शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
4
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
5
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
6
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
7
Women Health: मासिक पाळी येण्यापूर्वी मूड का बिघडतो? शरीरातील 'हे' ५ बदल वेळीच ओळखा!
8
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
9
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
10
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
11
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
12
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
13
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
14
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
15
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
16
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
17
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
18
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
19
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
20
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिप्रदर्शन करीत प्रचाराचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:29 IST

जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै - ऑगस्टमध्येच संपलेली होती. मात्र कोरोनामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव ...

जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै - ऑगस्टमध्येच संपलेली होती. मात्र कोरोनामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. जिल्ह्यातील २१८ पैकी धुळे तालुक्यात ७२, शिंदखेडा तालुक्यात ६३, साक्री तालुक्यात ४९ व शिरपूर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींचा समावेश होता. ७४७ प्रभागांतून १,९८८ सदस्य निवडणून देण्यासाठी तब्बल ६ हजार २०६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीनंतर धुळे तालुक्यातील ६, शिंदखेड्यातील १५, साक्रीतील ९ व शिरपूर तालुक्यातील ६ अशा एकूण ३६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, काही वॉर्डांतील एक-दोन जागा असे एकूण ५१२ सदस्य बिनविरोध झालेले आहेत. आता १८२ ग्रामपंचायतींसाठी ३ हजार ३१९ उमेदवार रिंगणात आहेत.

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गेल्या १० दिवसांपासून गल्लोगल्ली प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. उमेदवार व त्यांचे समर्थक गावात फिरून मत मागत होते. गावातील समस्यांवर अनेकांनी प्रकाश टाकला. काहींनी आपल्या वॉर्डात कॉर्नर सभाही घेतल्या. मात्र त्याची संख्या अतिशय कमी प्रमाणात होती.

दरम्यान, शेवटच्या दोन दिवसांत ग्रामीण भागात प्रचारामुळे निवडणुकीची बऱ्यापैकी वातावरण निर्मिती झाल्याचे चित्र दिसून आले. पॅनल प्रमुख व उमेदवारांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांकडून मतांचा जोगवा मागितला.

बुधवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी काही उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून प्रचार केला. काही ठिकाणी रॅली काढूनही उमेदवारांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले होते.

आज मतदान साहित्य वाटप होणार

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, मतदानासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी मतदानाचे साहित्य वाटप केल्यानंतर कर्मचारी त्या-त्या मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत.

नेत्यांच्या सभाही झाल्या नाहीत

नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आदी निवडणुकींसाठी नेत्यांच्या प्रमुख गावांमध्ये सभा होत असतात. या सभांमुळे वातावरण निर्मिती होऊन त्याचा फायदा उमेदवाराला होत असतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठेच बाहेरच्या नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत. काही ठिकाणी तालुका स्तरावरील नेत्यांनीच मोठ्या गावांना भेटी देऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. हे वगळता पॅनल प्रमुख व उमेदवारांनाच प्रचार करावा लागला. यात त्यांना कितपत यश मिळते हे निकालानंतर स्पष्ट होऊ शकणार आहे.