शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

लागवडीच्या कांदा रोपांवर करपा रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:20 IST

रब्बी हंगाम : रांगडा कांद्याचे क्षेत्रफळ घटणार, गहू, हरभरा, मका पिकांच्या क्षेत्रात होणार वाढ

मालपूर : कांद्यापाठोपाठ आगामी रब्बी हंगामासाठी टाकलेल्या रांगडा कांद्याच्या रोपांवर देखील करपा रोग आल्यामुळे मालपूरसह परिसरात कांदा रोप बसण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामाच्या लागवड क्षेत्रात येथे मोठी घट होणार असल्याने कांदा लागवड क्षेत्र घटणार आहे. तर गहू, हरभराच्या क्षेत्रफळात वाढ होईल तर खरीपातील कपाशीचे पीक शेताबाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे.मालपूरसह संपूर्ण परिसरातील सुराय, अक्कलकोस, कर्ले, परसोळे, वैंदाणे, ऐचाळे, दुसाणे, इंदवे, हट्टी आदी संपूर्ण भागात खरीप व रब्बी हंगामातील रांगडा कांदा, सफेद कांदा आदी पिकांचे क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यावर्षी सुरुवातीच्या पाणी टंचाईमुळे खरीपातील कांदा उत्पादन घटले होते. तुटपूंज्या पाण्याच्या आधारावर काही शेतकऱ्यांनी लागवड केली मात्र परतीच्या पावसाने संपूर्ण कांदा नासवला. बाजारपेठेतील सध्याचा कांद्याचा दर बघता अनेक शेतकऱ्यांनी रब्बीतील रांगडा कांदा लागवडीचा बेत आखून त्यादृष्टीने तयारी देखील केली. मात्र कांदा पाठोपाठ नवीन टाकलेल्या रोपांवर देखील करपा या रोगाचे अतिक्रमण झाल्यामुळे आता नाईलाजास्तव गहू, हरभरा या पिकाकडे वळावे लागणार असल्याचे शेतकºयांमधून बोलले जात आहे.कांदा लागवड करायची असेल तर दोन्ही हंगामात महिना दीड महिना अगोदर तयारी करुन कांद्याचे प्रथम त्या-त्या हंगामानुसार प्रमाणित केलेले बियाणे टाकून रोप तयार करावे लागते. हे रोप साधारण दीड महिन्यानंतर लागवडीयोग्य तयार झाल्यावर क्षेत्रफळ तयार करुन मजुरांच्या सहाय्याने वाफे पद्धत किंवा बेडवर ठिबक सिंचनच्या सहाय्याने लागवड येथील शेतकरी करतात. वाफे पद्धतीत सुद्धा सर किंवा गादी वाफे या पद्धतीने लागवड होत असते. मात्र लागवडीसाठी आता या करपा रोगामुळे रोपच शिल्लक राहणार नसल्यामुळे पाणी असून देखील येथे कांदा पिकाचे क्षेत्रफळ घटणार असल्याचे सध्या दिसत आहे. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला व त्यापाठोपाठ जबरदस्त दाट धुके म्हणजे धुव्वारीच्या अतिक्रमणामुळे शेतकºयांची कांदा लागवडीसाठी टाकलेली संपूर्ण रोपेच बसून गेलीत. यात अजून कांदा रोगांचे देखील एकदम अ‍ॅटेक झाल्यामुळे रोपांचे होत्याचे नव्हतेच झाले. चांगली वाढीस लागलेली रोपांची पात करपून नाहिशी झाल्यामुळे कांदा लागवडीवर पाणी सोडावे लागणार आहे.विकत रोप आणून लागवड केल्यास मजुरी व खर्च जास्त वाढतो. यामुळे येणारे उत्पन्नातून खर्च वजा जाता हातात काहीच शिल्लक रहात नसल्यामुळे घरचेच रोप या उत्पादनासाठी सोयीस्कर असते, असे येथील कांदा उत्पादक शेतकरी सांगतात.आजच्या कांद्याचा बाजारपेठेतील भाव लक्षात घेता बºयाच शेतकºयांनी रब्बीतील रांगडा कांदा लागवडीचा बेत आखला होता. या तीन महिन्यात तिसºयांदा कांद्याने सहा हजाराच्या वर आकडा गाठला आहे. यामुळे येथील शेतकºयांना चांगल्या आशा देखील पल्लवीत झाल्या होत्या. कांदा पिकाला भरपूर पाणी लागते व यावर्षी येथील अमरावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून नदी नाले आजतापागायत दुथडी भरुन वाहत आहे.परिणामी विहिरी देखील ओसंडून वाहत आहे म्हणून पाण्याचा सिंचनाचा प्रश्न सुटला असताना रोपे शिल्लक नसल्यामुळे कांदा लागवड क्षेत्रफळ घटणार आहे. तर नाईलाजास्तव रब्बीतील गहु, हरभरा, मका या पिकाकडे वळावे लागणार असल्याने या पिकाचे क्षेत्रफळात वाढ होणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे