शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात २५ हजार मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 16:40 IST

सरकारने २ लाख २७ हजार मेट्रिक टन खताला मंजुरी दिली आहे. त्यातील २५ हजार मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध झाले आहे. 

औरंगाबाद : प्रशासकीय पातळीवर खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. यंदा जिल्ह्यातून ३ लाख मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी आली आहे. सरकारने २ लाख २७ हजार मेट्रिक टन खताला मंजुरी दिली आहे. त्यातील २५ हजार मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध झाले आहे. 

 पुढील महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने रासायनिक खत पुरवठ्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात रासायनिक खताचा सरासरी वापर १८७६८२ मे. टन एवढा आहे. रब्बी हंगामातील ३७०३३ मे. टन खताचा साठा शिल्लक आहे. जिल्हा कृषी विभागाने यावर्षी रासायनिक खताची किती आवश्यकता आहे, याची तालुकानिहाय आकडेवारी मागविली होती. त्यानुसार ३०४७४० मे. टन खताची मागणी  नोंदविली होती.

सरकारने जिल्ह्यातील रासायनिक खताचा सरासरी वापर लक्षात घेऊन खरीप हंगामासाठी २२७३०० मे. टन रासायनिक खत पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. त्यातील २५२६० मे. टन खताचा पुरवठाही झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६२२९३ मे. टन रासायनिक खत उपलब्ध आहे. शासनाने मंजूर केलेल्यामध्ये युरिया ९९१९० मे. टन, डीएपी १७७९०, एसएसपी/टीएसपी २६७७९, एमओपी १२३०१, एकूण संयुक्त खते ७१२४० मे. टन एवढी आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मागील ४ वर्षांपासून खताचा तुटवडा जाणवला नाही. यंदाही खरीप हंगामात रासायनिक खत मुबलक प्रमाणात उपलब्ध राहील, असे नियोजन करण्यात आले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र