शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

दुष्काळ जाहीर करण्यास शेतकऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 22:18 IST

देशातील पहिलीच घटना : कृषिभूषण शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला दिले निवेदन

धुळे : जिल्ह्यातील शेतकºयांनी दुष्काळ जाहीर करण्यास विरोध केला आहे़ आणेवारी वाढवून शेतकºयांना पिक विम्याची भरघोस रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी कृषिभूषण शेतकºयांनी केली आहे़दुष्काळ जाहीर करण्यास विरोध दर्शविण्यासाठी शेतकºयांनी आंदोलन केल्याची ही देशातील कदाचित पहिलीच घटना असावी, अशी प्रतिक्रिया प्रकाश पाटील यांनी दिली़निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान पिक विमा योजना अतिशय चांगली आहे. धुळे जिल्ह्यातील शेतकºयांसाठी मात्र ही योजना नुकसानकारक ठरत आहे़ दुष्काळ दाखवुन दुष्काळी मदत मिळण्यासाठी गाव पातळीपासून ते जिल्हा स्तरावरील सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व शासन, प्रशासनावर दबाव टाकताना दिसते. स्थानिक तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक देखील शेतकºयांना फायदा व्हावा म्हणुन दुष्काळ जाहीर होण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर पिक कापणी प्रयोगाची आकडेवारी आहे त्यापेक्षा अतिशय कमी दाखविण्याचा प्रयत्न करतात़ यामुळे पिक विमा योजनेतील उंबरठा उत्पादन म्हणजेच मागिल पाच वषार्ची सरासरी प्रशासनाच्या दफ्तरी अत्यंत कमी दिसते़ बेटावद महसुल मंडळाचे कापसाचे उंबरठा उत्पादन प्रति हेक्टरी ४.७५ क्विंटल आहे. यापेक्षा कमी उत्पादन आले तरच व तेवढीच नुकसान भरपाई मंजुर होईल. या कारणांमुळे धुळे जिल्हा वास्तव पिक विमा नुकसान भरपाई पासुन वंचित झालेला आहे.यंदाचा आतापर्यंतचा हंगाम चांगला आहे. त्यामुळे यावर्षी नुकसान भरपाई मंजुर होण्याची शक्यता कमी आहे. भविष्यात चांगली नुकसान भरपाई हवी असेल तर उंबरठा उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. उंबरठा उत्पादन वाढविण्यासाठी दुष्काळ न दाखविता १०० पैसे पर्यंत आणेवारी दाखविणे महत्त्वाचे आहे.त्यामुळे दुष्काळ जाहिर न करता आणेवारी वाढवून शेतकºयांना पिक विम्याची भरघोस नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी पढावद अ‍ॅड़ प्रकाश भुता पाटील, वडणे येथील दिलिप पाटील, धुळ्याचे प्रभाकर चौधरी, सुधाकर बेंद्रे, मुकटीचे सुदीप पाटील, साक्रीचे ललित देवरे, शिरपूरचे जनार्दन पाटील, अरुण पाटील या कृषिभूषण शेतकºयांसह आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील सोनगीर आदींनी केली आहे़याबाबत खासदार डॉ़ सुभाष भामरे, आमदार मंजुळा गावीत, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिरूदेचे अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्ष कामराज, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बापु खलाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी़ एम़ सोनवणे आदींना निवेदन देण्यात आले़दुष्काळ जाहीर करण्यास शेतकºयांनी पहिल्यांदाच विरोध केला़

टॅग्स :Dhuleधुळे