शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST

धुळे : जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्याने दुष्काळ जाहीर करावा, जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडावा, अशी मागणी काॅंग्रेसने केली आहे. ...

धुळे : जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्याने दुष्काळ जाहीर करावा, जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडावा, अशी मागणी काॅंग्रेसने केली आहे. याबाबत धुळे ग्रामीणचे आमदार तथा काॅंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसह काॅंग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आमदार कुणाल पाटील यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील अनेक भागांत पावसाने धुमाकूळ घातलेला असूनही धुळे जिल्ह्यात मात्र तीन-चार आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. पिके कोमेजू लागली आहेत. जिराईत शेतीकडे पाहिले तर जीव कासावीस होतो. बागायतदार शेतकरीसुद्धा विहिरीतील पाणी तळाला गेल्याने चिंतित आहेत. जिल्ह्यात अद्याप एकदाही मुसळधार पाऊस झाला नसल्याने नद्या, नाले, ओढे कोरडेठाक आहेत. परिणामी विहिरींचा उद्भव आटत आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील मध्यम, लघू आणि इतर पाटबंधारे प्रकल्पांत पाण्याचा साठा अत्यंत कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. तीन आठवड्यांपासून सोसाट्याचा वारा वाहत आहे. आभाळात ढग दाटून येत आहेत; पण पाऊस मात्र पडत नाही. गेल्या आठवड्यात कडक ऊन पडल्याने पिके अधिक प्रमाणात कोमेजू लागल्याने पिकांची अवस्था नाजूक झाली आहे. उभ्या असलेल्या इतर पिकांवर पावसाअभावी रोगाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वच जण पावसाची चातकसारखी वाट पाहत आहेत. एकीकडे शेतीचे हे संकट निर्माण झाले असताना काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असल्याचे गेल्या दोन वर्षांत स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, आर्थिक आधार देण्यासाठी या सरकारने कधीच मागे-पुढे पाहिले नाही. धुळे जिल्ह्यातील ही अवर्षणप्रवण बाब शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी आणि जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक सर्वांनाच योजनेचा लाभ द्यावा, जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या बाबतीत शासनस्तरावर आपण संवाद साधून प्रयत्न करावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

गुलाबराव कोतेकर, डॉ. दरबारसिंग गिरासे, बाजीराव पाटील, महिला काँग्रेस अध्यक्ष गायत्री जयस्वाल, साहेबराव खैरनार, डाॅ. दत्ता परदेशी, पंढरीनाथ पाटील, अशोक सुडके, योगेश पाटील, शिरीष सोनवणे, अशोक राजपूत, अरुण पाटील, सोमनाथ पाटील, अविनाश महाजन, अर्जुन पाटील, बापू खैरनार, सुनील ठाकरे, जे. डी. पाटील, प्रदीप देसले, शिवाजी अहिरे, दिलीप शिंदे, ज्ञानेश्वर मराठे, एन. डी. पाटील, संतोष राजपूत, झुलाल पाटील, रावसाहेब पाटील, गणेश मधुकर गर्दे, राजीव पाटील, पंकज चव्हाण, हर्षल साळुंके, किरण नगराळे, हसन पठाण, आबा गर्दे, आबा पगारे, दिनेश महाले, आबा शिंदे, सतीश रवंदळे, विशाल पाटील, उपसरपंच कुणाल पाटील, अरुण पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.