शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

धुळे जिल्ह्यात भाजीपाल्यापेक्षा फळपिकांची लागवड कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 11:23 IST

केळीच्या पट्टयातही कापूस लागवडीला प्राधान्य

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्या जवळपास पूर्ण होत आलेल्या आहेत. आतापर्यंत समाधानकारक पाऊस असला तरी कडधान्य, तृणधान्य, गळीतधान्य याच्या मानाने फळपीक व भाजीपाला लागवड तुलनेने खूपच कमी आहे. यावर्षी आतापर्यंत फळपिके १ हजार ३५८.३ तर भाजीपाला ५ हजार ४८० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे केळी, मिरची या पट्यातही आता शेतकरी कापूस लागवडीकडेच जास्त प्रमाणात वळलेले आहे.गेल्यावर्षाचा अपवाद वगळता तीन-चार वर्षांपासून धुळे जिल्ह्यात दुुष्काळसदृश्य परिस्थिती होती. पाण्याची कमतरता असल्याने, अनेक शेतकऱ्यांनी कोरडवाहू पिके लागवडीलाच प्राधान्य दिलेले आहे.जिल्ह्यात जवळपास ४ लाख १६ हजार ९७८ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी करण्यात येते. यावर्षी तृणधान्याची १ लाख ३३ हजार ७८२ हेक्टरवर, कडधान्याची २४ हजार ७३० तर गळीत धान्याचे २९ हजार ९९१ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट आहे.दरम्यान जिल्ह्यात मोजक्या भागातच पाण्याची मुबलकता आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध असलेल्या भागातच भाजीपाला व फळपिकांची शेती करण्यात येते.यावर्षी खरीप हंगामात फळ पिकाची अवघ्या १ हजार ३५८.३ हेक्टर क्षेत्रावर लागवड आतापर्यंत करण्यात आलेली आहे. यात आंबा २१५.५ हेक्टर, केळी ३२४, सीताफळ १२७, कागदी लिंबू ६२.७, मोसंबी ७.५ पपई ४४२ व इतर फळपिके १८१ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेली आहे.फळपिकांच्या मानाने भाजीपाल्याची लागवड जास्त आहे. विशेषत: धुळे तालुका व साक्री तालुक्यात भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते.जिल्ह्यात सर्वाधिक लागवड मिरचीची करण्यात आली आहे. ९९३ हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड झालेली आहे. त्या खालोखाल कांद्याची लागवड ७८७ हेक्टर, टोमॅटो ३२१, वांगी २०६, कोबी २२१, वाटाणा ४३, व इतर भाजीपाला २ हजार ४८३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे