शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

प्रत्येक अश्रूचा हिशोब घेतला जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 17:57 IST

धुळ्यातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

धुळे - पुलवामा येथे झालेल्या घटनेने देश आक्रोषित आहे. देशवासी रागात असून त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्या प्रत्येक आश्रुचा हिशेब घेतला जाईल. हा नवीन रिती व नितीचा भारत देश आहे, याचा अनुभव आता संपूर्ण जगाला होईल. भारताची नेहमीची रित राहिली आहे की आम्ही कोणाला छेडत नाही. पण जर कोणी छेडले तर आम्ही त्याला सोडतही नाही. आम्ही ते आधीही करुन दाखविले आहे. आताही करुन दाखवू यासाठी कुठलीही कसर सोडली जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात आयोजित जाहीर सभेत बोलताना पाकिस्तानाला नाव न घेता दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धुळे - नरडाणा रेल्वे मार्ग, सुलवाडे - जामफळ सिंचन योजनेचा शुभारंभ आणि अक्कलपाडा धरणाच्या लोकार्पण करण्यात आले. तसेच भुसावळ, नंदुरबार आणि उधना या रेल्ेव स्थानकावरुन सुटणाऱ्या तीन नवीन रेल्वे गाडयांचा सभा स्थळावरुन व्हिडीओ लिंक वरुन हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सुरत रेल्वेस्थानकावर रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहाँइ हे उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपन या तीनही ठिकाणी दाखविण्यात आले.धुळ्यातील मालेगावरोडवरील गोशाळेच्या मैदानावर आयोजित सभेस राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ता परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार डॉ.हिना गावीत, खासदार ए.टी.पाटील, महापौर चंद्रकांत सोनार हे यावेळी उपस्थित होते.सभेला सुरुवातीला सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. कुठल्याही प्रकारचा स्वागतचा कार्यक्रम न करता कार्यक्रमाला सुरुवात झाली.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, १२० वर्षापूर्वी धुळे - चाळीसगाव रेल्वे सुरु झाली होती. त्यानंतर आता धुळे - नरडाणा रेल्वेमार्गाच्या कामाचा शुभारंभ आज होत आहे. तसेच सुलवाडे - जामफळ प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ होत आहे. या प्रकल्पामुळे शिंदखेडा व धुळे तालुक्यातील १०० गावांचा फायदा मिळणार असून यामुळे धुळे जिल्हा नंदनवन होणार आहे. सध्या महाराष्टÑात दुष्काळाचे संकट असताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पासाठी भरघोस निधी मिळवून दिला. हा सिंचन प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धुळे - नरडाणा रेल्वेमार्ग आणि सुलवाडे - जामफळ सिंचन योजनेमुळे धुळे जिल्ह्याचा विकास होणार आहे. मुंबई - दिल्ली कॉरिडोर प्रकल्पामुळे धुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. आघाडी सरकारने ६० वर्ष केवळ चर्चा केली. मात्र आम्ही तो प्रत्यक्षात साकार करणार आहोत. धुळे महापालिकेच्या निवडणुकीत आश्वासन दिले होते. त्याची पूर्ती करीत तीन महिन्यात अक्कलपाडा ते धुळे पाईप लाईन टाकण्याची योजनेचे आज भूमीपूजन केले. याशिवाय शहरातील रस्त्यासाठी १०० कोटी आणि भुयारी गटारीची योजनाही मंजूर करुन चार महिन्यात ५०० कोटीचा निधी धुळे महानगरपालिकेला उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले.सभेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी प्रास्ताविक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषणे सुमारे २५ मिनिटाचे झाले. सभेनंतर हेलिकॉप्टरने पंतप्रधान पुन्हा जळगावकडे रवाना झाले.

टॅग्स :PM Narendra Modi Biopicपी. एम. नरेंद्र मोदीDhuleधुळे