शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

धुळे जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची १,३७८ कामे झाली पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:34 IST

२०१८-१९ या वर्षात १७०० कामांचे होते उद्दिष्ट, ३ हजार ५२२ टीसीएम पाण्याचा झाला साठा

आॅनलाइन लोकमतधुळे : जलयुक्त शिवार या महत्वाकांशी योजनेमुळे केवळ सिंचन क्षमताच वाढलेली नाही, तर असंख्य गावांचा ताळेबंद तयार झालेला आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षातही धुळे जिल्ह्यात जलयुक्त शिवारची १ हजार ७०० कामे मंजूर झाली होती. त्यापैकी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तब्बल १ हजार ३७८ कामे पूर्ण झाली असून, ३२२ प्रगतीपथावर आहे. जलयुक्तच्या या झालेल्या कामांमुळे ३ हजार ५२२ टीसीएम पाण्याचा साठा वाढल्याची माहिती जिल्हा कृषी कार्यालयातून देण्यात आली.पावसाचे पाणी शिवारातच अडवून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, विकेंद्रीत जलसाठे निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या आणि निकामी झालेल्या जलस्त्रोतांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, आणि पाणी अडविण्याच्या कामात लोकसहभाग वाढविणे हा उद्देश घेऊन २०१५ पासून जलयुक्त शिवार ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.२०१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्याला १७०० कामांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत १३७८ कामे पूर्ण झालेली आहेत. यात कृषी विभागाची ५६८ व इतर विभागांची ८१० अशा एकूण १३७८ कामांचा समावेश असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. या सर्व कामांसाठी २०७५.३५ लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. आतापर्यंत ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत.३२२ कामे प्रगतीपथावरदरम्यान जिल्ह्यात जलयुक्त शिवारची ३२२ कामे प्रगतीपथावर असून, ती लवकरच पूर्ण होतील असे सांगण्यात आले. यावर्षीचा पावसाळा जलयुक्त शिवारासाठी मोठा फायदेशीर ठरलेला आहे. गेल्या दोन वर्षात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे होत होती. मात्र अपेक्षित पाऊस पडत नसल्याने, पाण्याचा पुरेसा साठा होत नव्हता. यावर्षी मात्र उलट स्थिती होती. या वर्षात जुलै ते आॅक्टोंबर अखेरपर्यंत दमदार पाऊस झाला. सर्व नदी-नाले ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या बंधाऱ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला. या १३७८ कामांमुळे तब्बल ३ हजार ५२२ टीसीएम पाण्याचा साठा झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे