शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रानभाज्या खा अन्‌ निरोगी राहा....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST

धुळे : शेती किंवा निसर्गत: उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हटले जाते. पावसाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी या रानभाज्या ...

धुळे : शेती किंवा निसर्गत: उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हटले जाते. पावसाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी या रानभाज्या उगवत असतात; मात्र त्या ओळखता येणे गरजेचे आहे. रानभाज्याबद्दल पुरेशी माहिती नसल्याने इच्छा असूनही त्या अनेकांकडून घेतल्या जात नाहीत. या रानभाज्या नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या असतात. त्यात खते वापरलेली नसतात. या भाज्यांमध्ये खनिजे, महत्त्वाची मूलद्रव्ये, अत्यंत उपयोगी रसायने आणि सर्वात महतत्त्वाचे म्हणजे अनेक औषध गुणधर्मही असतात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी या रानभाज्या फार महत्त्वाच्या आहेत. या रानभाज्या रोगप्रतिकारशक्तीही वाढवित असतात. त्यामुळे त्या आवर्जुन खाल्ल्या पाहिजे; मात्र हे करीत असताना ज्यांना रानभाज्यांची माहिती आहे, अशांकडूनच त्या खरेदी केल्या पाहिजे. त्याचे महत्त्व समजून घेणेही महत्त्वाचे आहे.

या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का?

करटोली

करटोलीचे फळ कडवट, उष्ण संसर्गरक्षक आहे, तसेच पोट साफ होण्यासाठीही उपयुक्त आहे. रक्तशर्करा नियंत्रणासाठी ही भाजी गुणकारी आहे.

सुरण

सुरण या रानभाजीत अ,ब,क ही जीवनसत्वे आहेत. आतड्यांच्या रोगात सुरणाची भाजी गुणकारी ठरते, तसेच दमा, मूळव्याध, पोटदुखी, रक्त विकारावर उपयोगी.

गुळवेल

गुळवेल महत्त्वाची औषध वनस्पती आहे. ही वनस्पती ताप, तहान, जळजळ, वांती यावर उपयुक्त आहे. या वनस्पतीत प्रथिनांचे प्रमाण ११.२ एवढे असते.

टाकळा

टाकळ्याच्या पानात विरेचन द्रव्य व लालरंग असतो. टाकळा सर्व प्रकारच्या त्वचारोगात गुणकारी आहे. टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते.

आंबुशी

आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे. पचनास हलकी असून, भूकवर्धक आहे. आंबुशीच्या अंगरसाने धमन्यांचे संकोचन कमी होऊन रक्तस्त्राव बंद होतो. आंबुशीमध्ये खनिज द्रव्याचे प्रमाण मुबलक प्रमाणात आहे.

रानभाज्या, वनभाज्या या कुठेना कुठे उगवतच असतात. त्यामुळे त्या नष्ट झाल्या, असे म्हणता येणार नाही. उलट कृषी विभागाने नवीन भाज्यांचा शोध घेतला पाहिजे. त्यावर संशोधन केले पाहिजे, अशी अपेक्षा रानभाजी महोत्सवाचे निर्माते चैत्राम पवार यांनी व्यक्त केलेली आहे.

वनभाज्या या नैसर्गिकरीत्या पिकविलेल्या असतात. त्यात खतांचा, रासायनिक कीटकनाशकांचा वापर नसतो. या वनभाज्या औषध गुणधर्मीय असतात. त्यांचा आहार घेतला पाहिजे.

- डॉ. संजय शिरसाठ