शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
5
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
6
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
7
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
8
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
9
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
10
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
11
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
12
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
13
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
14
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
15
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
16
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
17
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
18
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
19
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
20
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

सोनगीर येथील बाजारावर मंदीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 5:30 PM

पावसाच्या अभावाचा परिणाम : धुळे तालुक्यात भाज्यांच्या उत्पादनात घट, पाणीटंचाईनेही नागरिक त्रस्त

आॅनलाईन न्यूज नेटवर्कसोनगीर : सर्वत्र पावसाने हुलकावणी दिल्याने पाणी टंचाईसह दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. गुरूवारी त्याचा परिणाम येथील आठवडे बाजारावरही दिसून आला. स्थानिक शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची आवक घटल्याने भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे गृहिणींचे ‘किचन बजेट’ पार कोलमडले. सध्या परिसरात विहिरींची जलपातळी खोल गेल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठी घट झाली असून अन्य ठिकाणांहून भाजीपाला येथे विक्रीसाठी येत आहे.सध्या वाल, शेवगा, टोमॅटो व कोथिंबीरची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. पाणीटंचाईमुळे दिवसेंदिवस भाजीपाल्यांचे भाव वाढत आहे. काही भाज्यांचे दर प्रतिकिलो १२० ते १३० रुपये तर काही भाज्या ७० ते ८० रुपय कि.ग्रॅ. दराने किरकोळ विक्री होत आहे. त्यात वाल, शेवगा, टोमॅटो प्रत्येकी १०० ते १२० रु. किलोच्या दराने विकली जात आहे. तर वांगी, कारली, भेंडी, दुधी भोपळा, गिलके, मेथी, पालक आदी भाज्या ७० ते ८० रुपये किलोच्या दराने विक्री केली जात आहे. कोथींबिर ही सर्वाधिक २८० ते ३०० रुपये किलो च्या दराने विक्री केली जात आहे. तर सध्या फक्त बटाटे स्वस्त म्हणजे २० रुपये कि.ग्रॅ.दराने विक्री होत आहेत.पाऊस नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विहिरींची पातळी खालावल्याने तर काही विहिरी कोरड्या पडल्याने भाजीपाला उत्पादनात मोठी घट झाली आहे. पाऊस नसल्याचा थेट परिणाम भाजी व्यवसायावर दिसून येत आहे. किरकोळ दुकानदार व्यापाºयांकडून भाजीपाला माल विक्रीसाठी घेतात. मात्र भाव वाढल्याने भाजीपाला घेण्यासाठी ग्राहक तयार नाही. परिणामी भाजी सडत असल्याने ती फेकण्याशिवाय विक्रेत्याकडे पर्याय नसतो. यामुळे किरकोळ दुकानदारांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी १५० रुपयांत पिशवी भरून भाजीपाला येत होता. मात्र आता ३०० रुपय जरी बाजारात नेले तरी घरी एक रुपया शिल्लक येत नाही, असा अनुभव काहींना येत आहे. दरम्यान गेल्या दोन आठवड्यापासून भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिपाली जैन यांनी यांनी सांगितले.पाऊस नसल्याने तसेच विहिरी कोरडया पडल्याने स्थानिक शेतक?्याचा शेतात भाजी पाला पिकवला जात नाहीय. या मुळे सध्या येथील बाजार पेठेत अन्य ठिकाणा वरून भाजी पाला ठोक विक्रीसाठी येत आहे. गेल्या काही दिवसांपासुन भाजी पाल्याचे दर वधारल्याने गृहिणीची किचन बजेट पार कोलमंडले फक्त बटाट्याचे दर आवाक्यात आहेत. दरम्यान पावसाची अशीच परिस्थिती असली तर आगामी काळात कसे होणार, अशी चिंता नागरिक व्यक्त करीत आहेत.दरम्यान गुरुवारी येथे भरणाºया आठवडे बाजाराला परिसरातील २० ते २५ खेड्यापाड्यातील लोक बाजार करण्यासाठी येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने तसेच दुष्काळी परिस्थिती असल्याने दुपारच्या वेळेत बाजारात शुकशुकाट दिसून आला. गुरुवार असून देखील पाहिजे त्या प्रमाणात व्यवसाय होत नसल्याचे बºयाच व्यावसायिक, दुकानदारांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे