शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

धोकादायक इमारतींचा धोका कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 11:46 PM

धुळे : मुंबईत ‘साईदर्शन’ ही इमारत अचानक कोसळल्याने १७ जणांना प्राण गमावावा लागल्याची घटना मंगळवारी घडली़

ठळक मुद्देधुळे शहरात तब्बल १०५ धोकादायक इमारतीस्ट्रक्चरल आॅडिटकडे दुर्लक्ष

धुळे : मुंबईत ‘साईदर्शन’ ही इमारत अचानक कोसळल्याने १७ जणांना प्राण गमावावा लागल्याची घटना मंगळवारी घडली़ धुळे शहरातदेखील आजच्या स्थितीत तब्बल १०५ धोकादायक इमारती असूनही मनपाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे़ त्यामुळे भविष्यात धुळ्यातही अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही़ शहरात अनेक इमारती कधीही कोसळण्याच्या अवस्थेत असल्याचे ‘लोकमत’ सर्वेक्षणात समोर आले आहे़नोटिसांची ‘औपचारिकता’शहरातील जुने धुळे, पेठ भाग व अन्य काही परिसरांमध्ये इंग्रजकालीन इमारती आहेत़ त्यापैकी बहुतांश इमारतींची बांधकामे १०० वर्षांपेक्षा अधिक जुनी झाली आहेत़ धोकादायक इमारतींना मनपाने दरवर्षी मुंबई प्रांतिक मनपा अधिनियम १९४९ मधील इमारतीसंबंधी अधिनियम २६४(१) नुसार नोटिसा बजावणे क्रमप्राप्त असल्याने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी संबंधित धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या जातात़स्ट्रक्चरल आॅडिटकडे दुर्लक्षसदर नोटीस मिळाल्यावर संबंधित इमारत मालकाने त्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून ते महापालिकेला सादर करायला हवे़ मात्र एकाही इमारत मालकाने इमारतीच्या स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल महापालिकेला सादर केलेला नाही़ उलट धोकादायक इमारत असल्यास त्यावर पावसाळ्यात प्लॅस्टिकचे कागद टाकून व इमारत धोकादायक असल्याचा फलक लावून इमारतीचे मालक स्वत: मुक्त होण्याचा प्रयत्न करताना दिसतात़संभाव्य वादांमुळे टाळाटाळबहुतांश धोकादायक इमारती या कधीही कोसळण्याची शक्यता आहे़ मात्र असे असतानाही त्यामध्ये नागरिक रहिवास करतात़ त्यामुळे इमारत कोसळल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते़ इमारतीवर कारवाईपूर्वी नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होत असल्याने संभाव्य वाद लक्षात घेऊन मनपा प्रशासन त्याकडे डोळेझाक करते़ त्याचप्रमाणे धोकादायक इमारतींमध्ये राहणाºया नागरिकांना पर्यायी व्यवस्था नसल्याने ते इमारत सोडण्यास तयार नसतात, तर बहुतांश इमारतींचे वादविवाद न्यायप्रविष्ठ असल्याने पालिका प्रशासन त्यावर कारवाई करण्यास धजावत नाही़ मुंबईत घडलेल्या इमारत दुर्घटनेमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले असल्याने या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनपाकडून धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर ठोस आवश्यक आहे़ जेणेकरून संभाव्य दुर्दैवी घटना टाळता येऊ शकतील़महापालिकेतर्फे दरवर्षी धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या जातात़ मात्र नागरिकांनीही या इमारतींवरील कार्यवाहीसाठी सहकार्य करायला हवे़ धोकादायक इमारतींबाबत निश्चितपणे कार्यवाही केली जाईल़-रवींद्र जाधव,उपायुक्त, मनपा, धुळे