शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

जगाच्या नकाशावरुन पाकिस्तान नेस्तनाबूत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:38 IST

आमदार टी राजासिंह : धुळ्यातील हिंदू सभेत परखड मत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पुलवामा येथील आक्रमण हे पाकिस्तानचे भारताविरूद्धचे छुपे युद्ध आहे. त्याला भारताने चोख उत्तर द्यायला हवे. पाकिस्तानवर आक्रमण हा देशातील प्रत्येक देशप्रेमी नागरिकांचा आवाज आहे.  हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे विसरुन चालणार नाही असे परखड मत गोरक्षक आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ भाग्यनगरचे आमदार टी. राजासिंह यांनी व्यक्त केले.येथील मालेगाव रोडवरील गिंदोडीया मैदानावर आयोजित हिंदु राष्ट्र जागृती सभेत आमदार राजासिंह बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सदगुरु नंदकुमार जाधव, रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे आणि हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर उपस्थित होते़ आमदार राजासिंह म्हणाले, पाकिस्तान हा आजचा अफजलखान असून त्याचा कोथळा काढला नाही, तर भारतावर संकट निश्चित आहे. पंतप्रधान मोदी हे देशप्रेमी नागरिकांचे प्रतिनिधीत्व करत आहेत. एका सर्जिकलने पाकिस्तान सुधारणारा नाही. पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नेस्तनाबूत करणे, हेच सैनिकांच्या हौतात्माचे उत्तर ठरेल, असेही आमदार राजासिंह यांनी सांगितले़ आज देशाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची आवश्यकता आहे. महाराजांनी युवकांना एकत्र करून हिंदवी राष्ट्राची स्थापना केली. आजही अशाच हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अत्यावश्यक आहे. जोपर्यंत आपण हिंदु राष्ट्राची शपथ घेत नाही आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करत नाही, तोपर्यंत हिंदूंवरील अत्याचार थांबणारे नाहीत.रागेश्री देशपांडे म्हणाल्या, आजच्या सभेला उपस्थित प्रत्येक हिंदू स्वत:ची जात-पात, पक्ष, संप्रदाय आणि संघटना विसरून केवळ हिंदु-राष्ट्र स्थापनेसाठी संघटित झाला आहे. आता एकच लक्ष, हिंदु-राष्ट्ऱ असे सांगत त्या म्हणाल्या, आमचा हा शौर्यशाली इतिहास दडपण्याचे षडयंत्र चालू आहे. आज हिंदूंपुढे जिहादी आतंकवाद, लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदू नेत्यांच्या हत्या यासारखी संकटे उभी ठाकली आहेत. हिंदु मुलींना धर्मांधांकडून लग्नाचे प्रलोभन दाखवून फसवण्यात येते. या मुलींपासून अपत्ये जन्माला घालून जग इस्लाममय करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. हे रोखण्यासाठी हिंदू युवतींना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिला आणि पुरुषांसाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण, धर्मशिक्षण दिले जात आहे. यामध्ये सर्व हिंदू भगिनींनी सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले़ काश्मीरमध्ये यापुढे सैन्यावर दगडफेक करणाºयांना रबरी गोळ्यांनी नव्हे, तर एके-४७ ने उत्तर द्या. जवानांवर फेकलेल्या प्रत्येक दगडाचे उत्तर गोळीने दिले जाईल, असा संदेश द्यायला हवा. आम्ही केवळ निंदा करतो आणि बदला घेण्याची भाषा करतो; परंतु यांची खोड जिरवण्यासाठी यांच्यावर आक्रमण करणे हाच उपाय आहे. त्यामुळे आता भारताला संरक्षणमंत्र्यांची नाही, तर युद्धमंत्र्यांची आवश्यकता आहे, असे प्रशांत जुवेकर म्हणाले़ प्रारंभी शंखनाद करण्यात आला. व्यासपिठावर सुनील भोलाणेकर, अनिल दीक्षित, एकनाथ भावे यांनी वेदमंत्रपठण केले. सचिन वैद्य यांनी समितीच्या राष्ट्र-धर्म विषयक उल्लेखनीय कार्याची माहिती दिली. या सभेचे सूत्रसंचालन कु. प्रतीक्षा कोरेगावकर यांनी केले. पंकज बागुल यांच्यासह अन्य उपस्थित होते़ 

टॅग्स :Dhuleधुळे