शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लागवडीच्या कांदा रोपांवर करपा रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:20 IST

रब्बी हंगाम : रांगडा कांद्याचे क्षेत्रफळ घटणार, गहू, हरभरा, मका पिकांच्या क्षेत्रात होणार वाढ

मालपूर : कांद्यापाठोपाठ आगामी रब्बी हंगामासाठी टाकलेल्या रांगडा कांद्याच्या रोपांवर देखील करपा रोग आल्यामुळे मालपूरसह परिसरात कांदा रोप बसण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामाच्या लागवड क्षेत्रात येथे मोठी घट होणार असल्याने कांदा लागवड क्षेत्र घटणार आहे. तर गहू, हरभराच्या क्षेत्रफळात वाढ होईल तर खरीपातील कपाशीचे पीक शेताबाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे.मालपूरसह संपूर्ण परिसरातील सुराय, अक्कलकोस, कर्ले, परसोळे, वैंदाणे, ऐचाळे, दुसाणे, इंदवे, हट्टी आदी संपूर्ण भागात खरीप व रब्बी हंगामातील रांगडा कांदा, सफेद कांदा आदी पिकांचे क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यावर्षी सुरुवातीच्या पाणी टंचाईमुळे खरीपातील कांदा उत्पादन घटले होते. तुटपूंज्या पाण्याच्या आधारावर काही शेतकऱ्यांनी लागवड केली मात्र परतीच्या पावसाने संपूर्ण कांदा नासवला. बाजारपेठेतील सध्याचा कांद्याचा दर बघता अनेक शेतकऱ्यांनी रब्बीतील रांगडा कांदा लागवडीचा बेत आखून त्यादृष्टीने तयारी देखील केली. मात्र कांदा पाठोपाठ नवीन टाकलेल्या रोपांवर देखील करपा या रोगाचे अतिक्रमण झाल्यामुळे आता नाईलाजास्तव गहू, हरभरा या पिकाकडे वळावे लागणार असल्याचे शेतकºयांमधून बोलले जात आहे.कांदा लागवड करायची असेल तर दोन्ही हंगामात महिना दीड महिना अगोदर तयारी करुन कांद्याचे प्रथम त्या-त्या हंगामानुसार प्रमाणित केलेले बियाणे टाकून रोप तयार करावे लागते. हे रोप साधारण दीड महिन्यानंतर लागवडीयोग्य तयार झाल्यावर क्षेत्रफळ तयार करुन मजुरांच्या सहाय्याने वाफे पद्धत किंवा बेडवर ठिबक सिंचनच्या सहाय्याने लागवड येथील शेतकरी करतात. वाफे पद्धतीत सुद्धा सर किंवा गादी वाफे या पद्धतीने लागवड होत असते. मात्र लागवडीसाठी आता या करपा रोगामुळे रोपच शिल्लक राहणार नसल्यामुळे पाणी असून देखील येथे कांदा पिकाचे क्षेत्रफळ घटणार असल्याचे सध्या दिसत आहे. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला व त्यापाठोपाठ जबरदस्त दाट धुके म्हणजे धुव्वारीच्या अतिक्रमणामुळे शेतकºयांची कांदा लागवडीसाठी टाकलेली संपूर्ण रोपेच बसून गेलीत. यात अजून कांदा रोगांचे देखील एकदम अ‍ॅटेक झाल्यामुळे रोपांचे होत्याचे नव्हतेच झाले. चांगली वाढीस लागलेली रोपांची पात करपून नाहिशी झाल्यामुळे कांदा लागवडीवर पाणी सोडावे लागणार आहे.विकत रोप आणून लागवड केल्यास मजुरी व खर्च जास्त वाढतो. यामुळे येणारे उत्पन्नातून खर्च वजा जाता हातात काहीच शिल्लक रहात नसल्यामुळे घरचेच रोप या उत्पादनासाठी सोयीस्कर असते, असे येथील कांदा उत्पादक शेतकरी सांगतात.आजच्या कांद्याचा बाजारपेठेतील भाव लक्षात घेता बºयाच शेतकºयांनी रब्बीतील रांगडा कांदा लागवडीचा बेत आखला होता. या तीन महिन्यात तिसºयांदा कांद्याने सहा हजाराच्या वर आकडा गाठला आहे. यामुळे येथील शेतकºयांना चांगल्या आशा देखील पल्लवीत झाल्या होत्या. कांदा पिकाला भरपूर पाणी लागते व यावर्षी येथील अमरावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून नदी नाले आजतापागायत दुथडी भरुन वाहत आहे.परिणामी विहिरी देखील ओसंडून वाहत आहे म्हणून पाण्याचा सिंचनाचा प्रश्न सुटला असताना रोपे शिल्लक नसल्यामुळे कांदा लागवड क्षेत्रफळ घटणार आहे. तर नाईलाजास्तव रब्बीतील गहु, हरभरा, मका या पिकाकडे वळावे लागणार असल्याने या पिकाचे क्षेत्रफळात वाढ होणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे