शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

जिल्ह्याची ‘लक्ष्मणरेषा’ ठरतेय असुरक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 22:14 IST

संचार बंदीचा एकाही व्यक्तीवर कारवाई नाहीच

धुळे : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे़ त्यात पुणे, मुंबई, नाशिक शहरात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे़ अन्य शहरामध्ये विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्हयाच्या सीमा सील करुन बाहेरच्या नागरिकांना प्रवेशाची मनाई करण्यात आली आहे़ असे असतांनाही १ ते ८ एप्रिल या कालावधीत पुणे मुंबई, नाशिकसह अन्य शहरातून धुळे शहरात तब्बल ३० नागरिकांनी प्रवेश केल्याची माहिती मनपाच्या सुत्रांकडून मिळाली आहे़ मात्र मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अद्याप एकाही व्यक्तीविरुद्ध पोलिस प्रशासनाकडून कारवाई झालेली आढळून येत नाही़ त्यामुळे जिल्ह्याची लक्ष्मणरेषा असुरिक्षत ठरत आहे़लॉकडाऊन नावालाचदेशात व राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. धुळे जिल्ह्यालाही आता कोरोना विषाणूने विळखा घातल्याने नागरिकांना अधिक दक्षता घेण्याची गरज आहे़ शहराबाहेर साक्रीत कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग, पोलीस, महसूल विभागासह अन्य विभागाची झोप उडाली आहे़बंदोबस्त वाढविण्याची गरजकोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी वेळोवेळी घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे़ मात्र तरीही शहरात आजही नागरिक बिनधास्तपणे बाहेर फिरतांना दिसतात़ शहरातील मुख्य चौकात पोलिस बंदोबस्त सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यत दिसुन येतो़ त्यानंतर सायंकाळी ४ ते १०. ३० पुन्हा कॉलनी परिसरात नागरिकांची वर्दळ होते़ त्यामुळे आजही नागरिकांनी कोरोनाबाबत गांर्भीयांने घेतलेले दिसुन येत नाही़मनाई आदेश नावालाच!लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मनाई आदेश लागु करण्यात आला आहे़ शाळा, महाविद्यालय, दैनदिनी व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे़ तर केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत़ असे असतांना ही भाजी, दुध व अन्य फळ विक्रेत्याकडे ओळखपत्र किंवा परवाना नसतांना शहरात फिरतांना दिसुन येतात तर पेट्रोल पंपवर पेट्रोल सहज मिळत असल्याने शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या आजही आहे़सीमा बंद चा केवळ देखावाजिल्ह्याच्या पन्नास किमी अंतरावर साक्री, मालेगाव तसेच जळगाव, मध्यप्रदेश राज्याची सीमा आहे़ जिल्ह्याला अशा चारही बाजूला कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत़ केवळ नंदुरबार जिल्हा आणि धुळे शहर आता अपवाद राहीले आहे. नंदुरबार आणि शिरपूर तालुका मध्यप्रदेश राज्याची सीमाजवळ आहेत़ तर धुळ्यापासून जळगाव शंभर व मालेगाव व साक्री धुळे शहरापासून ५५ किमी अंतरावर आहे़ अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दररोज वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे़ त्यामुळे धुळे व नंदूरबार जिल्ह्याचा धोका अधिक वाढला आहे़ पोलिस प्रशासनाकडून वेळीच शंभर टक्के सीमा बंद न केल्यास मोठ्या प्रमाणात अनर्थ घडू शकतो़९ दिवसात ३० जणांचा प्रवेशअचानक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याने पुणे, मुंबई शहरात अडकुन पडले आहेत़ नागरिकांनी खाजगी वाहनाद्वारे १ ते ९ एप्रिल या कालावधीत पुणे, मुंबई, नाशिक, नगर तसेच जळगाव शहरातून आतापर्यत ३० नागरिक धुळे शहरात छुप्या पध्दतीने दाखल झाले आहे़ याबाबत प्रशासनाकडे ३ ते ४ दिवसांनतर माहिती मिळाली़ पोलिसांकडून सीमा बंद असतांनाही परजिल्ह्यातून ३० जणांनी धुळे शहरात कसा प्रवेश केला? पोलिस नेमके नाकाबंदीच्या ठिकाणी होते का? पोलिसांना खाजगी वाहन दिसत असतांनाही का सोडण्यात आले? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ कोरोनाचे संकट जवळ येवून ठेपले आहे़ आता सीमा व अन्य मार्ग बंद न केल्यास शहरात कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही़त्यांची माहिती तत्काळ कळवाजिल्ह्या लगतच्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यात बाहेरून आलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे बाहेरून शहरात आलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाला द्या़ जिल्ह्यालगतच्या मालेगाव, नाशिक, जळगाव, सेंधवा या शहर व जिल्ह्यांच्या सरहद्दीवर कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. या परिसरातून तसेच इतर राज्य व देश येथूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक जिल्ह्यात आलेले असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Dhuleधुळे