शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

एमपीएससी परीक्षा देण्यालाही आता ६-९ संधीचे बंधन, विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 12:06 IST

धुळे : एमपीएसची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाने आता परीक्षा देण्याची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जास्तीत ...

धुळे : एमपीएसची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाने आता परीक्षा देण्याची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ६ वेळा तर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ९ वेळा परीक्षा देता येणार आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही विद्यार्थ्यांनी आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काहींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी कितीही वेळा परीक्षा देता येत होती. आता मात्र त्यावर बंधने येणार आहेत. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील हवशा नवश्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल असे काही विद्यार्थ्यांनी निर्णयाचे स्वागत करताना सांगितले. तर यामुळे परीक्षा देण्याच्या कमी संधी मिळणार असल्याने काही विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाने परीक्षा प्रक्रिया वेळेत पार पाडावी असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.अशाप्रकारे होईल संधीची गणनाएखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.परीक्षा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावीआयोगाच्या निर्णयाचे स्वागत करतो. यामुळे हौस म्हणून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होईल. आयोगाकडून परीक्षार्थीना संधींची मर्यादा निश्चित करण्यात येत आहे, मात्र आयोगानेही परीक्षा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, अशी आमची अपेक्षा आहे.पियुष शिंदे, विद्यार्थी, धुळे