शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

विद्यार्थ्यांची गुणवत्ता समजणार तरी कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST

गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्याचा धोका विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने पहिली ते नववी तसेच ११वीपर्यंतच्या परीक्षा ...

गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्याचा धोका विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने पहिली ते नववी तसेच ११वीपर्यंतच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने, सर्वांनी ती बाब समजून घेतली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी तो वाढतच गेला. परिणामी जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्षही सुरू झाले नाही. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ॲानलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला. शहरी भागातील विशेषत: खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनी हा पर्याय सहज स्वीकारला. मात्र खरी अडचण ग्रामीण, दुर्गम भागात होती. काहींकडे स्मार्ट फोन नव्हता, तर काही भागात नेटवर्कचीही समस्या होती. अशा असंख्य अडचणींतून चिमुकल्यांना जावे लागत होते. मात्र त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी तक्रार केली नाही. काही ठिकाणी शिक्षकांनी व्हाॅट्सअप ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना अभ्यास देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यालाही मर्यादा होत्याच. असे असले तरी दिवाळीनंतर पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. तर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या. मात्र त्यालाही उपस्थितीची मर्यादा होती. कोरोनाची भीती असल्याने, अनेक पालकांनी संमतीपत्रे दिलीच नाही. पाचवी ते १२वी पर्यंतचे वर्ग काही प्रमाणात सुरू झाले. मात्र तब्बल एक वर्ष पहिली ते चौथीपर्यंतचे वर्गच सुरू होऊ शकलेले नाहीत.

आता कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही अधिक भयानक आहे. मृत्यूदर वाढलेला आहे. अशा अवस्थेत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी एकत्र बसवून परीक्षा घेणे म्हणजे आजाराला आमंत्रण आहे असे समजून शिक्षण विभागाने पुन्हा एकदा पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मात्र असे सलग दोन वर्षे जर विद्यार्थ्यांची परीक्षा न होता, त्यांना पुढच्या वर्गात टाकण्यात आले तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता समजणार कशी? असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. ॲानलाईन शिक्षण दिले जाते तर ॲानलाईन परीक्षा का होऊ शकत नाही असाही काही पालकांचा रास्त प्रश्न आहे. यावर्षीही विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक सरासरी गुणांनीच भरलेले असणार यात शंका नाही. मात्र ही ‘प्रगती’ग्राह्य धरली जाणार का?

शहरी भागातील विद्यार्थी शिकवणी, क्लास लावून झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढू शकतात. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे काय? त्यांचे पूर्ण शैक्षणिक वर्ष वाया गेले याचा विचार कोण करणार? त्यामुळे सरसकट विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश न देता त्यांच्या ॲानलाईन परीक्षा घेऊन त्यांचा गुणात्मक आढावा घेणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचाही अभ्यासाकडे ओढा कायम राहील. परीक्षा आहे म्हणून तेदेखील अभ्यास करतील. अन्यथा ही चालढकल विद्यार्थ्यांच्या हिताची ठरू शकणार नाही, हे मात्र नक्की.