शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी काढली उणीदुणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 20:58 IST

प्रचार सभांमुळे वातावरण तापले :  एकहाती सत्ता दिल्यास विकास कामे करणार; नागरिकांच्या आशा पल्लवित 

ठळक मुद्देशिंदखेडा शहराचा सर्वात मुख्य पाणी प्रश्नासाठी मंजूर झालेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम ताताडीने मार्गी लावणार. स्टेशनरोडवरील भाजीविक्रेते बांधवांसाठी भाजी मंडई उभारणार, नगरपंचायतीची स्वतंत्र व अत्याधुनिक प्रशस्त इमारत तयार करणार.पाणी पुरवठा योजनेमुळे शहरात शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी फिल्टर प्लॅँट उभारणार.भगवा चौफुली ते एन. डी. मराठे शाळेपर्यंत प्रशस्त रस्ता व दुतर्फा झाडे, एलईडी लाईट बसविणार.

मनीष चंद्रात्रे । लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा :  शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीनिमित्ताने शुक्रवारी शिंदखेड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रचार सभा झाल्या. या सभांमध्ये त्यांनी एकमेकांच्या सरकारची उणीदुणी काढली. तसेच  एकमेकांच्या सरकारवर आरोपांच्या फैरी झाडत या निवडणुकीत एकहाती सत्ता दिल्यास शिंदखेडा शहराचा चेहरामोहरा बदलवून दाखवू असे त्यांनी येथील नागरिकांना आश्वासित केले. त्यामुळे नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या प्रचारसभांमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणात कॉँग्रेस पक्षाने १५ नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह १ नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार उतरविले आहे. तर दोन जागा राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना दिल्या असून या निवडणुकीत कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टी एकत्र निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे भाजपाने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह १७ जागांवर त्यांचे उमेदवार दिले आहेत.शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत  भाजपा-कॉँग्रेसमध्ये काट्याची लढत होणार असली तरी  या दोन्ही मोठ्या पक्षांना शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, मनसे व अपक्ष उमेदवारांनीही तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे विजयश्री खेचून आणण्यासाठी कॉँग्रेस व भाजपाच्या पदाधिकारी दिवस-रात्र एक करून उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कॉँग्रेस व भाजपाच्या दोन दिग्गज नेत्यांच्या सभा शुक्रवारी शिंदखेड्यात पार पडल्या. सर्वसामान्य जनता, शेतकरी, व्यापारी त्रस्तशहरातील गांधी चौकात कॉँग्रेसची प्रचार सभा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात झाली. त्यांनी या सभेत भाजपा सरकारवर निशाणा साधला. गेल्या तीन वर्षात भाजपा सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. सरकारच्या धोरणामुळे आज सर्वसामान्य जनता, शेतकरी व व्यापारी कमालीचे त्रस्त आहेत. विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य व शेतकºयांना होण्यासाठी सरकारतर्फे आॅनलाइनचा  घाट घातला जातो आहे. मात्र, ही आॅनलाइन प्रणाली अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सत्तेवर येण्यापूर्वी रोजगार उपलब्ध करून देऊ, असे सरकारने म्हटले होते. मात्र, तसे झालेले नाही. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सरकारच्या या धोरणामुळे महाराष्टÑ राज्याची प्रगती होण्याऐवजी अधोगतीकडे वाटचाल होत असल्याचे त्यांनी सांगितले. विकास कामांपेक्षा स्वत:लाच केले मोठे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. गेल्या ७० वर्षांच्या कालावधित कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टीने सत्तेचा मोठा उपभोग घेतला. मात्र, त्यांनी विकास कामांपेक्षा पक्षातील कार्यकर्त्यांचा विकास करून त्यांना मोठे करण्यात धन्यता मानली. निवडणूक जवळ आली की गरीबी हटावचा नारा देत सत्ता मिळवून घ्यायची व त्यानंतर सत्तेचा स्वत:चा व्यक्तिगत स्वार्थासाठी उपयोग करून घ्यायचा. परिणामी, देशाचा व राज्याचा  विकास होऊ शकला नाही. शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगार, कृषी विषयक धोरण या सर्वच पातळीवर आघाडी सरकार अपयशी ठरले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्यात  सत्ता आल्यानंतर परिवर्तन घडवून दाखविले. ‘मी खाणार नाही, कोणाला खाऊ देणार नाही’, मी भ्रष्टाचार करणार नाही, कोणाला करू देणार नाही’, असे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यादृष्टीने देशाची प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे म्हणाले.