शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलपाडा प्रकल्पातून अखेर आवर्तन सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:18 IST

धुळे प्र.जिल्हाधिकाºयांचे आदेश : ‘पाटबंधारे’ची कार्यवाही, थकबाकीची जबाबदारी ‘ग्रामीण पाणीपुरवठा’वर 

ठळक मुद्देजिल्ह्यात १३ गावांना टॅँकरद्वारे पाणी, नदीकाठच्या गावांना तीव्र पाणीटंचाईथकबाकीचा तिढ्यामुळे आवर्तन लांबले आवर्तन सुटल्याने ग्रामीण भागाला दिलासा 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : टंचाईच्या झळा तीव्र झाल्यानंतर सातत्याने मागणी होत असल्याने अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून अखेर सोमवारी दुपारी १२ वाजता पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. रविवारी प्र.जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांनी याबाबत पाटबंधारे विभागाला आदेश दिले होते. त्यावर लगेच कार्यवाही करण्यात आली. ग्रा.पं.कडील पाणीपट्टी थकबाकी वसूल करून ती पाटबंधारे विभागास देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर टाकण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाने दुसºया आवर्तनासाठी एकूण थकबाकीच्या किमान ५० टक्के रक्कम भरण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पत्र पाठवून केली होती. त्यावर थकबाकी वसुली कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली असून चालू मे महिन्याअखेर किमान ५० टक्के थकबाकी भरण्याची ग्वाही देऊन टंचाई दूर करण्यासाठी लगेच आवर्तन सोडण्याची विनंती पाणीपुरवठा विभागाने पाटबंधारे विभागाला पत्र लिहून केली होती. तेच पत्र प्र.जिल्हाधिका-यांना देऊन टंचाई निवारणासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाला आदेश द्यावे, अशी विनंती करण्यात आली होती. त्या नुसार डॉ.नंदकुमार बेडसे यांनी पाटबंधारे विभागाला नदीपात्रातील जिल्ह्यातील शेवटच्या गावापर्यंत पोहचेल, या बेताने पाणी सोडण्याचे आदेश दिले. ते पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहचणे अपेक्षित आहे. पाणी पोहचविण्याची जबाबदारी अधिकाºयांवर सुटलेले आवर्तन धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यांच्या शेवटच्या गावांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संयुक्तरीत्या संबंधित तहसीलदार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या पं.स. उपअभियंता, वीज महावितरण कंपनीचे उपअभियंता, पोलीस निरीक्षक, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता, तलाठी व ग्रामसेवक यांची राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी-यांनी त्यांच्या स्तरावर अधिकारी, कर्मचाºयांचे पथक स्थापन करावे. या पथकाने अवैधरीत्या पाणी अडविणे व अवैधरीत्या उपसा करणा-यांवर कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत. नदीपात्रातील १९ कोल्हापुरी बंधा-यांच्या फळ्या काढण्याची जबाबदारी त्या-त्या विभागाची राहणार आहे. यात हलगर्जीपणा केल्यास संबंधिताविरूद्ध प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही प्र.जिल्हाधिकाºयांनी आदेशात दिला आहे. प्रकल्पातून सोडलेल्या पाणीसाठ्याची पाणीपट्टीची रक्कम लोकसंख्येनुसार ग्रा.पं.ना विभागून देत ती रक्कम वसूल करून पाटबंधारे विभागास देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची राहील, असेही नमूद केले आहे. जिल्ह्यात टंचाईची धग चांगलीच वाढल्याने टॅँकरची संख्या वाढत चालली आहे. सध्या तापमानाचा पारा ४३-४४ अंशावर स्थिरावला असून पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे टॅँकरसाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव वाढू लागले आहेत.मार्चच्या दुसºया आठवड्यापर्यंत केवळ शिंदखेडा तालुक्यातील ९ गावांना ८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. त्यानंतर मात्र तापमानात वाढ होत गेल्याने टॅँकरची मागणी व संख्याही वाढत गेली. सद्यस्थितीत १३ गावांना १३ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शिंदखेडा तालुक्यातील ९ गावांना ८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात पथारे, भडणे, वरुळ घुसरे, चुडाणे, सोनशेलू, विटाई, कामपूर, दत्ताणे व मेलाणे या  गावांचा समावेश आहे. दत्ताणे व मेलाणे या दोन गावांना एका टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे. तर धुळे तालुक्यातील ४ गावांना ५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यात फागणे, आंबोडे, मांडळ व मोघण या गावांचा समावेश आहे. मांडळ गावासाठी २७ एप्रिल रोजी तर मोघणसाठी ३ मे रोजी टॅँकर सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले. फागणे या मोठ्या गावासाठी एकाचवेळी दोन टॅँकर सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर तेथे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. आवर्तन सोडण्याबाबत प्र.जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे यांचे आदेश रविवारी प्राप्त झाले. सोमवारी दुपारी १२ वाजता आवर्तन सोडून आदेशाची अंमलबजावणी केली, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के.टी. सूर्यवंशी यांनी दिली.  

टॅग्स :DhuleधुळेWaterपाणी