शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

सकस आहार, आराम आणि उपचार महत्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:01 IST

कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करा - बालरोगतज्ञ डॉ़ अभिनय दरवडे

ठळक मुद्देकोरोनाच्या निमित्ताने सध्या धास्तावलेले पालक डॉक्टरांकडे गर्दी करतांना दिसत आहेत़ काळजी करण्याचे कारण नाही अशावेळी डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या़अन्नपदार्थांमार्फत विषाणूंचा संसर्ग पसरू शकतोसार्वजनिक ठिकाणी अधिक धोकाशौचातून, उलटीतून किंवा कीटकांनी चावल्यावर सुद्धा विषाणू पसरतात. 

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्कपावसाळ्यात लहान मुलांना साथीचे आजार व विषाणूंचा संसर्ग पटकन होतो. एक ते पाच वर्ष मुलांचा वाढीच्या काळात मुलांना एका वर्षात १२ विषाणूजन्य आजार होतात. एका विषाणूजन्य आजारातून बरे होत असतानाच मुलांना दुसऱ्या विषाणूचा संसर्ग होतो. जसजशी मुलांचे वाढ होते तसे या संसगाचे प्रमाणही कमी होते. विषाणू हे संसर्गजन्य असतात आणि संपर्क आल्यास ते सहज पसरतात.त्यामुळे सकस आहार, पुरेसा आराम आणि व्यायाम करणे हा त्यासाठी योग्य उपाय आहे. अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी सहसचिव तथा बालरोगतज्ञ डॉ़ अभिनय दरवडे यांनी ‘लोकमत ’शी बोलतांना दिली़प्रश्न - लहान मुलांना पावसाळ्यात होणारे साथीचे आजार कोणते?उत्तर - लहान मुलांवर पावसाळ्यात किंवा अन्य वेळी विषाणु किंवा सूक्ष्मजंंतुचा अधिक प्रभाव होतो़ विषाणूंची बेसुमार वाढ झाल्यास शरीराच्या कुठल्याही भागात संसर्ग होऊ शकतो़ त्यामुळे सर्वसामान्यपणे फ्लू, सर्दी तसेच घशाचा संसर्ग, जुलाब आणि उलट्या इत्यादी आजार होतात़ याच विषाणूमुळे कांजण्या, इबोलाचा संसर्ग सुद्धा होऊ शकतो़प्रश्न - मुलांमध्ये विषाणूंचा संसर्ग किती वेळ राहू शकतो ?उत्तर- पावसाळ्यात साथीचे आजार लहान मुलांना लगेच होतात़ त्यामुळे मुलांना बरे जरी वाटत असले, तरी काही दिवसानंतर पुन्हा त्रास जाणवू लागतो़ लहान मुलामध्ये विषाणूंचा संसर्ग दोन आठवड्यापर्यंत राहतो़ विषाणूंचा संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसत नाहीत़ या काळात खोकला व रॅशेस होतात आणि काही दिवसातच ते नाहीसे देखील होतात. त्यामुळे पालकांनी घाबरून जावू नये़प्रश्न - विषाणूंचा संसर्ग झाल्यास काय परिणाम होतो ?उत्तर- जर मुलाला खोकला झाला तर तो दोन आठवडे राहु शकतो़ मुलांना बालदमा असेल तर विषाणूंच्या संसगामुळे दमा वाढू शकतो़ काही वेळा, मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि घरघर होऊ शकतो़ काहीवेळा मुलांना अंगावर पुरळ होतात आणि त्यामुळे खाज सुटते, संसर्ग झालेल्या मुलास भूक लागत नाही अशक्त पणा जाणवतो, हातपाय दुखतात. मात्र काळजी करण्याचे कारण नाही अशावेळी डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या़घाबरू नका सामना करावाकोरोनाच्या निमित्ताने सध्या धास्तावलेले पालक डॉक्टरांकडे गर्दी करतांना दिसत आहेत़ जगभरात या विषाणूच्या संसर्गाने थैमान घातलेले असतांना त्याच्या बद्दल अर्धवट किंवा चुकीची माहिती कानावर पडल्यामुळे सामान्य जनता घाबरलेली आहे़ मुळात कोरोना आणि त्यासारखे सर्वच विषाणू आणि यामुळे होणाºया आजाराबद्दल यानिमित्ताने मोकळी चर्चा होणं खूप महत्वाचे आहे़सार्वजनिक ठिकाणी अधिक धोकाविषाणूंचा संसर्ग लगेच होतो. हा संसर्ग शाळेमध्ये किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी संसर्ग झालेल्या मुलाच्या सानिध्यात आल्यावर होतो. शिंका, खोकला किंवा अस्वच्छ हात किंवा गळणारे नाक ह्यामार्फत संसर्ग होतो. शौचातून, उलटीतून किंवा कीटकांनी चावल्यावर सुद्धा विषाणू पसरतात. अस्वच्छ पाणी आणि अन्नपदार्थांमार्फत विषाणूंचा संसर्ग पसरू शकतो. हवामानात जेव्हा बदल होतात तेव्हा विषाणूंचा संसर्ग पसरतो़

 

टॅग्स :Dhuleधुळे