शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

अमरावती नदीपात्रात पूल नसल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 15:02 IST

पूलाची मागणी : प्रकल्पातून विसर्ग सोडल्यास शेतकऱ्यांच्या जिवीतास धोका

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर-रामी रस्त्यादरम्यान अमरावती नदीपात्रावर पुलाची निर्मिती करण्याची मागणी होत आहे. नदीवर पूल नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते.पावसाळ्यादरम्यान अमरावती प्रकल्पामधून वेळोवेळी पाणी सोडावे लागत असल्यामुळे या पाण्यातून मालपूर ग्रामस्थ मार्गक्रमण करत असल्यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच या रस्त्यावर मालपूर गावाचे अमरधाम असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी त्यावेळेस ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होते.मालपूर बसस्स्थानक येथून तालुक्यातील रामी व नंदुरबार जिह्यातील नंदुरबार व शहादा येथे जाण्यासाठी हा जवळचा रस्ता असून सोयीचा आहे. या रस्त्यावरुन खूप मोठी रहदारी असते. मात्र पावसाळ्यात अमरावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानंतर किंवा धरणाच्या सुरक्षिततेसाठी वेळोवेळी अचानक केव्हाही पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. यामुळे हा रस्ता पुलाअभावी बंद होतो.मालपूर ग्रामस्थांच्या शेतजमिनी कसण्यासाठी या रस्त्याचा वापर करावा लागतो. तसेच या शेतकऱ्यांचे पशुधन देखील शेतशिवारातच असल्यामुळे नाईलाजास्तव धोका पत्करुन पाण्यातून हे शेतकरी मार्गक्रमण करीत असतात. खरीपातील शेती उत्पन्न घरादारात आणण्यासाठी खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे नदीपात्रात पूल होणे गरजेचे आहे.याच मार्गावर ग्रामदैवत श्री व्यांघ्रंबरीदेवीचे मंदिर असून दूरवरचे भाविक येथे सदैव दर्शनासाठी व मानमानता फेडण्यासाठी येत असतात. मात्र पूल नसल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते.शासनाने वेळीच दखल घेऊन या उन्हाळ्यात अमरावती नदीपात्रात पूलाची निर्मिती करावी, अशी मालपूर ग्रामस्थांसह मोयाने, चोरझिरा आदी शेतशिवारातील शेतकºयांची व या मार्गावरुन प्रवास करणाºया प्रवाशांची मागणी आहे.

टॅग्स :Dhuleधुळे