शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

दोंडाईचा १६ दिवसांत १२० जणांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST

दरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण वाढण्यास साहाय्यभूत ठरत असलेल्या नियमबाह्य वर्तणूक करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची गरज आहे. स्वॅब टेस्टिंग व अँटिजन ...

दरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण वाढण्यास साहाय्यभूत ठरत असलेल्या नियमबाह्य वर्तणूक करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची गरज आहे. स्वॅब टेस्टिंग व अँटिजन टेस्ट प्रमाण वाढविण्यासाठी गरज आहे.

कोरोनाचा पहिल्या लाटेत दोंडाईचात ६ जून, २०२०ला दोन कोरोनाबाधित रुग्णापासून दोंडाईचा शहरात कोरोनाची सुरुवात झाली होती. मधला साधारणतः दोन महिन्यांचा कालावधी सोडला, तर आता पुन्हा कोरोना विषाणूने पुन्हा शिरकाव केला आहे. कोरोनाबाधित वाढत असल्याचा पार्श्वभूमीवर नागरिकांनी गंभीर तर प्रशासनाने कठोर होणे गरजेचे आहे. १ मार्च ते १६ मार्च दरम्यान म्हणजे १६ दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय वाढली आहे. दाट वस्तीसह कॉलनी भागात उच्चभ्रू वस्तीत कोरोनाने शिरकाव केला आहे. दोडाईचासह परिसरातील निमगुळ, मालपूर, टाकरखेडे या दोंडाईचा नजीक असलेल्या गावात कोरोनाची मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने चिंतेत भर पडली आहे.

१ ते १६ मार्चदरम्यान दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात ४२६ जणांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आलेत. दोडाईचातील काही नागरिकांनी निमगुळ प्राथमिक केंद्रात तर काहींनी खासगीत चाचणी केली आहे.

१ रोजीतीन, ५ रोजी आठ, ८ रोजी एक, ९ रोजी तीन, ११ रोजी १८, १२ रोजी नऊ, १३ रोजी आठ, १४ रोजी दोन, १५ रोजी ३४ तर १६ मार्चला ३४ असे ऐकूण १२० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

स्वॅब दिलेल्यात उपजिल्हा रुग्णालयात ७४, निमगुळ प्राथमिक आरोग्य केंद्रात २५, दोंडाईचा अँटिजन टेस्टला १५, खासगीत ६ असे १२० कोरोना बाधित रुग्ण आढळलेत.

दोडाईचा व त्या नजीक असलेल्या ग्रामीण भागात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने आता नागरिकांनी सावधानतेने नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. दुकानदारांनी बिनामास्क ग्राहकांना प्रवेश देऊच नये. ग्राहकानेही दुकानदार व त्यांचा नोकरांना मास्क लावण्यास सूचित करावे. कपडे, भांडे व काही किराणा दुकान यातील होणारी गर्दी कमी करावी. पालिका व पोलीस प्रशासनानेही बिनामास्क व सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्या विरोधात सरसकट कारवाई करावी. प्रत्येक दुकानात, कार्यालयात सॅनिटायझर बंधनकारक करावे. फक्त कागदोपत्री फतवा न काढता त्याची आता अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्य सूज्ञ जनतेचे म्हणणे आहे.

प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्या व सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्या विरोधात कारवाई करणे गरजेचे आहे. दुकानात ग्राहकांना प्रवेश देणाऱ्या विरोधात कारवाई अपेक्षित आहे. कोरोनाबाधित रुग्णांना १४ दिवस घरात राहणे बंधनकारक करावे, अशा उपयोजना केल्यात, तर कोरोना अटकाव होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.