शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी काढली उणीदुणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 20:58 IST

प्रचार सभांमुळे वातावरण तापले :  एकहाती सत्ता दिल्यास विकास कामे करणार; नागरिकांच्या आशा पल्लवित 

ठळक मुद्देशिंदखेडा शहराचा सर्वात मुख्य पाणी प्रश्नासाठी मंजूर झालेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम ताताडीने मार्गी लावणार. स्टेशनरोडवरील भाजीविक्रेते बांधवांसाठी भाजी मंडई उभारणार, नगरपंचायतीची स्वतंत्र व अत्याधुनिक प्रशस्त इमारत तयार करणार.पाणी पुरवठा योजनेमुळे शहरात शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी फिल्टर प्लॅँट उभारणार.भगवा चौफुली ते एन. डी. मराठे शाळेपर्यंत प्रशस्त रस्ता व दुतर्फा झाडे, एलईडी लाईट बसविणार.

मनीष चंद्रात्रे । लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा :  शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीनिमित्ताने शुक्रवारी शिंदखेड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रचार सभा झाल्या. या सभांमध्ये त्यांनी एकमेकांच्या सरकारची उणीदुणी काढली. तसेच  एकमेकांच्या सरकारवर आरोपांच्या फैरी झाडत या निवडणुकीत एकहाती सत्ता दिल्यास शिंदखेडा शहराचा चेहरामोहरा बदलवून दाखवू असे त्यांनी येथील नागरिकांना आश्वासित केले. त्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या प्रचारसभांमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणात कॉँग्रेस पक्षाने १५ नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह १ नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार उतरविले आहे. तर दोन जागा राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना दिल्या असून या निवडणुकीत कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टी एकत्र निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे भाजपाने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह १७ जागांवर त्यांचे उमेदवार दिले आहेत.शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत  भाजपा-कॉँग्रेसमध्ये काट्याची लढत होणार असली तरी  या दोन्ही मोठ्या पक्षांना शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, मनसे व अपक्ष उमेदवारांनीही तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे विजयश्री खेचून आणण्यासाठी कॉँग्रेस व भाजपाच्या पदाधिकारी दिवस-रात्र एक करून उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कॉँग्रेस व भाजपाच्या दोन दिग्गज नेत्यांच्या सभा शुक्रवारी शिंदखेड्यात पार पडल्या. सर्वसामान्य जनता, शेतकरी, व्यापारी त्रस्तशहरातील गांधी चौकात कॉँग्रेसची प्रचार सभा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात झाली. त्यांनी या सभेत भाजपा सरकारवर निशाणा साधला. गेल्या तीन वर्षात भाजपा सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. सरकारच्या धोरणामुळे आज सर्वसामान्य जनता, शेतकरी व व्यापारी कमालीचे त्रस्त आहेत. विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य व शेतकºयांना होण्यासाठी सरकारतर्फे आॅनलाइनचा  घाट घातला जातो आहे. मात्र, ही आॅनलाइन प्रणाली अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सत्तेवर येण्यापूर्वी रोजगार उपलब्ध करून देऊ, असे सरकारने म्हटले होते. मात्र, तसे झालेले नाही. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सरकारच्या या धोरणामुळे महाराष्टÑ राज्याची प्रगती होण्याऐवजी अधोगतीकडे वाटचाल होत असल्याचे त्यांनी सांगितले. विकास कामांपेक्षा स्वत:लाच केले मोठे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. गेल्या ७० वर्षांच्या कालावधित कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टीने सत्तेचा मोठा उपभोग घेतला. मात्र, त्यांनी विकास कामांपेक्षा पक्षातील कार्यकर्त्यांचा विकास करून त्यांना मोठे करण्यात धन्यता मानली. निवडणूक जवळ आली की गरीबी हटावचा नारा देत सत्ता मिळवून घ्यायची व त्यानंतर सत्तेचा स्वत:चा व्यक्तिगत स्वार्थासाठी उपयोग करून घ्यायचा. परिणामी, देशाचा व राज्याचा  विकास होऊ शकला नाही. शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगार, कृषी विषयक धोरण या सर्वच पातळीवर आघाडी सरकार अपयशी ठरले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्यात  सत्ता आल्यानंतर परिवर्तन घडवून दाखविले. ‘मी खाणार नाही, कोणाला खाऊ देणार नाही’, मी भ्रष्टाचार करणार नाही, कोणाला करू देणार नाही’, असे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यादृष्टीने देशाची प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे म्हणाले.