शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शक्तिप्रदर्शन करीत प्रचाराचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:29 IST

जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै - ऑगस्टमध्येच संपलेली होती. मात्र कोरोनामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव ...

जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै - ऑगस्टमध्येच संपलेली होती. मात्र कोरोनामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. जिल्ह्यातील २१८ पैकी धुळे तालुक्यात ७२, शिंदखेडा तालुक्यात ६३, साक्री तालुक्यात ४९ व शिरपूर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींचा समावेश होता. ७४७ प्रभागांतून १,९८८ सदस्य निवडणून देण्यासाठी तब्बल ६ हजार २०६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीनंतर धुळे तालुक्यातील ६, शिंदखेड्यातील १५, साक्रीतील ९ व शिरपूर तालुक्यातील ६ अशा एकूण ३६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, काही वॉर्डांतील एक-दोन जागा असे एकूण ५१२ सदस्य बिनविरोध झालेले आहेत. आता १८२ ग्रामपंचायतींसाठी ३ हजार ३१९ उमेदवार रिंगणात आहेत.

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गेल्या १० दिवसांपासून गल्लोगल्ली प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. उमेदवार व त्यांचे समर्थक गावात फिरून मत मागत होते. गावातील समस्यांवर अनेकांनी प्रकाश टाकला. काहींनी आपल्या वॉर्डात कॉर्नर सभाही घेतल्या. मात्र त्याची संख्या अतिशय कमी प्रमाणात होती.

दरम्यान, शेवटच्या दोन दिवसांत ग्रामीण भागात प्रचारामुळे निवडणुकीची बऱ्यापैकी वातावरण निर्मिती झाल्याचे चित्र दिसून आले. पॅनल प्रमुख व उमेदवारांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांकडून मतांचा जोगवा मागितला.

बुधवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी काही उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून प्रचार केला. काही ठिकाणी रॅली काढूनही उमेदवारांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते.

आज मतदान साहित्य वाटप होणार

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, मतदानासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी मतदानाचे साहित्य वाटप केल्यानंतर कर्मचारी त्या-त्या मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत.

नेत्यांच्या सभाही झाल्या नाहीत

नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आदी निवडणुकींसाठी नेत्यांच्या प्रमुख गावांमध्ये सभा होत असतात. या सभांमुळे वातावरण निर्मिती होऊन त्याचा फायदा उमेदवाराला होत असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठेच बाहेरच्या नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत. काही ठिकाणी तालुका स्तरावरील नेत्यांनीच मोठ्या गावांना भेटी देऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. हे वगळता पॅनल प्रमुख व उमेदवारांनाच प्रचार करावा लागला. यात त्यांना कितपत यश मिळते हे निकालानंतर स्पष्ट होऊ शकणार आहे.