शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

धुळ्यात अवैध पार्किंग सर्वसामान्यांच्या ‘जीवा’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 12:15 IST

शहर वाहतूक शाखेकडून दुर्लक्ष : चंदनमाला भंडारींच्या मृत्यूने समाजमन अस्वस्थ

ठळक मुद्देमहापालिकेने वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात. आम्ही अवैध पार्किंगला आळा घालण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. नो पार्किंग झोनमध्ये अथवा चुकीच्या दिशेने वाहन उभे केले असेल तर आमचे कर्मचारी लगेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतात. २०० रुपये त्यावाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था मनपानेच करावी. बेशिस्तीस आळा घातला गेला पाहिजे. नियमांची कडक अंमलबजावणी गरजेची आहे. अवैध पार्किंग होताच दंड किंवा शिक्षा व्हावी. नियम सर्वांना सारखेच असावेत.वाहतूक पोलीस व मनपा प्रशासन यांनी समन्वयाने काम करून शहरातील खुल्या, सोयीच्या जागांवर पार्किंगची व्यवस्था करावी. त्याची माहिती सर्वांना दिली जावी, जागृती करावी. पालकांनी मुलांना वाहने देताना नियमही शिकवावेत.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर व कडेला अवैधरीत्या वाहने उभी करण्याकडे कल वाढला आहे. मात्र चालक-मालकांच्या या बेशिस्तीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. नुकत्याच शहरातील मालेगाव रोडवर दुचाकीवरून जाणाºया विजयकुमार व चंदनबाला भंडारी यांच्या अपघातास रस्त्याकडेला बेदरकारपणे उभे केलेले वाहन कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेत चंदनबाला यांचा  नाहक ओढवलेला मृत्यू समाजमनाला चटका लावून गेला. शहरात कुठेही व अत्यंत बेशिस्तपणे वाहने उभी करून ठेवली जातात. बोकाळलेली ही अवैध पार्किंगच आता सर्वसामान्यांच्या जीवावर उठली आहे. मात्र वाहतुकीचे नियमन करणाºया वाहतूक शाखेला याचे सोयरसूतक दिसत नाही. तसेच शहरात मनपाने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. भंडारी दाम्पत्यास झालेल्या अपघातानंतर वाहतूक शाखेने यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई किंवा मोहीम उघडलेली नाही. त्यामुळेही नागरिकांमध्ये सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मुख्य चौकांमध्ये नेहमीच मोठी वर्दळ असते. तरीही तेथे अशा पद्धतीने वाहने तासन्तास उभी केली जातात. तेथे जवळच उभे राहून वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वाहतुकीचे नियमन करतात. परंतु तरीही त्यांच्याकडून या वाहनधारकांना मज्जाव केला जात नाही. ही वाहने येणाºया-जाणाºयांसाठी मोठा अडथळा ठरतात. त्यांच्यामुळे नित्य वाहतुकीची कोंडी होते. परंतु त्याचे कारण किंवा त्यावर उपाय शोधला जात नाही. प्रवासी वाहतूक करणारी वाहने मोठ्या चौकांमध्ये उभी राहून प्रवासी घेतात. एखादा मोठा अपघात झाल्यानंतर कारवाई करून आव आणला जातो. नंतर ती कारवाई निव्वळ ‘फार्स’ असल्याचे स्पष्ट होते. या अवैध पार्किंगमुळे पादचारी, दुचाकीस्वारांना कसरत करावी लागते. त्यामुळे वाहतूक शाखेने परिणामकारक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस