभागातून शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य मिळावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. मात्र येथील शिक्षण विभागात उलट स्थिती पहावयास मिळते. शिक्षण ...

शिक्षण विभागातून शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य मिळावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. मात्र येथील शिक्षण विभागात उलट स्थिती पहावयास मिळते. शिक्षण विभागात कुठलेही कामकाज पैशांशिवाय होत नाही, असा जो नेहमी आरोप होता, तो खरा असावा असे या प्रकारानंतर लक्षात येते. या शिक्षण विभागात लाचखोरीमुळे काही अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली आहे. तर येथे कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याला पुण्यात लाच घेताना पकडण्यात आले होते. एवढे होऊनही सुधारणा मात्र काहीच झालेली नाही.

आता वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी, संच मान्यताच्या घोळामुळे येथील शिक्षण विभाग पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातून वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडीचा मोठाच भोंगळ कारभार सुरू होता. पैश्यांची देवाण घेवाण करून अगदी संचमान्यता देखील बदलवण्यात आल्या. अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर देखील जुन्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने वैयक्तिक मान्यता देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत बोगस वैयक्तिक मान्यता देण्याचे उद्योग सुरू होते. उपसंचालक नितीन उपासनी यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील दप्तर जप्त केले होते. यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार असल्याचे लक्षात आल्याने शिक्षण उपसंचालकांनी सहा सदस्यीय चौकशी समिती गठीत केली होती. ही चौकशी समिती गुरुवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात दाखल झाली होती.

फाइली पाहून समितीचे सदस्यही झाले अवाक

चौकशीसाठी दाखल समितीही सर्व कामकाज पाहून अवाक झाली. वेतन सुरू झालेले किंवा शालार्थ आयडीसाीठी प्रस्ताव दाखल केलेल्या अनेकांचे दस्तावेज सापडत नाहीत. फाईलीची नोंदच कार्यालयात नाही. शिवाय काही प्रकरणांमध्ये शिक्षकाची पदवीनंतर व मान्यता आधी असल्याचे समोर आले आहे. संचमान्यता व अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनातही भाेंगळ कारभार दिसून आला. या सर्व प्रकारामुळे माध्यमिक शिक्षण विभागाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत. चौकशी समितीने दस्तावेज ताब्यात घेतली आहे, तर त्यातून काहीतरी निष्पन्न झाले पाहिजे. तसेच दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा दरवेळा तक्रार होईल, समिती चौकशी करेल अन संबंधितावर थातूरमातूर कारवाई करून प्रकरण दडपले जाईल, असे प्रकार होता कामा नये. चुकीची कामे करणाऱ्याला ‘धडा’मिळाला पाहिजे, तरच इतरांवर जरब निर्माण होईल. अन्यथा पुढे पाठ.. मागे सपाट असे होता कामा नये, अशीच शिक्षणप्रेमींची रास्त अपेक्षा आहे.