शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धुळेकरांनी लॉकडाउनचा उडाविला ‘फज्जा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 21:52 IST

मुदत वाढविल्यानंतरचे चित्र : रस्त्यावर नेहमीपेक्षाही जास्त गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

धुळे : शहरात वाढत जाणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता जिल्हाधिकारी संजय यादव यांनी १७ तारखेपर्यंत लॉकडाउन वाढविला. ऐरवी नेहमीसुद्ध एवढी गर्दी कधी होत नाही. तेवढी गर्दी धुळेकरांनी लॉकडाउनची मुदत वाढविल्यानंतर पहिल्याच दिवशी रस्त्यावर येऊन केली. धुळेकरांनी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा करीत लॉकडाउन आणि कोरोनाचे गांभीर्यच नसल्याचे दाखवून दिले. देवपूर आणि धुळे शहराला जोडलेल्या कालिकादेवी मंदिराजवळील लहान पुलावर शुक्रवारी सकाळी अक्षरश: ट्रॅफीक जाम झाले होते. शहरात लॉकडाउन आहे की नाही, असा प्रश्न त्यामुळे साहजिकच सर्वांना पडला.शहरात आग्रारोड, महात्मा गांधी चौक परिसरातही सकाळी तीच परिस्थिती होती.शुक्रवारी तर कन्टेन्मेट झोन जाहीर असलेल्या भागातही नागरिक सहजपणे प्रवेश करुन ये - जा करतांना दिसून आले.सोशल डिस्टन्सिंग - शहरात सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडाला मास्क लावण्याबाबत तर न बोललेच बरे असे सांगावेसे वाटते. कारण अगदी नेहमीप्रमाणे गर्दी करीत भाजीपाला खरेदी आणि अन्य व्यवहार केले जात होते. शहरातील अनेक भागात सर्वच दुकाने छुप्या पद्धतीने सुरुच आहे. त्यामुळे लॉकडाउन हे फक्त नावालच आहे, असे स्पष्ट दिसते.पुलावर प्रचंड गर्दी - देवपूर आणि धुळे शहराला जोडणाºया पांझरा नदीच्या पुलावर तर दोन्ही बाजुने येणाºया दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे चक्क ट्रॅफीक जाम झाली होती. परिसरात गाडयांच्या कर्णकर्कश आवाज होत होता. याठिकाणी उभ्या अनेक लोकांनी तर याचे व्हिडीओ काढले तर काहींनी त्याचे फोटो काढण्यातच मग्न दिसले. कोणालाही लॉकडाउन अथवा कोरोनाच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य दिसले नाही.याठिकाणी पोलीस बंदोबस्ताला होते. परंतू ते कोणाकोणाला अडवतील. कारण सर्वच चारचाकी आणि दुचाकीवाले कोण - कोणाचा ओळखीचा असेल, अडविले तर फोन येईल आणि विनाकारण आपल्या माघार घेत सोडावे लागेल. त्यापेक्षा जो येतो आणि जो जातो आहे. त्या सर्वांचा मार्ग मोकळा करण्यातच तो गुंतलेला दिसला.शासनातर्फे कोरोनाचे रुग्ण शहरात वाढत असल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक त्या उपाय योजना आणि लॉकडाउन जाहीर केला आहे.परंतू याकडे धुळेकर अजुनही गांभीर्याने लक्ष देतांना दिसून येत नाही. नागरिक रस्त्यावर दिसत आहे. कोणीही थांबण्यास तयार नाही. प्रत्येकाला शहरात काही न काही काम असल्यासारखे फिरतांना दिसत आहे.यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुन्हा कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. कारण अशापद्धतीने जर गर्दी होत गेली तर त्यातून संसर्ग वाढण्याची भीती जास्त आहे. धुळेकरांना आतातरी याचे गांभीर्य ओळखावे, अशी अपेक्षा आहे.शहरातील बंद रस्ते स्वत:च सुरु केलेशहरात एकूण २४ कन्टेन्मेट झोन तयार करण्यात आले आहेत. त्या परिसरातील सर्वच रस्ते मनपा प्रशासनाने बंद केले आहेत. त्यासाठी मनपा प्रशासनाने रस्त्यावर लाकडी बांबू आणि अन्य साहित्याने ते बंद केले आहे. परंतु सुरुवातीचे काही दिवस वगळता नागरिकांनी आपल्या सोयीनुसार रस्त्यावरील अडथळे दूर करुन रस्ते सुरु केले आहे. त्यावरुन आता सर्रासपणे वाहतूक सुरु झाली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात बाहेरच्या व्यक्तीला येणे आणि आतील व्यक्ती बाहेर जाणेही शक्य नाही, असा नियम असतांना त्याकडे दुर्लक्ष करुन ही वाहतूक सुरु झाली आहे. मनपा प्रशासन आणि पोलिसांनी याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ते रस्ते पुन्हा बंद केले पाहिजे. तसेच ते करणाºयाविरोधात आवश्यक ती कारवाई करणे गरजेचे आहे.कॉलनी परिसरात रस्ते बंद करुन क्रिकेटशहरातील काही कॉलनी परिसरात आणि पेठ भागातील गल्लीमध्ये आपल्या सोयीनुसार मनपा प्रशासनाने सांगितले नसले तरी रस्ते अडथळे निर्माण करुन ते बंद केले आहे. ते सुद्धा आपल्या सोयीसाठी कारण रस्ते बंद करुन त्यावर सर्रासपणे क्रिेकेट खेळतांना किंवा घोळका करुन ओटयावर बसून गप्पा मारतांना तरुण दिसतात. रस्ता बंद हा घरात थांबण्यासाठी आणि कोणी बाहेरचा व्यक्ती येऊ नये यासाठी असतांना त्या नियमाच्या अगदी विरुद्ध कृती नागरिक करीत आहे. रात्री उशीरापर्यंत आणि दुपारी तरुण मंडळी क्रिेकेट खेळतांना दिसत आहे. याकडेही जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन ते बंद केले पाहिजे. पण त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे सतत सुरु असलेल्या या गोष्टीमुळे स्पष्ट जाणवते. आतातरी ते बंद व्हावे अशी अपेक्षा आहे.विनाकारण बंद रस्त्यामुळे होतोय् त्रासएकीकडे मनपा प्रशासनाने बंद केलेले रस्ते आपल्या सोयीसाठी खुले केले जात आहे. तर दुसरीकडे खुले रस्ते नागरिक विनाकारण बंद करीत आहेत. या दोन्ही गोष्टी प्रशासनाने बंद केल्या पाहिजे. कारण विनाकारण बंद केलेल्या रस्त्यामुळे जे नेहमी खरोखर कामासाठी बाहेर जातात. त्या सर्व लोकाना याचा त्रास होतो. लोकांनी रस्ता बंद केल्यामुळे त्यांना एक ते दोन किलोमीटरचा फेरा करीत दररोज जावे लागते. तसे होऊ नये म्हणून मनपा प्रशासनाने असे विनाकारण बंद रस्ते खुले केले पाहिजे. तसेच याउलट कन्टेन्मेट झोनमधील जे रस्ते नागरिकांनी आपल्या सोयीसाठी न विचारता सुरु केले आहेत. ते पुन्हा बंद करण्यात यावे. अन्यथा कन्टेन्मेट झोनमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याची जास्त भिती आहे. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Dhuleधुळे