शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

जिल्ह्यातील पिके, सिंचनाची माहिती होईल आता ऑनलाईन; धुळे जिल्ह्यातही राबविणार ई-पीक पाहणी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात मंगळवारी दुपारी महसूल व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय अभिमुखता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात ...

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात मंगळवारी दुपारी महसूल व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय अभिमुखता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक एस. डी. मालपुरे, तहसीलदार गायत्री सैंदाणे, सुनील सैंदाणे, अप्पर तहसीलदार संजय शिंदे, तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे, आदी उपस्थित होते.

हेमांगी पाटील यांनी सांगितले की, टाटा ट्रस्टच्या सहकार्याने मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. या आज्ञावलीचा प्रयोग पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील करंजपाडा येथे यशस्वीरीत्या राबविण्यात आला आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पाची यापूर्वी राज्यातील २० तालुक्यांमध्ये यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. आता खरीप हंगाम २०२१-२०२२ पासून सर्व जिल्ह्यांत अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ई-पीक पाहणी कार्यक्रमात शेतकऱ्यांचा सक्रिय आणि व्यापक सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पीकपाहणीची जलद, वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पद्धतीने माहिती संकलित करण्यात येणार आहे. तलाठ्यांचे काम सोपे होण्यास मदत होणार आहे.

या ॲपच्या माध्यमातून अधिप्रमाणित रिअल टाइम डाटा उपलब्ध होणार आहे. मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे स्वत:च्या शेतातील उभ्या पिकांची माहिती, अक्षांश-रेखांश दर्शविणाऱ्या पिकांच्या छायाचित्रासह ही माहिती उपलब्ध होणार आहे. पिकांच्या नोंदणीबरोबरच जलस्रोतांची साधने, सिंचनाचा प्रकार, बांधावरची झाडे, पालेभाज्या, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, विहीर पड, इमारत पड यांसारख्या कायम पडचीही नोंद करता येणार आहे.

पिकांच्या नुकसान भरपाईसाठी उपयुक्त

‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक मालपुरे म्हणाले, या ॲपमध्ये ३५२ पिकांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यानुसार हे ॲप वेळोवेळी अद्ययावत होईल. या ॲपच्या माध्यमातून पीकपाहणीची वस्तुस्थितिदर्शक व सत्यस्थितिदर्शक माहिती संकलित होईल. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई योग्य प्रकारे मदतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘विकेल ते पिकेल’ या योजनेसाठी हे ॲप उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.