शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST

धुळे : जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्याने दुष्काळ जाहीर करावा, जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडावा, अशी मागणी काॅंग्रेसने केली आहे. ...

धुळे : जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्याने दुष्काळ जाहीर करावा, जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडावा, अशी मागणी काॅंग्रेसने केली आहे. याबाबत धुळे ग्रामीणचे आमदार तथा काॅंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसह काॅंग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आमदार कुणाल पाटील यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील अनेक भागांत पावसाने धुमाकूळ घातलेला असूनही धुळे जिल्ह्यात मात्र तीन-चार आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. पिके कोमेजू लागली आहेत. जिराईत शेतीकडे पाहिले तर जीव कासावीस होतो. बागायतदार शेतकरीसुद्धा विहिरीतील पाणी तळाला गेल्याने चिंतित आहेत. जिल्ह्यात अद्याप एकदाही मुसळधार पाऊस झाला नसल्याने नद्या, नाले, ओढे कोरडेठाक आहेत. परिणामी विहिरींचा उद्भव आटत आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील मध्यम, लघू आणि इतर पाटबंधारे प्रकल्पांत पाण्याचा साठा अत्यंत कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. तीन आठवड्यांपासून सोसाट्याचा वारा वाहत आहे. आभाळात ढग दाटून येत आहेत; पण पाऊस मात्र पडत नाही. गेल्या आठवड्यात कडक ऊन पडल्याने पिके अधिक प्रमाणात कोमेजू लागल्याने पिकांची अवस्था नाजूक झाली आहे. उभ्या असलेल्या इतर पिकांवर पावसाअभावी रोगाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वच जण पावसाची चातकसारखी वाट पाहत आहेत. एकीकडे शेतीचे हे संकट निर्माण झाले असताना काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असल्याचे गेल्या दोन वर्षांत स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, आर्थिक आधार देण्यासाठी या सरकारने कधीच मागे-पुढे पाहिले नाही. धुळे जिल्ह्यातील ही अवर्षणप्रवण बाब शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी आणि जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक सर्वांनाच योजनेचा लाभ द्यावा, जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या बाबतीत शासनस्तरावर आपण संवाद साधून प्रयत्न करावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

गुलाबराव कोतेकर, डॉ. दरबारसिंग गिरासे, बाजीराव पाटील, महिला काँग्रेस अध्यक्ष गायत्री जयस्वाल, साहेबराव खैरनार, डाॅ. दत्ता परदेशी, पंढरीनाथ पाटील, अशोक सुडके, योगेश पाटील, शिरीष सोनवणे, अशोक राजपूत, अरुण पाटील, सोमनाथ पाटील, अविनाश महाजन, अर्जुन पाटील, बापू खैरनार, सुनील ठाकरे, जे. डी. पाटील, प्रदीप देसले, शिवाजी अहिरे, दिलीप शिंदे, ज्ञानेश्वर मराठे, एन. डी. पाटील, संतोष राजपूत, झुलाल पाटील, रावसाहेब पाटील, गणेश मधुकर गर्दे, राजीव पाटील, पंकज चव्हाण, हर्षल साळुंके, किरण नगराळे, हसन पठाण, आबा गर्दे, आबा पगारे, दिनेश महाले, आबा शिंदे, सतीश रवंदळे, विशाल पाटील, उपसरपंच कुणाल पाटील, अरुण पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.