शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमिक शिक्षण विभागाची लक्करे पुन्हा वेशीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:42 IST

शिक्षण विभागातून शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य मिळावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. मात्र येथील शिक्षण विभागात उलट स्थिती पहावयास मिळते. शिक्षण ...

शिक्षण विभागातून शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य मिळावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. मात्र येथील शिक्षण विभागात उलट स्थिती पहावयास मिळते. शिक्षण विभागात कुठलेही कामकाज पैशांशिवाय होत नाही, असा जो नेहमी आरोप होता, तो खरा असावा असे या प्रकारानंतर लक्षात येते. या शिक्षण विभागात लाचखोरीमुळे काही अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली आहे. तर येथे कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याला पुण्यात लाच घेताना पकडण्यात आले होते. एवढे होऊनही सुधारणा मात्र काहीच झालेली नाही.

आता वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी, संच मान्यताच्या घोळामुळे येथील शिक्षण विभाग पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातून वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडीचा मोठाच भोंगळ कारभार सुरू होता. पैश्यांची देवाण घेवाण करून अगदी संचमान्यता देखील बदलवण्यात आल्या. अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर देखील जुन्या अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने वैयक्तिक मान्यता देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत बोगस वैयक्तिक मान्यता देण्याचे उद्योग सुरू होते. उपसंचालक नितीन उपासनी यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील दप्तर जप्त केले होते. यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार असल्याचे लक्षात आल्याने शिक्षण उपसंचालकांनी सहा सदस्यीय चौकशी समिती गठीत केली होती. ही चौकशी समिती गुरुवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात दाखल झाली होती.

फाइली पाहून समितीचे सदस्यही झाले अवाक

चौकशीसाठी दाखल समितीही सर्व कामकाज पाहून अवाक झाली. वेतन सुरू झालेले किंवा शालार्थ आयडीसाीठी प्रस्ताव दाखल केलेल्या अनेकांचे दस्तावेज सापडत नाहीत. फाईलीची नोंदच कार्यालयात नाही. शिवाय काही प्रकरणांमध्ये शिक्षकाची पदवीनंतर व मान्यता आधी असल्याचे समोर आले आहे. संचमान्यता व अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनातही भाेंगळ कारभार दिसून आला. या सर्व प्रकारामुळे माध्यमिक शिक्षण विभागाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत. चौकशी समितीने दस्तावेज ताब्यात घेतली आहे, तर त्यातून काहीतरी निष्पन्न झाले पाहिजे. तसेच दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा दरवेळा तक्रार होईल, समिती चौकशी करेल अन संबंधितावर थातूरमातूर कारवाई करून प्रकरण दडपले जाईल, असे प्रकार होता कामा नये. चुकीची कामे करणाऱ्याला ‘धडा’मिळाला पाहिजे, तरच इतरांवर जरब निर्माण होईल. अन्यथा पुढे पाठ.. मागे सपाट असे होता कामा नये, अशीच शिक्षणप्रेमींची रास्त अपेक्षा आहे.