शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

‘किसान ॲप’चे वरातीमागून घोडे; वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:35 IST

धुळे : शेतकऱ्यांना वेळेत माहिती मिळावी यासाठी कृषी विभागाने किसान सुविधा ॲप सुरू केले आहे. मात्र या ॲपवर उशिरा ...

धुळे : शेतकऱ्यांना वेळेत माहिती मिळावी यासाठी कृषी विभागाने किसान सुविधा ॲप सुरू केले आहे. मात्र या ॲपवर उशिरा माहिती मिळत असल्याचे समोर आले. गेल्या आठवड्यात वादळ-वाऱ्याचा इशारा या ॲपवर वादळ होऊन गेल्यावर मिळाल्याने ॲप वेळोवेळी अपडेट होत नसल्याचे सिध्द झाले आहे.

गेल्या आठवड्यात ताैक्ते चक्रीवादळ आले होते. वादळाचा मार्ग धुळे जिल्ह्यातून नसला तरी त्याच्या प्रभावामुळे दोन दिवस जोरदार वारे वाहत होते आणि काही भागात मुसळधार पाऊस देखील झाला. सुदैवाने शेतांमध्ये पिके नसल्याने नुकसान झाले नाही. परंतु काही गावांमध्ये घरांची पडझड झाली.

वादळाचा इशारा ॲपवर उशिरा मिळाला असला तरी शासनाने प्रसारमाध्यमांतून सावधानतेचा इशारा दिला होता. कृषी विभागाने देखील गावपातळीपर्यंत शेतकऱ्यांना सावध केले होते.

किसान ॲपवर काय मिळते माहिती?

किसान सुविधा ॲपवर हवामानाबद्दल माहिती मिळते. त्यामुळे पिकांचे संरक्षण करता येते.

या ॲपवर कृषी निविष्ठांची देखील माहिती मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही.

शेतीमालाच्या बाजारभावाची माहिती मिळते. कोणत्या मार्केटमध्ये काय भाव आहे हे कळते.

पीक संरक्षण आणि तज्ज्ञांचा सल्लादेखील या ॲपवर मिळतो.

अपडेट वेळेत मिळावे...

किसान सुविधा ॲपवर अपडेट वेळेत मिळायला हवे. तरच त्याचा उपयोग होईल.

कृषी क्षेत्राशी संबंधित नवनवीन माहिती शेतकऱ्यांना त्वरित उपलब्ध होणे गरजेचे आहे.

अपडेट वेळेत मिळाले तर शेतकरी देखील अपडेट होतील आणि त्यांचा फायदा होईल.

इशारा मिळाला पण, वादळ येऊन गेल्यानंतर !

तौक्ते चक्रीवादळ जिल्ह्यात आले नसले तरी त्याच्या प्रभावामुळे वादळी वारे वाहत होते. या वादळाची माहिती ॲपवर उशिरा मिळाली. परंतु शासनाने वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून सावधानतेचा इशारा पाच दिवस अगोदरच दिला होता. त्यामुळे शेतीसह पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करता आल्या. कृषी विभागाने गावात निरोप पाठविला होता.

- श्रीराम बोरसे, हतनूर

किसान सुविधा ॲपवर उपयुक्त माहिती मिळते. आम्हाला बरेच काही शिकायला मिळते. आमच्या गावाकडे वादळाचा फारसा प्रभाव नव्हता. त्यामुळे नुकसान झाले नाही.

- संदीप पाटील, बाम्हणे

मोबाईल ॲपपेक्षा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला वादळाबाबत सावधानतेचा इशारा दिला होता. तसेच टीव्हीवर आणि वृत्तपत्रांमध्ये देखील अगोदरच बातम्या आल्या होत्या. त्यामुळे आम्ही सावध झालो. परंतु ॲपवरदेखील वेळेवर माहिती मिळायला हवी. उशिराने माहिती मिळण्याचा काही उपयोग होत नाही. या ॲपमुळे शेतकरी साक्षर होण्यास मदत होत आहे.

- दिनेश बैसाणे, चिलाणे

धुळे जिल्ह्यात वादळ आले नाही. वादळाच्या प्रभावामुळे वारे वाहत होते. शासनाने चार दिवस अगोदरच प्रसार माध्यमांच्या सहाय्याने सावधानतेचा इशारा दिला होता. शिवाय कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावपातळीपर्यंत याबाबत माहिती देऊन सावध केले होते. जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले नाही. शेतकरी सध्या खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करीत आहेत. शेतकऱ्यांना वेळाेवेळी आवश्यक ते मार्गदर्शन केले जाते.

- विवेक सोनवणे,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी