शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
3
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
4
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
5
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
6
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
7
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
8
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!
9
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
10
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
11
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
12
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
13
'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
14
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
15
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
16
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
17
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
18
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण
20
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...

लागवडीच्या कांदा रोपांवर करपा रोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:20 IST

रब्बी हंगाम : रांगडा कांद्याचे क्षेत्रफळ घटणार, गहू, हरभरा, मका पिकांच्या क्षेत्रात होणार वाढ

मालपूर : कांद्यापाठोपाठ आगामी रब्बी हंगामासाठी टाकलेल्या रांगडा कांद्याच्या रोपांवर देखील करपा रोग आल्यामुळे मालपूरसह परिसरात कांदा रोप बसण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामाच्या लागवड क्षेत्रात येथे मोठी घट होणार असल्याने कांदा लागवड क्षेत्र घटणार आहे. तर गहू, हरभराच्या क्षेत्रफळात वाढ होईल तर खरीपातील कपाशीचे पीक शेताबाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे.मालपूरसह संपूर्ण परिसरातील सुराय, अक्कलकोस, कर्ले, परसोळे, वैंदाणे, ऐचाळे, दुसाणे, इंदवे, हट्टी आदी संपूर्ण भागात खरीप व रब्बी हंगामातील रांगडा कांदा, सफेद कांदा आदी पिकांचे क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यावर्षी सुरुवातीच्या पाणी टंचाईमुळे खरीपातील कांदा उत्पादन घटले होते. तुटपूंज्या पाण्याच्या आधारावर काही शेतकऱ्यांनी लागवड केली मात्र परतीच्या पावसाने संपूर्ण कांदा नासवला. बाजारपेठेतील सध्याचा कांद्याचा दर बघता अनेक शेतकऱ्यांनी रब्बीतील रांगडा कांदा लागवडीचा बेत आखून त्यादृष्टीने तयारी देखील केली. मात्र कांदा पाठोपाठ नवीन टाकलेल्या रोपांवर देखील करपा या रोगाचे अतिक्रमण झाल्यामुळे आता नाईलाजास्तव गहू, हरभरा या पिकाकडे वळावे लागणार असल्याचे शेतकºयांमधून बोलले जात आहे.कांदा लागवड करायची असेल तर दोन्ही हंगामात महिना दीड महिना अगोदर तयारी करुन कांद्याचे प्रथम त्या-त्या हंगामानुसार प्रमाणित केलेले बियाणे टाकून रोप तयार करावे लागते. हे रोप साधारण दीड महिन्यानंतर लागवडीयोग्य तयार झाल्यावर क्षेत्रफळ तयार करुन मजुरांच्या सहाय्याने वाफे पद्धत किंवा बेडवर ठिबक सिंचनच्या सहाय्याने लागवड येथील शेतकरी करतात. वाफे पद्धतीत सुद्धा सर किंवा गादी वाफे या पद्धतीने लागवड होत असते. मात्र लागवडीसाठी आता या करपा रोगामुळे रोपच शिल्लक राहणार नसल्यामुळे पाणी असून देखील येथे कांदा पिकाचे क्षेत्रफळ घटणार असल्याचे सध्या दिसत आहे. परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला व त्यापाठोपाठ जबरदस्त दाट धुके म्हणजे धुव्वारीच्या अतिक्रमणामुळे शेतकºयांची कांदा लागवडीसाठी टाकलेली संपूर्ण रोपेच बसून गेलीत. यात अजून कांदा रोगांचे देखील एकदम अ‍ॅटेक झाल्यामुळे रोपांचे होत्याचे नव्हतेच झाले. चांगली वाढीस लागलेली रोपांची पात करपून नाहिशी झाल्यामुळे कांदा लागवडीवर पाणी सोडावे लागणार आहे.विकत रोप आणून लागवड केल्यास मजुरी व खर्च जास्त वाढतो. यामुळे येणारे उत्पन्नातून खर्च वजा जाता हातात काहीच शिल्लक रहात नसल्यामुळे घरचेच रोप या उत्पादनासाठी सोयीस्कर असते, असे येथील कांदा उत्पादक शेतकरी सांगतात.आजच्या कांद्याचा बाजारपेठेतील भाव लक्षात घेता बºयाच शेतकºयांनी रब्बीतील रांगडा कांदा लागवडीचा बेत आखला होता. या तीन महिन्यात तिसºयांदा कांद्याने सहा हजाराच्या वर आकडा गाठला आहे. यामुळे येथील शेतकºयांना चांगल्या आशा देखील पल्लवीत झाल्या होत्या. कांदा पिकाला भरपूर पाणी लागते व यावर्षी येथील अमरावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून नदी नाले आजतापागायत दुथडी भरुन वाहत आहे.परिणामी विहिरी देखील ओसंडून वाहत आहे म्हणून पाण्याचा सिंचनाचा प्रश्न सुटला असताना रोपे शिल्लक नसल्यामुळे कांदा लागवड क्षेत्रफळ घटणार आहे. तर नाईलाजास्तव रब्बीतील गहु, हरभरा, मका या पिकाकडे वळावे लागणार असल्याने या पिकाचे क्षेत्रफळात वाढ होणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे