शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
3
२७७ प्रवासांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
4
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
5
फडणवीस, शिंदे, पवार, यांची पुस्तके कधी येणार?
6
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
7
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
8
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
9
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
10
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
11
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
12
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
13
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
14
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
15
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
16
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
17
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
18
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
19
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
20
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?

नदीपात्रात अवैध वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 23:16 IST

साक्री तालुका : वर्षभरात कोट्यवधीची वाळू वाहतूक; दंड मात्र अवघा पाच लाख वसूल

साक्री : तालुक्यात वाळूमाफियांनी प्रचंड हैदोस घातला असून दातर्ती शिवारातून दररोज ४० ते ५० मोठ्या ट्रकद्वारे नाशिक, मुंबई येथे रवाना होत आहेत. यामुळे शहर व ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे. या वाळू माफियांना महसूल व पोलिसांचा आशीर्वाद असल्याने राजरोसपणे वाळूचोरी सुरू आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडत आहे.गेल्या वर्षी दातर्ती शिवारातील पांझरा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याने वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून दातर्ती येथील सरपंच व उपसरपंच यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे दातर्ती येथील ग्रामस्थांनी वाळू चोरी बंद केली होती. त्यानंतर पुन्हा वाळूमाफियांनी डोके वर काढले असून दातर्ती शिवारातून दररोज ४० ते ५० मोठे ट्रक तसेच ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत आहे. तसेच धमणार व बेहेड या मार्गे नाशिक जिल्ह्यात व मुंबई येथे वाळू पाठवली जात आहे. जेसीबी यंत्राच्या साह्याने वाळूचा उपसा केला जातो.नदीकाठच्या टंचाईचा फटकापांझरा नदीच्या पात्रात झालेल्या प्रचंड वाळू उपशामुळे गेल्या वर्षी नदीकाठच्या गावांमध्ये कधी नव्हे एवढी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. दातर्ती शिवारातून हजारो ब्रास वाळूचा उपसा होत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून एकाही वाळू माफिया वर गुन्हा दाखल झाला नसल्याने यामागे नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, हे लपून राहिलेले नाही. एवढेच नव्हे तर कोकले, नागाई परिसरातून तसेच कासारे परिसरातूनही वाळूची राजरोसपणे अवैध वाहतूक सुरू आहे. वाळूमाफिया रात्रीतून लाखो रुपये कमवत आहेत. त्याचा मलिदा महसूल व पोलीस खात्याला ही जात आहे. त्यामुळे ही वाळूचोरी कोण रोखणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.यावर्षी प्रचंड पाऊस झाल्याने सर्वच नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर गेला आहे. त्यामुळे नदीपात्रात सर्वत्र वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा झालेला आहे. अतिशय चांगल्या दर्जाची वाळू असल्याने तिला नाशिक व मुंबई येथे मोठी मागणी वाढली असल्याने वाळूमाफियांचे चांगलेच फावले आहे.अवघा पाच लाखांचा दंड वसूलसाक्री तहसील कार्यालयातून माहिती घेतली असता गेल्या वर्षभरातून केवळ पाच लाख रुपयांचा दंड वसूल झाला आहे तर कोट्यवधी रुपयांची वाळू चोरी झालेली आहे. तालुक्यात वाळूचा अधिकृत ठेका नसल्याने तसेच ठेके प्रचंड महाग झाल्याने तेथे पैसे वाया घालवण्यापेक्षा त्याच पैशातून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मॅनेज करता येते, हा साधा, सोपा फार्म्युला वाळूमाफियांनी सुरू केला आहे. साक्री ते थेट नाशिक, मुंबईपर्यंत नाक्यानाक्यावर वाळूमाफियांची दलालांनी सर्वोच्च यंत्रणा मॅनेज केली आहे यामध्ये नदी पात्रांचे तर प्रचंड नुकसान होतच आहे; परंतु शासनाचाही कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. या सर्व प्रकरणाकडे जिल्हाधिकारी तसेच नाशिक विभागीय आयुक्तांनी गांभीर्र्याने लक्ष घालून ही वाळूचोरी ताबडतोब थांबवावी, अशी मागणी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांकडून होत आहे.आता कारवाईकडे लक्षगेल्या अनेक वर्षांपासून वाळूची अवैध व अमाप उपसा सुरूच असून तक्रारी झाल्यानंतर थातुरमातूर कारवाई करून दंड वसूल केला जातो. ठोस स्वरुपाची कारवाई होत नसल्याने संपूर्ण परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. संततधार पाऊस व वाळूच्या ट्रकांमुळे रस्त्यांची पुरती वाट लागली असून नदीपात्राचीही दैना उडत असून े प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष आहे.

टॅग्स :Dhuleधुळे