शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

लोखंडी कठडे तुटल्याने अपघाताचा धोका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:18 PM

दोंडाईचा रेल्वे उड्डाणपुलावरील स्थिती : तत्काळ दुरुस्तीची नागरिकांसह  वाहनधारकांची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा :  दोंडाईचा-शहादा रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाचा कठड्यांचे खांब व  लोखंडी  दांड्या  चार  ठिकाणी  तुटल्याने अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. चार ठिकाणी कठडे तुटून पडल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. उड्डाण पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनता व वाहन धारकांनी केली आहे .         सुरत - भुसावळ रेल्वे मार्गावर दक्षिण - उत्तर  दिशेला उड्डाणपूल उभारला आहे . सार्वजनिक बांधकाम  विभागाने या उड्डाण पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. गेल्या दोन  वर्षांपासून दुरवस्था झालेल्या या पुलाच्या कठड्यांची तत्काळ दुरुस्ती करणे महत्वाचे आहे. सुरत- भुसावळ पश्चिम रेल्वेमार्गावर राज्य सरकारने उड्डाणपूल उभारला आहे. राष्टÑीय महामार्ग क्रमांक एकवर असलेल्या या पुलावरून गुजरात, राजस्थान, तामिळनाडू या राज्यांची हजारो वाहने ये-जा करतात. तसेच दोंडाईचा परिसरातील  हजारो वाहने रोज या पुलावरून ये जा करतात. अवजड वाहने व इतर वाहने यांची वर्दळ नेहमीच सुरू असते. रेती ट्रक सह  ट्रॉलर, मल्टी एक्सल व इतर वाहने भरधाव वेगाने उड्डाण पुलावरून जातात. पुलाच्या बांधकामाच्या खर्च वसुलीसाठी टोलनाका कार्यरत होता.  राज्य सरकारने  टोलनाका बंद केल्याने तेथील इमारत बेवारस ठरली आहे. पुलाच्या देखभालीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.शहरातील या पुलाच्या कठड्यांची दुरवस्था झाली आहे. पुलाची उंची रुळापासून सुमारे ४० फुट आहे. पुलाचे कठडे तब्बल चार ठिकाणी तुटले असून त्यांचे नुकसान  झाले. सिमेंट खांबावर लोखंडी पोकळ पाईप आडवे लावून हे कठडे तयार केले आहेत. पुलाचे उभे सिमेंट खांब कोसळले असून लोखंडी पाईपही निखळून खाली पडले आहेत. कठडे ब्रेक झाल्याने अपघाताची दाट शक्यता वाढली आहे. कठडे चार ठिकाणी तुटल्याने बराच भाग मोकळा झाला आहे. शुक्रवारी पुलावरून दुचाकीस्वार खाली कोसळल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कठडा तुटलेल्या ठिकाणी पुलावरून खाली कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी  बसचा अपघात झाला होता. परंतु  लोखंडी पाईपमुळे बस खाली कोसळण्यापासून वाचली होती. अपघातासह जीवितहानी टळली होती . कठडे तुटल्याने  मोठा अपघात होऊ शकतो.अपघात होऊ नये म्हणून  पुलाचा कठड्याची दुरुस्ती  तात्काळ करावी अशी मागणी आहे .गतिरोधकाअभावी अपघाताची शक्यता वाढीलासार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील सर्वच गतिरोधक आता काढून टाकली आहेत.   या पूलावरून  दोडाईचाकडे येणारी वाहने उतारावरून भरधाव वेगाने खाली येतात. येथे तसेच  नंदुरबार चौफुलीजवळही गतिरोधक नाहीत. अपघात टाळण्यासाठी ते गरजेचे असूनही तेथे शास्त्रीयदृष्ट्या योग्य उंचीचा गतिरोधक नाही. त्या मुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे