शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

मालपूर परिसरात दुबार पेरणींना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:36 IST

हवामान विभागाने यावर्षी सरासरी एवढा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मृग नक्षत्रात पावसाचेदेखील जोरदार ...

हवामान विभागाने यावर्षी सरासरी एवढा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मृग नक्षत्रात पावसाचेदेखील जोरदार येथे आगमन झाले. या पावसाच्या भरवशावरच शेतकर्‍यांनी खरिपातील पेरणीची कामे व कोरडवाहू कापूस लागवड पूर्ण केली. मात्र तब्बल महिनाभर पावसाने दडी मारल्यामुळे केलेल्या पेरण्या वाया गेल्या. सध्या येथील शेतकर्‍यांना दुबार पेरणीच्या कामांना सामोरे जावे लागत आहे. तर कापसाचीदेखील हीच गत झाल्यामुळे नव्याने कापूस लागवड शेतकऱ्यांना करावी लागत आहे. यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच दुबार पेरणीमुळे येथील शेतकरी भांडवलासाठी आर्थिक चणचणीत सापडला आहे.

प्रदीर्घ खंडानंतर सध्या येथे तोकड्या स्वरुपाचा रिमझिम पाऊस होत आहे. गावात पाऊस तर शेतशिवारात ऊन, एक शिवार सोडून दुसऱ्या शिवारात पाऊस होत आहे. पावसाचे सातत्य राहिले तर ही पेरणी वाढीस लागेल अन्यथा हातातील भागभांडवल व बियाणे सुटून पदरी पुन्हा निराशा पडणार आहे. यामुळे येथील शेतकरी धास्तावले आहेत. यावर्षी येथील मृगाच्या पेरण्या वाया गेल्या आहेत. मूग, उडीद, ज्वारी, बाजरी ही कमी पाण्याची व कमी दिवसांची पिके असून, यासह भुईमूग पिकाचीदेखील काही ठिकाणी शेतकरी पेरणी करताना दिसून येत आहे. मात्र लांबलेल्या पावसामुळे येथे भुईमुगाचे क्षेत्रफळ घटले आहे, तर बाजरीचे क्षेत्रफळ वाढले आहे. पुढच्या आठवड्यात कांदा लागवडीस सुरुवात होणार आहे. येथे मिरचीचीही लागवड करण्यात येते.

यावर्षी मालपूर येथे मजुरीचे दर वाढले असून, निंदणीसाठी दिवसाला एका माणसाची मजुरी दोनशे रुपये आहे. कांदा लागवड, खत लावणे दोनशे रुपये, तर रोजच्या मजुरीचे दर तीनशे रुपये झाले असून, मजुरांना शेतशिवारात घेऊन जाण्यासाठी वाहनांची सोय करावी लागत असल्याने मजुरीचा दर गगनाला भिडत आहे. यामुळे शेती श्वाश्वत नसल्याचे येथील शेतकरी सांगतात.