शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

नदीपात्रात अवैध वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 23:16 IST

साक्री तालुका : वर्षभरात कोट्यवधीची वाळू वाहतूक; दंड मात्र अवघा पाच लाख वसूल

साक्री : तालुक्यात वाळूमाफियांनी प्रचंड हैदोस घातला असून दातर्ती शिवारातून दररोज ४० ते ५० मोठ्या ट्रकद्वारे नाशिक, मुंबई येथे रवाना होत आहेत. यामुळे शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे. या वाळू माफियांना महसूल व पोलिसांचा आशीर्वाद असल्याने राजरोसपणे वाळूचोरी सुरू आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडत आहे.गेल्या वर्षी दातर्ती शिवारातील पांझरा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याने वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून दातर्ती येथील सरपंच व उपसरपंच यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे दातर्ती येथील ग्रामस्थांनी वाळू चोरी बंद केली होती. त्यानंतर पुन्हा वाळूमाफियांनी डोके वर काढले असून दातर्ती शिवारातून दररोज ४० ते ५० मोठे ट्रक तसेच ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत आहे. तसेच धमणार व बेहेड या मार्गे नाशिक जिल्ह्यात व मुंबई येथे वाळू पाठवली जात आहे. जेसीबी यंत्राच्या साह्याने वाळूचा उपसा केला जातो.नदीकाठच्या टंचाईचा फटकापांझरा नदीच्या पात्रात झालेल्या प्रचंड वाळू उपशामुळे गेल्या वर्षी नदीकाठच्या गावांमध्ये कधी नव्हे एवढी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. दातर्ती शिवारातून हजारो ब्रास वाळूचा उपसा होत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून एकाही वाळू माफिया वर गुन्हा दाखल झाला नसल्याने यामागे नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, हे लपून राहिलेले नाही. एवढेच नव्हे तर कोकले, नागाई परिसरातून तसेच कासारे परिसरातूनही वाळूची राजरोसपणे अवैध वाहतूक सुरू आहे. वाळूमाफिया रात्रीतून लाखो रुपये कमवत आहेत. त्याचा मलिदा महसूल व पोलीस खात्याला ही जात आहे. त्यामुळे ही वाळूचोरी कोण रोखणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.यावर्षी प्रचंड पाऊस झाल्याने सर्वच नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर गेला आहे. त्यामुळे नदीपात्रात सर्वत्र वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा झालेला आहे. अतिशय चांगल्या दर्जाची वाळू असल्याने तिला नाशिक व मुंबई येथे मोठी मागणी वाढली असल्याने वाळूमाफियांचे चांगलेच फावले आहे.अवघा पाच लाखांचा दंड वसूलसाक्री तहसील कार्यालयातून माहिती घेतली असता गेल्या वर्षभरातून केवळ पाच लाख रुपयांचा दंड वसूल झाला आहे तर कोट्यवधी रुपयांची वाळू चोरी झालेली आहे. तालुक्यात वाळूचा अधिकृत ठेका नसल्याने तसेच ठेके प्रचंड महाग झाल्याने तेथे पैसे वाया घालवण्यापेक्षा त्याच पैशातून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मॅनेज करता येते, हा साधा, सोपा फार्म्युला वाळूमाफियांनी सुरू केला आहे. साक्री ते थेट नाशिक, मुंबईपर्यंत नाक्यानाक्यावर वाळूमाफियांची दलालांनी सर्वोच्च यंत्रणा मॅनेज केली आहे यामध्ये नदी पात्रांचे तर प्रचंड नुकसान होतच आहे; परंतु शासनाचाही कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. या सर्व प्रकरणाकडे जिल्हाधिकारी तसेच नाशिक विभागीय आयुक्तांनी गांभीर्र्याने लक्ष घालून ही वाळूचोरी ताबडतोब थांबवावी, अशी मागणी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांकडून होत आहे.आता कारवाईकडे लक्षगेल्या अनेक वर्षांपासून वाळूची अवैध व अमाप उपसा सुरूच असून तक्रारी झाल्यानंतर थातुरमातूर कारवाई करून दंड वसूल केला जातो. ठोस स्वरुपाची कारवाई होत नसल्याने संपूर्ण परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. संततधार पाऊस व वाळूच्या ट्रकांमुळे रस्त्यांची पुरती वाट लागली असून नदीपात्राचीही दैना उडत असून े प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष आहे.

टॅग्स :Dhuleधुळे