शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसनेच ८० वेळा घटनेत बदल केला: नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 09:31 IST

गडकरी म्हणाले, काही वर्षांपूर्वी काँग्रेसने ‘गरिबी हटाओ’चा नारा दिला होता; पण, गरिबी हटली नाही, तर काँग्रेसची चापलुसी करणाऱ्यांची गरिबी दूर झाली. 

शिंदखेडा (धुळे) : संविधान बदलण्यासाठी भाजप ‘४०० पार’चा नारा देत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून होत आहे; परंतु, देशाचे संविधान कोणीच बदलवू शकत नाही. उलट काँग्रेसनेच राज्यघटनेत तब्बल ८० वेळा बदल केला, अशी टीका केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दुपारी शिंदखेड्यात झालेल्या जाहीर सभेत गडकरी बोलत होते. व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अभिजित गोपचिडे, आमदार जयकुमार रावल उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, काही वर्षांपूर्वी काँग्रेसने ‘गरिबी हटाओ’चा नारा दिला होता; पण, गरिबी हटली नाही, तर काँग्रेसची चापलुसी करणाऱ्यांची गरिबी दूर झाली. 

देशातील विद्यमान सरकार हे शेतकऱ्यांचे कल्याण करणारे आहे. गेल्या १० वर्षांत देशात रस्त्यांचे जाळे विणले गेले. तब्बल ५० लाख कोटींची विकासकामे झाली. काँग्रेसने ६० वर्षांत महाराष्ट्राला केवळ २ लाख कोटी रुपये दिले, तर मोदी सरकारने महाराष्ट्राला १० लाख कोटी रुपये दिले. काँग्रेसला जे ६० वर्षांत जमले नाही, ते आम्ही अवघ्या दहा वर्षांत केले, असा दावाही गडकरी यांनी केला.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४