शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

नारीशक्तीमुळे होतेय बलवान पिढीची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:24 IST

मकरंद अनासपुरे : बचत गटांच्या सदस्यांसाठी आयोजित महिला प्रबोधन मेळाव्यात प्रतिपादन

बोरकुंड : सक्षम आणि स्वयंपूर्ण नारीशक्तीला स्वत:च्या पायावर उभे करण्यातून बलवान पिढीचे नवनिर्माण होत आहे. ह्या अलौकिक कार्यात बोरकुंडसारख्या गावाने दिलेली आर्थिक, मानसिक, शारीरिक ताकद राज्यासाठी दीपस्तंभ ठरेल, असे प्रतिपादन नाम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी येथे काढले. चूल आणि मूल ह्या चौकटीबाहेर असलेल्या विशाल जगाला कवेत घेण्यासाठी या परिसरातील नारीशक्ती सरसावली आहे, असे गौरवोदगारही त्यांनी काढले.बोरकुंड येथे सावता महाराज मंगल कार्यालयात इंदूबाई प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) धुळे यांच्यातर्फे बुधवारी दुपारी महिला प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.सरपंच बाळासाहेब भदाणे व त्यांच्या इंदूबाई प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करतांना विनोदात्मक शैलीत अभिनेते अनासपुरे म्हणाले की, बोरकुंडच्या महिलांना सक्षमतेने पुढे नेऊन बोरकुंडच्या नारीशक्तीला बाजारपेठ उभी करण्यासाठी सरपंच बाळासाहेब तत्पर राहतील मात्र महिलांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे सांगितले.यावेळी प्रमुख अतिथी मार्गदर्शक दौंड, पुणे येथील प्रसिद्ध उद्योजिका कमल परदेशी तसेच बार्शी, सोलापूर येथील उद्योजिका वैशाली आवारे, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे, सचिव शालिनी भदाणे, उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक त्रिवेणी भोंदे, लुपिन फाउंडेशनचे विभागीय व्यवस्थापक योगेश राऊत, मार्गदर्शक रावण भदाणे, इंदूबाई भदाणे, डॉ.राजेंद्र भदाणे, बी.डब्ल्यू. आव्हाड, पतिंग भदाणे उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संस्थाध्यक्ष बाळासाहेब भदाणे म्हणाले ज्या गावात मी लहानाचा मोठा त्या गावाशी उपकाराची नाळ कायम रहावी म्हणून परिसरातील गरजा लक्षात घेवून विकासाचे सूक्ष्म नियोजन करत गावाचा लोकसहभागातून कायापालट करायचे ठरविले आहे महिला सक्षम झाल्या तर कुटुंब सक्षम होते. यातून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना परिपूर्ण बनवायचे असल्याचे सांगितले. यावेळी उद्योजिका परदेशी, उद्योजिका आवारे यांनी महिलांनी कोणत्याही क्षेत्रात जिद्दीने पुढे जावे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्र करून त्यांना नेहमी सकारात्मक वाव द्यावा. तसेच मार्केटमध्ये काय पिकवितो, काय विकले जाते यास महत्व आहे. महिलांना मार्केटिंग करता येणे गरजेचे असल्याचे सांगितले.यावेळी विविध मनोरंजनात्मक दाखले देत महिलांना हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करू नये, लग्नात साडया देणे-घेणे बंद करून आहेर पद्धती बंद करावी, असे सांगत आवारे यांनी प्रतिष्ठानचे कौतुक केले.

टॅग्स :Dhuleधुळे