शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

शक्तिप्रदर्शन करीत प्रचाराचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:29 IST

जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै - ऑगस्टमध्येच संपलेली होती. मात्र कोरोनामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव ...

जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै - ऑगस्टमध्येच संपलेली होती. मात्र कोरोनामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. जिल्ह्यातील २१८ पैकी धुळे तालुक्यात ७२, शिंदखेडा तालुक्यात ६३, साक्री तालुक्यात ४९ व शिरपूर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींचा समावेश होता. ७४७ प्रभागांतून १,९८८ सदस्य निवडणून देण्यासाठी तब्बल ६ हजार २०६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीनंतर धुळे तालुक्यातील ६, शिंदखेड्यातील १५, साक्रीतील ९ व शिरपूर तालुक्यातील ६ अशा एकूण ३६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, काही वॉर्डांतील एक-दोन जागा असे एकूण ५१२ सदस्य बिनविरोध झालेले आहेत. आता १८२ ग्रामपंचायतींसाठी ३ हजार ३१९ उमेदवार रिंगणात आहेत.

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गेल्या १० दिवसांपासून गल्लोगल्ली प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. उमेदवार व त्यांचे समर्थक गावात फिरून मत मागत होते. गावातील समस्यांवर अनेकांनी प्रकाश टाकला. काहींनी आपल्या वॉर्डात कॉर्नर सभाही घेतल्या. मात्र त्याची संख्या अतिशय कमी प्रमाणात होती.

दरम्यान, शेवटच्या दोन दिवसांत ग्रामीण भागात प्रचारामुळे निवडणुकीची बऱ्यापैकी वातावरण निर्मिती झाल्याचे चित्र दिसून आले. पॅनल प्रमुख व उमेदवारांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांकडून मतांचा जोगवा मागितला.

बुधवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी काही उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून प्रचार केला. काही ठिकाणी रॅली काढूनही उमेदवारांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते.

आज मतदान साहित्य वाटप होणार

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, मतदानासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी मतदानाचे साहित्य वाटप केल्यानंतर कर्मचारी त्या-त्या मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत.

नेत्यांच्या सभाही झाल्या नाहीत

नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आदी निवडणुकींसाठी नेत्यांच्या प्रमुख गावांमध्ये सभा होत असतात. या सभांमुळे वातावरण निर्मिती होऊन त्याचा फायदा उमेदवाराला होत असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठेच बाहेरच्या नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत. काही ठिकाणी तालुका स्तरावरील नेत्यांनीच मोठ्या गावांना भेटी देऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. हे वगळता पॅनल प्रमुख व उमेदवारांनाच प्रचार करावा लागला. यात त्यांना कितपत यश मिळते हे निकालानंतर स्पष्ट होऊ शकणार आहे.