शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळा़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 22:27 IST

आरोग्य : जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांचे नागरीकांना आवाहन

धुळे : डेंग्यू ताप हा फ्ल्यूसारखा ताप आहे़ तो डेंग्यू विषाणूपासून होतो़ तो टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा़ यादिवशी घरातील सर्व भांडी मोकळी करुन घासून पुसून स्वच्छ ठेवावी़ असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे़राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा केला जातो़ या आजाराने होणारे मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यास शासनाला यश आले आहे़ जिल्ह्यात विविध कारणामुळे या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते़ हा आजार डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे़ डेंग्यू संसर्गित व्यक्तीस डास चावल्यावर वरील प्रकारचा डास संसर्गित होतो़ त्यानंतर तोच डास निरोगी व्यक्तीस चावल्यास त्या व्यक्तीला डेंग्यूचा संसर्ग होतो़ डास चावल्यानंतर पाच ते सात दिवसानंतर डेंग्यू आजाराची लक्षणे दिसायला लागतात़एडिस डासाची लांबी पाच ते सहा मिलीमीटर असते़ या डासाच्या अंगावर पांढरे पट्टे असतात़ त्यामुळे त्याला टायगर मॉस्क्यूटो असेही म्हणतात़ तो दिवसा चावतो़ वायर, छत्री, दोरी, काळे कपडे आदी लोंबकरणाºया ठिकाणी हा डास विश्रांती घेतो़ त्याची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात़ वर्षभरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यातून अळी तयार होते़ त्यामुळे डास अळी असलेली भांडी घासून-पुसून स्वच्छ करावी़ जेणेकरुन पृष्ठभागाला चिकटलेली अंडी नष्ट होतील़तीव्र ताप येणे, डोके दुखी, उलटी, अंग दुखी, डोळ्यांच्या खोबणीमध्ये दुखणे, अंगावर लालसर पुरळ येणे, तीव्र पोट दुखी आणि गंभीर रुग्णास रक्तस्त्राव अशी या आजाराची लक्षणे आहेत़ एडीस डासाला रोखण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवावा़ घर आणि परिसरातील पाणी साचू शकतील अशा निरुपयोगी वस्तू नष्ट कराव्यात़ खराव टायर पंक्चर करावे़ टायरमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेण्यात यावी़ पाण्याची भांडी, ड्रम, रांजण व्यवस्थित झाकून ठेवावेत़ झाकण नसल्यास जुन्या कपड्याने झाकून ठेवावेत़ पाण्याची भांडी झाकल्याने त्यात डास अंडी घालू शकणार नाहीत़ घरावरील टाक्यांना झाकण बसवावेत़ शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी़परिसरातील डबकी वाहती करावीत अथवा बुजवावीत़ मोठ्या डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडवावेत़ परिसर स्वच्छ ठेवावा़ जे कंटेनर रिकामे करता येणार नाहीत अशा कंटेनरमध्ये टेमिफॉस या अळी नाशकाचा वापर करावा़ जैविक नियंत्रण पध्दतीने डास निर्मिती होऊ न देणे, डासोत्पती स्थाने नष्ट करणे, गप्पी माशांचे संगोपन करणे, कायमस्वरुपी डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडणे, फुटके माठ, रांजण, कुंड्या, बाटल्या, निकामी टायर आदींची विल्हेवाट लावावी़या डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करावा़ वैयक्तिक सुरक्षतेसाठी झोपताना विशेषत: कीटकनाशक भारीत मच्छरदाणीचा वापर करावा़ डास प्रतिबंधक मलम, अगरबत्तीचा वापर करावा़ घराच्या खिडक्यांना बारीक जाळीचे पडदे लावावेत़ डेंग्यू तापाची लागण झाल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावून रक्ताची तपासणी करावी़

टॅग्स :Dhuleधुळे