शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

धुळे जिल्ह्यात भाजीपाल्यापेक्षा फळपिकांची लागवड कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 11:23 IST

केळीच्या पट्टयातही कापूस लागवडीला प्राधान्य

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरण्या जवळपास पूर्ण होत आलेल्या आहेत. आतापर्यंत समाधानकारक पाऊस असला तरी कडधान्य, तृणधान्य, गळीतधान्य याच्या मानाने फळपीक व भाजीपाला लागवड तुलनेने खूपच कमी आहे. यावर्षी आतापर्यंत फळपिके १ हजार ३५८.३ तर भाजीपाला ५ हजार ४८० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे केळी, मिरची या पट्यातही आता शेतकरी कापूस लागवडीकडेच जास्त प्रमाणात वळलेले आहे.गेल्यावर्षाचा अपवाद वगळता तीन-चार वर्षांपासून धुळे जिल्ह्यात दुुष्काळसदृश्य परिस्थिती होती. पाण्याची कमतरता असल्याने, अनेक शेतकऱ्यांनी कोरडवाहू पिके लागवडीलाच प्राधान्य दिलेले आहे.जिल्ह्यात जवळपास ४ लाख १६ हजार ९७८ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी करण्यात येते. यावर्षी तृणधान्याची १ लाख ३३ हजार ७८२ हेक्टरवर, कडधान्याची २४ हजार ७३० तर गळीत धान्याचे २९ हजार ९९१ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट आहे.दरम्यान जिल्ह्यात मोजक्या भागातच पाण्याची मुबलकता आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध असलेल्या भागातच भाजीपाला व फळपिकांची शेती करण्यात येते.यावर्षी खरीप हंगामात फळ पिकाची अवघ्या १ हजार ३५८.३ हेक्टर क्षेत्रावर लागवड आतापर्यंत करण्यात आलेली आहे. यात आंबा २१५.५ हेक्टर, केळी ३२४, सीताफळ १२७, कागदी लिंबू ६२.७, मोसंबी ७.५ पपई ४४२ व इतर फळपिके १८१ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेली आहे.फळपिकांच्या मानाने भाजीपाल्याची लागवड जास्त आहे. विशेषत: धुळे तालुका व साक्री तालुक्यात भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते.जिल्ह्यात सर्वाधिक लागवड मिरचीची करण्यात आली आहे. ९९३ हेक्टर क्षेत्रावर मिरचीची लागवड झालेली आहे. त्या खालोखाल कांद्याची लागवड ७८७ हेक्टर, टोमॅटो ३२१, वांगी २०६, कोबी २२१, वाटाणा ४३, व इतर भाजीपाला २ हजार ४८३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे