शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धुळेकरांनी लॉकडाउनचा उडाविला ‘फज्जा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 21:52 IST

मुदत वाढविल्यानंतरचे चित्र : रस्त्यावर नेहमीपेक्षाही जास्त गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

धुळे : शहरात वाढत जाणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता जिल्हाधिकारी संजय यादव यांनी १७ तारखेपर्यंत लॉकडाउन वाढविला. ऐरवी नेहमीसुद्ध एवढी गर्दी कधी होत नाही. तेवढी गर्दी धुळेकरांनी लॉकडाउनची मुदत वाढविल्यानंतर पहिल्याच दिवशी रस्त्यावर येऊन केली. धुळेकरांनी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा करीत लॉकडाउन आणि कोरोनाचे गांभीर्यच नसल्याचे दाखवून दिले. देवपूर आणि धुळे शहराला जोडलेल्या कालिकादेवी मंदिराजवळील लहान पुलावर शुक्रवारी सकाळी अक्षरश: ट्रॅफीक जाम झाले होते. शहरात लॉकडाउन आहे की नाही, असा प्रश्न त्यामुळे साहजिकच सर्वांना पडला.शहरात आग्रारोड, महात्मा गांधी चौक परिसरातही सकाळी तीच परिस्थिती होती.शुक्रवारी तर कन्टेन्मेट झोन जाहीर असलेल्या भागातही नागरिक सहजपणे प्रवेश करुन ये - जा करतांना दिसून आले.सोशल डिस्टन्सिंग - शहरात सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडाला मास्क लावण्याबाबत तर न बोललेच बरे असे सांगावेसे वाटते. कारण अगदी नेहमीप्रमाणे गर्दी करीत भाजीपाला खरेदी आणि अन्य व्यवहार केले जात होते. शहरातील अनेक भागात सर्वच दुकाने छुप्या पद्धतीने सुरुच आहे. त्यामुळे लॉकडाउन हे फक्त नावालच आहे, असे स्पष्ट दिसते.पुलावर प्रचंड गर्दी - देवपूर आणि धुळे शहराला जोडणाºया पांझरा नदीच्या पुलावर तर दोन्ही बाजुने येणाºया दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे चक्क ट्रॅफीक जाम झाली होती. परिसरात गाडयांच्या कर्णकर्कश आवाज होत होता. याठिकाणी उभ्या अनेक लोकांनी तर याचे व्हिडीओ काढले तर काहींनी त्याचे फोटो काढण्यातच मग्न दिसले. कोणालाही लॉकडाउन अथवा कोरोनाच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य दिसले नाही.याठिकाणी पोलीस बंदोबस्ताला होते. परंतू ते कोणाकोणाला अडवतील. कारण सर्वच चारचाकी आणि दुचाकीवाले कोण - कोणाचा ओळखीचा असेल, अडविले तर फोन येईल आणि विनाकारण आपल्या माघार घेत सोडावे लागेल. त्यापेक्षा जो येतो आणि जो जातो आहे. त्या सर्वांचा मार्ग मोकळा करण्यातच तो गुंतलेला दिसला.शासनातर्फे कोरोनाचे रुग्ण शहरात वाढत असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक त्या उपाय योजना आणि लॉकडाउन जाहीर केला आहे.परंतू याकडे धुळेकर अजुनही गांभीर्याने लक्ष देतांना दिसून येत नाही. नागरिक रस्त्यावर दिसत आहे. कोणीही थांबण्यास तयार नाही. प्रत्येकाला शहरात काही न काही काम असल्यासारखे फिरतांना दिसत आहे.यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. कारण अशापद्धतीने जर गर्दी होत गेली तर त्यातून संसर्ग वाढण्याची भीती जास्त आहे. धुळेकरांना आतातरी याचे गांभीर्य ओळखावे, अशी अपेक्षा आहे.शहरातील बंद रस्ते स्वत:च सुरु केलेशहरात एकूण २४ कन्टेन्मेट झोन तयार करण्यात आले आहेत. त्या परिसरातील सर्वच रस्ते मनपा प्रशासनाने बंद केले आहेत. त्यासाठी मनपा प्रशासनाने रस्त्यावर लाकडी बांबू आणि अन्य साहित्याने ते बंद केले आहे. परंतु सुरुवातीचे काही दिवस वगळता नागरिकांनी आपल्या सोयीनुसार रस्त्यावरील अडथळे दूर करुन रस्ते सुरु केले आहे. त्यावरुन आता सर्रासपणे वाहतूक सुरु झाली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात बाहेरच्या व्यक्तीला येणे आणि आतील व्यक्ती बाहेर जाणेही शक्य नाही, असा नियम असतांना त्याकडे दुर्लक्ष करुन ही वाहतूक सुरु झाली आहे. मनपा प्रशासन आणि पोलिसांनी याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ते रस्ते पुन्हा बंद केले पाहिजे. तसेच ते करणाºयाविरोधात आवश्यक ती कारवाई करणे गरजेचे आहे.कॉलनी परिसरात रस्ते बंद करुन क्रिकेटशहरातील काही कॉलनी परिसरात आणि पेठ भागातील गल्लीमध्ये आपल्या सोयीनुसार मनपा प्रशासनाने सांगितले नसले तरी रस्ते अडथळे निर्माण करुन ते बंद केले आहे. ते सुद्धा आपल्या सोयीसाठी कारण रस्ते बंद करुन त्यावर सर्रासपणे क्रिेकेट खेळतांना किंवा घोळका करुन ओटयावर बसून गप्पा मारतांना तरुण दिसतात. रस्ता बंद हा घरात थांबण्यासाठी आणि कोणी बाहेरचा व्यक्ती येऊ नये यासाठी असतांना त्या नियमाच्या अगदी विरुद्ध कृती नागरिक करीत आहे. रात्री उशीरापर्यंत आणि दुपारी तरुण मंडळी क्रिेकेट खेळतांना दिसत आहे. याकडेही जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन ते बंद केले पाहिजे. पण त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे सतत सुरु असलेल्या या गोष्टीमुळे स्पष्ट जाणवते. आतातरी ते बंद व्हावे अशी अपेक्षा आहे.विनाकारण बंद रस्त्यामुळे होतोय् त्रासएकीकडे मनपा प्रशासनाने बंद केलेले रस्ते आपल्या सोयीसाठी खुले केले जात आहे. तर दुसरीकडे खुले रस्ते नागरिक विनाकारण बंद करीत आहेत. या दोन्ही गोष्टी प्रशासनाने बंद केल्या पाहिजे. कारण विनाकारण बंद केलेल्या रस्त्यामुळे जे नेहमी खरोखर कामासाठी बाहेर जातात. त्या सर्व लोकाना याचा त्रास होतो. लोकांनी रस्ता बंद केल्यामुळे त्यांना एक ते दोन किलोमीटरचा फेरा करीत दररोज जावे लागते. तसे होऊ नये म्हणून मनपा प्रशासनाने असे विनाकारण बंद रस्ते खुले केले पाहिजे. तसेच याउलट कन्टेन्मेट झोनमधील जे रस्ते नागरिकांनी आपल्या सोयीसाठी न विचारता सुरु केले आहेत. ते पुन्हा बंद करण्यात यावे. अन्यथा कन्टेन्मेट झोनमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याची जास्त भिती आहे. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Dhuleधुळे