शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

काव्याचा प्रवास स्वकडून समूहाकडे जाणारा असावा - राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:41 IST

धुळे : काव्याचा प्रवास स्वकडून समूहाकडे जाणारा असावा, असे प्रतिपादन ‘सेनं सायी वेस’ कविता संग्रहाचे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी ...

धुळे : काव्याचा प्रवास स्वकडून समूहाकडे जाणारा असावा, असे प्रतिपादन ‘सेनं सायी वेस’ कविता संग्रहाचे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी डॉ. वी. रा. राठोड यांनी केले.

जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड. बी. पाटील महाविद्यालयात ‘अंतर्गत गुणवत्ता निर्धारण समिती’ आणि ‘साहित्य सृजन मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा गौरवदिन’ साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित ‘युवा लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात डॉ. राठोड बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कविता संग्रहाचे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी सुशीलकुमार शिंदे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. पी. एच. पवार, उपप्राचार्य डॉ. विद्या पाटील, प्रा. व्ही. एस. पवार, डॉ. डी. के. पाटील, डॉ. वर्षा पाटील, माजी उपप्राचार्या डॉ. शशिकला पवार, प्रा. उषा पाटील आदी उपस्थित होते.

कवी डॉ. राठोड म्हणाले की, काव्यनिर्मिती, काव्यप्रकृती, त्यामागील भूमिका प्रत्येकाची भिन्न स्वरूपाची असते. केवळ व्यक्त होण्यासाठी नाही तर ज्यांचा कोंडमारा होत आहे, अशा अभावग्रस्तांचा आवाज म्हणजे कविता आहे. सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक सत्य हे लेखणीतून व्यक्त झाले पाहिजे. समाज उत्थानासाठी सामाजिक जबाबदारीचे भान लेखक-कवींना बाळगावे लागणार आहे. समाजाच्या विकासासाठी मातृभाषेतून काय योगदान देता येईल, याचा विचार व्हायला हवा.

कवी सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, कविता लेखन हा अनुभव, विचार, भावसंवेदनांचा मुक्त मार्ग आहे. समाजाशी, समूहाशी संबंधित लेखन येण्यासाठी प्रांतिक भाषांचा मोठ्या प्रमाणात वापर करायला हवा. ज्यातून सकस भाषा समृद्धीचे कार्य होईल. वेगवेगळ्या प्रवाहातील लोकांनी प्रांतिक भाषांचा वापर करून लेखन केल्यास वास्तविक समाज चित्रणाबरोबर शब्दवैभव, भाषावैभव वाढण्यास मदत होईल.

प्राचार्य डॉ. पी. एच. पवार म्हणाले, जीवन जगताना मातृभाषेला मोठे महत्त्व आहे. मातृभाषेमुळेच आपण समाजजीवनाशी जवळीक साधू शकतो. मातृभाषा जगण्याचा आधार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. योगिता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मोरेश्वर नेरकर यांनी केले तर प्रा. भाग्यश्री पाटील यांनी आभार मानले.