शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक अश्रूचा हिशोब घेतला जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 17:57 IST

धुळ्यातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

धुळे - पुलवामा येथे झालेल्या घटनेने देश आक्रोषित आहे. देशवासी रागात असून त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्या प्रत्येक आश्रुचा हिशेब घेतला जाईल. हा नवीन रिती व नितीचा भारत देश आहे, याचा अनुभव आता संपूर्ण जगाला होईल. भारताची नेहमीची रित राहिली आहे की आम्ही कोणाला छेडत नाही. पण जर कोणी छेडले तर आम्ही त्याला सोडतही नाही. आम्ही ते आधीही करुन दाखविले आहे. आताही करुन दाखवू यासाठी कुठलीही कसर सोडली जाणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात आयोजित जाहीर सभेत बोलताना पाकिस्तानाला नाव न घेता दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धुळे - नरडाणा रेल्वे मार्ग, सुलवाडे - जामफळ सिंचन योजनेचा शुभारंभ आणि अक्कलपाडा धरणाच्या लोकार्पण करण्यात आले. तसेच भुसावळ, नंदुरबार आणि उधना या रेल्ेव स्थानकावरुन सुटणाऱ्या तीन नवीन रेल्वे गाडयांचा सभा स्थळावरुन व्हिडीओ लिंक वरुन हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सुरत रेल्वेस्थानकावर रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहाँइ हे उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपन या तीनही ठिकाणी दाखविण्यात आले.धुळ्यातील मालेगावरोडवरील गोशाळेच्या मैदानावर आयोजित सभेस राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ता परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार डॉ.हिना गावीत, खासदार ए.टी.पाटील, महापौर चंद्रकांत सोनार हे यावेळी उपस्थित होते.सभेला सुरुवातीला सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. कुठल्याही प्रकारचा स्वागतचा कार्यक्रम न करता कार्यक्रमाला सुरुवात झाली.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, १२० वर्षापूर्वी धुळे - चाळीसगाव रेल्वे सुरु झाली होती. त्यानंतर आता धुळे - नरडाणा रेल्वेमार्गाच्या कामाचा शुभारंभ आज होत आहे. तसेच सुलवाडे - जामफळ प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ होत आहे. या प्रकल्पामुळे शिंदखेडा व धुळे तालुक्यातील १०० गावांचा फायदा मिळणार असून यामुळे धुळे जिल्हा नंदनवन होणार आहे. सध्या महाराष्टÑात दुष्काळाचे संकट असताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पासाठी भरघोस निधी मिळवून दिला. हा सिंचन प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धुळे - नरडाणा रेल्वेमार्ग आणि सुलवाडे - जामफळ सिंचन योजनेमुळे धुळे जिल्ह्याचा विकास होणार आहे. मुंबई - दिल्ली कॉरिडोर प्रकल्पामुळे धुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. आघाडी सरकारने ६० वर्ष केवळ चर्चा केली. मात्र आम्ही तो प्रत्यक्षात साकार करणार आहोत. धुळे महापालिकेच्या निवडणुकीत आश्वासन दिले होते. त्याची पूर्ती करीत तीन महिन्यात अक्कलपाडा ते धुळे पाईप लाईन टाकण्याची योजनेचे आज भूमीपूजन केले. याशिवाय शहरातील रस्त्यासाठी १०० कोटी आणि भुयारी गटारीची योजनाही मंजूर करुन चार महिन्यात ५०० कोटीचा निधी धुळे महानगरपालिकेला उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले.सभेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी प्रास्ताविक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषणे सुमारे २५ मिनिटाचे झाले. सभेनंतर हेलिकॉप्टरने पंतप्रधान पुन्हा जळगावकडे रवाना झाले.

टॅग्स :PM Narendra Modi Biopicपी. एम. नरेंद्र मोदीDhuleधुळे