शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

धुळ्यात खान्देशस्तरीय काँग्रेस चिंतन शिबिराचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 22:52 IST

आव्हान पेलण्यासाठी सज्ज व्हा : माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे प्रतिपादन

ठळक मुद्देसमारोपाच्या शेवटी सहभागी असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शिबिरार्थींमध्ये सांघिक चर्चा घडवून आणण्यात आली़ त्यातून येणाºया काळात पक्षाची व आपली दिशा काय असेल? पक्षातून कोणते कार्य केले जाईल, याचा कृती आराखडा तयार करण्यात आला़ त्यातून जिल्हानिहाय  समन्वयकाची नेमणूक करण्यात आली़ 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चिंतन शिबिरातून उत्तम कार्यकर्त्याला प्रोत्साहन दिले जाते़ तर होणाºया चुका नजरेस आणून त्या दुरुस्त करण्याची संधी मिळते़ अशा शिबिरामुळे पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होते़ विरोधकांची आव्हाने परतवून लावण्यासाठी धुळे जिल्ह्यासह खान्देशात काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सक्षम आहेत़ मात्र, त्याकरीता कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा प्रत्येक माणसांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे़ असे आवाहन माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी धुळ्यात व्यक्त केले़ धुळे तालुक्यातील नकाणे गावाजवळील दुलारी गार्डन येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षांतर्गत राजीव गांधी पंचायती राज संघटनेच्यावतीने पंचायती राज कार्यकर्ता चिंतन शिबिर गेल्या दोन दिवसांपासून सुरु होते़ या शिबिराचा समारोप गुरुवारी झाला़ त्यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले़ यावेळी  पंचायत राज संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी गगनदिप सिंग, विभागीय संयोजक योगेंद्र पाटील, माजी मंत्री हेमंत देशमुख,  माजी खासदार बापू चौरे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत, नाशिक जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावीत, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती नूतन पाटील, कल्पना राजपूत, विलास बिरारीस, रजनिकांत कड, लहू पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, भगवान गर्दे, बाजीराव पाटील, डॉ़ दरबारसिंग गिरासे, किरण अहिरराव, बापू खैरनार, शिरीष सोनवणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हर्षल साळुंके यांच्यासह चिंतन शिबिरात धुळ्यासह नाशिक, नगर, जळगाव, नंदुरबार येथील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ माजी मंत्री पाटील म्हणाले, चिंतन शिबीरामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यात चैतन्य निर्माण झाले़ त्यांच्या मनगटात बळ निर्माण करण्याचे काम झाले़ 

टॅग्स :Dhuleधुळेcongressकाँग्रेस